शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
2
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
3
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
4
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
5
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
6
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
8
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
9
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
10
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
11
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
12
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
13
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
14
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
15
आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
16
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
17
सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
18
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
19
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
20
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाला कोरानाची लस, हेच प्रशासनापुढचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळालेली कोरोना लस सन २०२१ वर्षांत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळालेली कोरोना लस सन २०२१ वर्षांत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हेच नव्या वर्षातले सर्वात मोठे आव्हान प्रशासनापुढे असेल. याशिवाय कोरोनोमुळे गेल्या वर्षभरात रखडलेल्या विकास कामांना गती देणे आणि महसुलाची विस्कळीत झालेली आर्थिक घडी सुधारणे याचेही मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असेल.

जिल्हा प्रशासनाचे सरते वर्षे कोरोनासह अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि अतिवृष्टीतच्या संकटाचा सामना करण्यातच गेले. यातच आता कोरोना लसीकरणाला प्रशासनाला प्राधान्य द्यावे लागेल. शासनाने घालून दिलेल्या निकषानुसार पहिल्या टप्प्यात १ लाख १० हजार ४३४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन सुरू आहे.

कोरोनामुळे गेल्या संपूर्ण वर्षात जिल्ह्यातील सर्व विकास कामे ठप्प झाली. जिल्हा नियोजन समितीच्या साडेसहाशे कोटी रुपयांपैकी १०७ कोटी रुपये आरोग्यावर खर्च झाले. आता शिल्लक निधी येत्या मार्चपर्यंत खर्च करणे, किमान ‘वर्क ऑर्डर’ काढणे आवश्यक आहे. याचबरोबर जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड आणि पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे मोठे आव्हान प्रशासानाला पेलावे लागेल.

शासनाने पुणे जिल्ह्याला सन २०२०-२१ या वर्षासाठी ५९० कोटी रुपये महसुल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले. परंतु कोरोना महामारीचे संकट, लाॅकडाऊन, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्याच्या महसुलाला बसला. गेल्या नऊ-दहा महिन्यात जिल्ह्यात केवळ १६-१७ टक्केच म्हणजे १२७ कोटी रुपयांचा महसुल जमा झाला. येत्या तीन महिन्यात साडेचारशे कोटी रुपये वसूल करण्याची कसरत प्रशासनाला साधावी लागेल.

चौकट

सर्वसामान्यांना न्याय देणारे काम

“कोरोनामुळे सर्वच स्तरांतील लोकांना मोठा फटका बसला आहे. येणाऱ्या वर्षांत कोरोनाची लस शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, जिल्ह्यातील ठप्प झालेल्या विकास कामांना गती देणे, राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि आमच्या कामातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे काम करणे हेच नव्या वर्षातले उद्दिष्ट आहे.”

-डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी