शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दुष्काळामुळे कोंढापुरीचा तलाव पडला कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:07 IST

पंधरा दिवसांपासून पाणीटंचाई : धरण उशाला आणि कोरड घशाला

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे गेल्या पंधरा दिवसांपासून तलावामध्ये पाणीसाठाच शिल्लक नसल्याने अनेक वर्षांपासून न जाणवलेल्या भीषण दुष्काळाचे चटके कोंढापुरी गाव व इतर पंचक्रोशीमध्ये जाणवू लागले आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’अशी स्थिती कोंढापुरी ग्रामस्थांवर आली आहे.

तरी त्वरित कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी भास्कर गायकवाड, शांताराम गायकवाड; तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राहुल दिघे, संतोष गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी यांचे अतोनात हाल होत असून, तसेच पिण्यासाठी कोंढापुरी तलावावर अवलंबून असलेली पाणीपुरवठा योजना कोंढापुरी, रांजणगाव गणपती, निमगाव म्हाळुंगी, खंडाळे, गणेगाव, शिक्रापूर या गावांच्या योजना असल्यामुळे पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. मागील आवर्तनामध्ये कोंढापुरी तलावांमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडलेले होते, तरी त्यामुळे पाणीसाठा काही दिवस शिल्लक राहिल्याने शेतमाल जळत असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या कोंढापुरी, गणेगाव, खंडाळे व आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये झालेली आहे, तरी तलावामध्ये पाणी सोडणे महत्त्वाचे असून लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेसलग दोन वर्षे झालेल्या पावसाचे कमी प्रमाण त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. एकंदरीत दुष्काळी परिस्थिती आणि गेल्या दोन वर्षांमध्ये शेतमालाला असलेला नीचांकी बाजारभाव यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.कोंढापुरीमध्ये काही दिवसांपासून दिवसाआड पाणी सोडण्याचे काम चालू झालेले आहे, काही दिवसांतच टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी लागणार असे दिसत आहे. 

टॅग्स :Puneपुणे