शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे कोंढापुरीचा तलाव पडला कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:07 IST

पंधरा दिवसांपासून पाणीटंचाई : धरण उशाला आणि कोरड घशाला

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे गेल्या पंधरा दिवसांपासून तलावामध्ये पाणीसाठाच शिल्लक नसल्याने अनेक वर्षांपासून न जाणवलेल्या भीषण दुष्काळाचे चटके कोंढापुरी गाव व इतर पंचक्रोशीमध्ये जाणवू लागले आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’अशी स्थिती कोंढापुरी ग्रामस्थांवर आली आहे.

तरी त्वरित कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी भास्कर गायकवाड, शांताराम गायकवाड; तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राहुल दिघे, संतोष गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी यांचे अतोनात हाल होत असून, तसेच पिण्यासाठी कोंढापुरी तलावावर अवलंबून असलेली पाणीपुरवठा योजना कोंढापुरी, रांजणगाव गणपती, निमगाव म्हाळुंगी, खंडाळे, गणेगाव, शिक्रापूर या गावांच्या योजना असल्यामुळे पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. मागील आवर्तनामध्ये कोंढापुरी तलावांमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडलेले होते, तरी त्यामुळे पाणीसाठा काही दिवस शिल्लक राहिल्याने शेतमाल जळत असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या कोंढापुरी, गणेगाव, खंडाळे व आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये झालेली आहे, तरी तलावामध्ये पाणी सोडणे महत्त्वाचे असून लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहेसलग दोन वर्षे झालेल्या पावसाचे कमी प्रमाण त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. एकंदरीत दुष्काळी परिस्थिती आणि गेल्या दोन वर्षांमध्ये शेतमालाला असलेला नीचांकी बाजारभाव यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.कोंढापुरीमध्ये काही दिवसांपासून दिवसाआड पाणी सोडण्याचे काम चालू झालेले आहे, काही दिवसांतच टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी लागणार असे दिसत आहे. 

टॅग्स :Puneपुणे