शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST

स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे अभिजित कोळपे स्वतःला ओळखणे तसेच संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सातत्याने शब्दसंग्रह वाढवल्यास सामान्य अध्ययन, वैकल्पिक ...

स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे

अभिजित कोळपे

स्वतःला ओळखणे तसेच संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सातत्याने शब्दसंग्रह वाढवल्यास सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषयांबरोबर निबंध या विषयांचे पेपर लिहिताना चांगला फायदा होतो. एखाद्या विषयावर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त बोलता येणे, हे ज्ञानाबरोबरच उत्कृष्ट संवाद कौशल्याचे लक्षण आहे. ते जास्त परिणामकारक ठरते. त्यामुळे संवाद कौशल्य, पेपर सोडवण्याचा सातत्याने सराव केल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत हमखास यश मिळू शकते, असा विश्वास विद्यार्थ्यांना तामिळनाडू राज्याचे अतिरिक्त सचिव (फायनान्स) प्रशांत वडणेरे देतात. वडणेरे यांनी करूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, स्टेट फायनान्स कमिशनचे प्रतिनिधी सचिव तसेच राज्याच्या अर्थखात्याचे उपसचिव म्हणून काम पाहिले आहे.

प्रशांत वडणेरे हे मूळचे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहराबादचे. वडिलांचे अकाली निधन झाल्याने सर्व जबाबदारी त्यांच्या आईने पार पाडली. रोजगार आणि तीन मुलांच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या. त्यामुळे प्रशांत यांचे संपूर्ण शिक्षण पुणे शहरात झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बीएससी कृषी या विषयात त्यांनी पदवी घेतली. पदवीच्या शेवटच्या वर्षात त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली. जिद्द, फोकस पद्धतीने अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर केवळ दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससीत यश मिळवले आहे.

पूर्व परीक्षेपूर्वी तीन महिने आधी सामान्य अध्ययन, सी-सॅट या पेपरचे मागील किमान पाच ते आठ वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास करावा. कोणत्या विषयाला जास्त आणि कोणत्या विषयाला कमी महत्त्व दिले आहे. प्रश्न विचारण्याचा ट्रेंड लक्षात घ्यावा. त्यामुळे परीक्षेचा आवाका आपल्याला येतो.

मुख्य परीक्षेची तयारी करताना पूर्व परीक्षेसारखाच सर्व पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास गरजेचा आहे. मुख्यतः वैकल्पिक विषयाचे दोन पेपर आणि सामान्य अध्ययनच्या चार पेपरवर पूर्ण फोकस करावा. कारण या सहा पेपरमधून मिळणाऱ्या गुणांमुळे यूपीएससीचे भवितव्य जास्त अवलंबून आहे. या सर्व पेपरचा बेसिक अभ्यास National Council Education Research Training म्हणजे एनसीईआरटीची इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके जास्तीत जास्त वेळा अभ्यासावी. कारण यूपीएससी परीक्षेचा मूळ बेस या अभ्यासक्रमावर आधारित आहे.

मुलाखतीला जाण्यापूर्वी स्वतःबद्दलची माहिती एकदा अपडेट करावी. छंद, आवडी-निवडी याविषयी ऐनवेळी बदल करून सांगू नये. जे आहेत तेच सांगावे. पॅनलनी खोलात जाऊन प्रश्न विचारल्यास अडचणीचे ठरते. त्यामुळे ऐनवेळी दुसराच छंद सांगितला आणि त्याचे आपल्याला ज्ञान कमी असल्यास धोक्याचे ठरू शकते. त्याचबरोबर आपण जी माहिती देणार आहोत ती समोरच्याला समजेल अशा भाषेत असावी. त्यामुळे संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे. तसेच कठीण काळात, तणावाच्या परिस्थितीत आपण कसे वागतो, कसे निर्णय घेतो, आपल्या शरीराच्या हालचाली याचे निरीक्षण पॅनलचे सदस्य घेत असतात.

फोटो : प्रशांत वडणेरे