शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST

स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे अभिजित कोळपे स्वतःला ओळखणे तसेच संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सातत्याने शब्दसंग्रह वाढवल्यास सामान्य अध्ययन, वैकल्पिक ...

स्वतःला ओळखणे, संवाद कौशल्य महत्त्वाचे

अभिजित कोळपे

स्वतःला ओळखणे तसेच संवाद कौशल्य वाढवण्यासाठी सातत्याने शब्दसंग्रह वाढवल्यास सामान्य अध्ययन, वैकल्पिक विषयांबरोबर निबंध या विषयांचे पेपर लिहिताना चांगला फायदा होतो. एखाद्या विषयावर कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त बोलता येणे, हे ज्ञानाबरोबरच उत्कृष्ट संवाद कौशल्याचे लक्षण आहे. ते जास्त परिणामकारक ठरते. त्यामुळे संवाद कौशल्य, पेपर सोडवण्याचा सातत्याने सराव केल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत हमखास यश मिळू शकते, असा विश्वास विद्यार्थ्यांना तामिळनाडू राज्याचे अतिरिक्त सचिव (फायनान्स) प्रशांत वडणेरे देतात. वडणेरे यांनी करूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, स्टेट फायनान्स कमिशनचे प्रतिनिधी सचिव तसेच राज्याच्या अर्थखात्याचे उपसचिव म्हणून काम पाहिले आहे.

प्रशांत वडणेरे हे मूळचे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहराबादचे. वडिलांचे अकाली निधन झाल्याने सर्व जबाबदारी त्यांच्या आईने पार पाडली. रोजगार आणि तीन मुलांच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या. त्यामुळे प्रशांत यांचे संपूर्ण शिक्षण पुणे शहरात झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बीएससी कृषी या विषयात त्यांनी पदवी घेतली. पदवीच्या शेवटच्या वर्षात त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली. जिद्द, फोकस पद्धतीने अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर केवळ दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससीत यश मिळवले आहे.

पूर्व परीक्षेपूर्वी तीन महिने आधी सामान्य अध्ययन, सी-सॅट या पेपरचे मागील किमान पाच ते आठ वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास करावा. कोणत्या विषयाला जास्त आणि कोणत्या विषयाला कमी महत्त्व दिले आहे. प्रश्न विचारण्याचा ट्रेंड लक्षात घ्यावा. त्यामुळे परीक्षेचा आवाका आपल्याला येतो.

मुख्य परीक्षेची तयारी करताना पूर्व परीक्षेसारखाच सर्व पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास गरजेचा आहे. मुख्यतः वैकल्पिक विषयाचे दोन पेपर आणि सामान्य अध्ययनच्या चार पेपरवर पूर्ण फोकस करावा. कारण या सहा पेपरमधून मिळणाऱ्या गुणांमुळे यूपीएससीचे भवितव्य जास्त अवलंबून आहे. या सर्व पेपरचा बेसिक अभ्यास National Council Education Research Training म्हणजे एनसीईआरटीची इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके जास्तीत जास्त वेळा अभ्यासावी. कारण यूपीएससी परीक्षेचा मूळ बेस या अभ्यासक्रमावर आधारित आहे.

मुलाखतीला जाण्यापूर्वी स्वतःबद्दलची माहिती एकदा अपडेट करावी. छंद, आवडी-निवडी याविषयी ऐनवेळी बदल करून सांगू नये. जे आहेत तेच सांगावे. पॅनलनी खोलात जाऊन प्रश्न विचारल्यास अडचणीचे ठरते. त्यामुळे ऐनवेळी दुसराच छंद सांगितला आणि त्याचे आपल्याला ज्ञान कमी असल्यास धोक्याचे ठरू शकते. त्याचबरोबर आपण जी माहिती देणार आहोत ती समोरच्याला समजेल अशा भाषेत असावी. त्यामुळे संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे. तसेच कठीण काळात, तणावाच्या परिस्थितीत आपण कसे वागतो, कसे निर्णय घेतो, आपल्या शरीराच्या हालचाली याचे निरीक्षण पॅनलचे सदस्य घेत असतात.

फोटो : प्रशांत वडणेरे