शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

वर्गखोलीअभावी बालवाडी रस्त्यावर

By admin | Updated: July 9, 2015 02:31 IST

महिला व बालकल्याण विभागाने जुनी सांगवीतील अंगणवाडी ज्या खोलीत भरते, त्याचे भाडेच दिले नसल्याने जागामालकाने वर्गाला कुलूप घातले आहे.

पिंपळे गुरव : अंगणवाडी संदर्भातल्या अनेक समस्यांनी अंगणवाडीसेविका हैराण आहेत. त्यातच महिला व बालकल्याण विभागाने जुनी सांगवीतील अंगणवाडी ज्या खोलीत भरते, त्याचे भाडेच दिले नसल्याने जागामालकाने वर्गाला कुलूप घातले आहे. त्यामुळे चिमुकल्यांना रस्त्यावरच आपले ठाण मांडावे लागले आहे. जुनी सांगवीतील अंगणवाडी क्र. ५२ ही जयमालानगर येथे भरते. एका जागामालकाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून अवघ्या सातशे रुपये भाड्याने आपला गाळा दिला होता. मात्र, महिला व बालकल्याण विभागाला हे भाडेही चार महिन्यांपासून भरता आलेले नाही. त्यामुळे जागामालकाने गाळ्याला कुलूप लावले आणि पर्यायी जागा शोधण्यास अंगणवाडीसेविकेला सांगितले. मात्र, अनेक ठिकाणी शोधूनही जागा मिळत नाही. शासन मात्र सातशे ते साडेसातशे रुपये भाडे असलेली खोली भाड्याने घेण्यास सांगते. दहा बाय दहाच्या खोलीत ही मुले दाटीवाटीने बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. परंतु, नाईलाजास्तव तिथे शिक्षण घेत आहेत. प्रशासनाने थकलेले भाडे त्वरित द्यावे, अशी मागणी होत आहे.शासनाचा नियम आहे की, मुलांना खेळण्यास मैदान, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज या गोष्टी असायला हव्यात. त्यांपैकी एकही गोष्ट आज या अंगणवाडीत दिसत नाही. केवळ अंगणवाडीसेविकांच्या निर्धारामुळे अंगणवाड्या टिकून आहेत. मात्र, महिला व बालकल्याण विभागाच्या कागदी घोडे नाचविण्याच्या कारभारामुळे अंगणवाड्या शेवटच्या घटका मोजत आहेत. विद्यार्थी मिळविणेही अवघड होऊन बसले आहे, अशी अवस्था आहे. (वार्ताहर)> परिसरात अनेक चांगल्या शाळा असूनही आम्ही आमची मुले इथे अंगणवाडीत घालतो. मात्र, शासनाच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम आमच्या पाल्यांवर होत आहे. केवळ कागद रंगवू नका. आमच्या पाल्यांना आवश्यक सोईसुविधा द्या. वर्गाअभावी आमच्या मुलांना रस्त्यावर बसावे लागत आहे. बौद्धिक विकास होईल, अशी कोणतीच गोष्ट येथे नाही. मात्र, याचे शासनाला काही देणे-घेणे नाही. या बालवाडीला लवकरात लवकर वर्ग मिळवून द्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. >आज सर्वत्रच इंग्रजी शाळेमध्ये मुले घातली जातात. सांगवी परिसरातही तीच परिस्थिती आहे. शासनाने वयाची अट किमान ३ वर्षे केलेली असतानाही आज बहुतांश शाळांमध्ये २ वर्षे वयापासूनच प्रवेश दिले जात आहेत. अगदी गल्लोगल्ली या शाळा आहेत. त्यामुळे बालवाडीकडे मुलांना आकर्षित करणे खूपच अवघड आहे. अशा परिस्थितीतही सांगवीतील बालवाडीत आज जवळपास ३० ते ४० बालकांची उपस्थिती असते. एसटी कॉलनी व जयमालानगर या भागातली ही मुले असतात. दहा बाय दहाच्या खोलीत ही मुले दाटीवाटीने बसतात. शासनाचा नियम आहे की, मुलांना खेळण्यास मैदान, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज या बाबी असायला हव्यात. यापैकी एकही गोष्ट आज या अंगणवाडीत दिसत नाही. केवळ अंगणवाडी सेविकांच्या निधार्रामुळे अंगणवाड्या टिकून आहेत. मात्र, महिला व बालकल्याण विभागाच्या फक्त कागदी घोडे नाचविण्याच्या कारभारामुळे अंगणवाड्या शेवटच्या घटका मोजत आहेत. विद्यार्थी मिळविणेही अवघड होऊन बसले आहे, अशी अवस्था आहे.