शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra: कोरड्यानं मारलं, ओल्यानंही झोडपलं; शेतकरी म्हणतात आता नशीब रब्बीत पाहू

By नितीन चौधरी | Updated: August 5, 2023 13:53 IST

आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांची रबीसाठी लगबग सुरू...

पुणे : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे खरिपातील पिकांच्या पेरण्यांना उशीर झाला. अनेक जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांना सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने काही ठिकाणीच दुबार पेरण्याचे संकट ओढावले. राज्यातील आठ तालुक्यांमध्ये केवळ २५ ते ५० टक्केच पाऊस झाला असल्याने व पेरण्यांचा हंगामही उलटून गेल्याने आता या ठिकाणी शेतकरी रबीची तयारी करत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. दुसरीकडे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे बारा लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने बहुतांश राज्यात हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना उशीर झाला. राज्यात सोयाबीन व कापूस या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक असून साधारण १५ जुलैपर्यंत या दोन्ही पिकांची लागवड करणे शक्य होते. याच काळात राज्यभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन व कापूस पिकांच्या पेरण्या झाल्या. याच काळात पश्चिम कोकण व पूर्व विदर्भात सर्वत्र व राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ठरावीक तालुक्यातच जोरदार पाऊस झाला. अन्यत्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. काही तालुक्यांमध्ये मात्र या पेरण्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने पिके जळून गेली. अशा ठिकाणी विशेषत: सोयाबीन पिकाची दुबार पेरणी झाली. मात्र, हे क्षेत्र अतिशय कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हटले आहे.

दुसरीकडे, राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे ११ लाख ९६ हजार ९६६ हेक्टरवर अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ७८० हेक्टरवर झाले. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तर पावसामुळे राज्यात सात जिल्ह्यांतील ४३ हजार ३३६ हेक्टरवरील जमीन खरवडून गेली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या या क्षेत्रावरील पेरण्यासाठी आता योग्य काळ नसल्याने आता शेतकरी रबी हंगामासाठीच तयारी करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, राज्यातील पाच जिल्ह्यांतील ८ तालुक्यांत पावसाचे प्रमाण २५ ते ५० टक्क्यांपर्यंतच असल्याने येथे खरिपातील पेरण्या आता होणार नाहीत. या पुढील काळात या भागात पाऊस झाल्यास हे शेतकरी रबीची लागवड करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. या तालुक्यांमध्ये नाशिकमधील चांदवड, नगरमधील श्रीरामपूर व राहुरी, पुणे जिल्ह्यातील बारामती- पुरंदर व हवेली, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व कोल्हापूरमधील राधानगरी या तालुक्यांचा समावेश आहे.

राज्यातील पेरणी

सरासरी क्षेत्र : १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र : १ कोटी ३० लाख ६५ हजार २५७ हेक्टर

टक्के : ९२ (सरासरीच्या तुलनेत)

विभागनिहाय पेरणी (टक्क्यांत)

कोकण : ८०, नाशिक : ९१, पुणे : ९०, कोल्हापूर : ७६, औरंगाबाद ९४, लातूर ९७ अमरावती ९६, नागपूर ८६.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र