शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Maharashtra: कोरड्यानं मारलं, ओल्यानंही झोडपलं; शेतकरी म्हणतात आता नशीब रब्बीत पाहू

By नितीन चौधरी | Updated: August 5, 2023 13:53 IST

आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांची रबीसाठी लगबग सुरू...

पुणे : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे खरिपातील पिकांच्या पेरण्यांना उशीर झाला. अनेक जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांना सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने काही ठिकाणीच दुबार पेरण्याचे संकट ओढावले. राज्यातील आठ तालुक्यांमध्ये केवळ २५ ते ५० टक्केच पाऊस झाला असल्याने व पेरण्यांचा हंगामही उलटून गेल्याने आता या ठिकाणी शेतकरी रबीची तयारी करत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. दुसरीकडे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे बारा लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने बहुतांश राज्यात हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना उशीर झाला. राज्यात सोयाबीन व कापूस या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक असून साधारण १५ जुलैपर्यंत या दोन्ही पिकांची लागवड करणे शक्य होते. याच काळात राज्यभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन व कापूस पिकांच्या पेरण्या झाल्या. याच काळात पश्चिम कोकण व पूर्व विदर्भात सर्वत्र व राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ठरावीक तालुक्यातच जोरदार पाऊस झाला. अन्यत्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. काही तालुक्यांमध्ये मात्र या पेरण्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने पिके जळून गेली. अशा ठिकाणी विशेषत: सोयाबीन पिकाची दुबार पेरणी झाली. मात्र, हे क्षेत्र अतिशय कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हटले आहे.

दुसरीकडे, राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे ११ लाख ९६ हजार ९६६ हेक्टरवर अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ७८० हेक्टरवर झाले. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तर पावसामुळे राज्यात सात जिल्ह्यांतील ४३ हजार ३३६ हेक्टरवरील जमीन खरवडून गेली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या या क्षेत्रावरील पेरण्यासाठी आता योग्य काळ नसल्याने आता शेतकरी रबी हंगामासाठीच तयारी करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, राज्यातील पाच जिल्ह्यांतील ८ तालुक्यांत पावसाचे प्रमाण २५ ते ५० टक्क्यांपर्यंतच असल्याने येथे खरिपातील पेरण्या आता होणार नाहीत. या पुढील काळात या भागात पाऊस झाल्यास हे शेतकरी रबीची लागवड करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. या तालुक्यांमध्ये नाशिकमधील चांदवड, नगरमधील श्रीरामपूर व राहुरी, पुणे जिल्ह्यातील बारामती- पुरंदर व हवेली, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व कोल्हापूरमधील राधानगरी या तालुक्यांचा समावेश आहे.

राज्यातील पेरणी

सरासरी क्षेत्र : १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र : १ कोटी ३० लाख ६५ हजार २५७ हेक्टर

टक्के : ९२ (सरासरीच्या तुलनेत)

विभागनिहाय पेरणी (टक्क्यांत)

कोकण : ८०, नाशिक : ९१, पुणे : ९०, कोल्हापूर : ७६, औरंगाबाद ९४, लातूर ९७ अमरावती ९६, नागपूर ८६.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र