शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

Maharashtra: कोरड्यानं मारलं, ओल्यानंही झोडपलं; शेतकरी म्हणतात आता नशीब रब्बीत पाहू

By नितीन चौधरी | Updated: August 5, 2023 13:53 IST

आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांची रबीसाठी लगबग सुरू...

पुणे : राज्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे खरिपातील पिकांच्या पेरण्यांना उशीर झाला. अनेक जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्यांना सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने काही ठिकाणीच दुबार पेरण्याचे संकट ओढावले. राज्यातील आठ तालुक्यांमध्ये केवळ २५ ते ५० टक्केच पाऊस झाला असल्याने व पेरण्यांचा हंगामही उलटून गेल्याने आता या ठिकाणी शेतकरी रबीची तयारी करत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. दुसरीकडे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सुमारे बारा लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनने बहुतांश राज्यात हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना उशीर झाला. राज्यात सोयाबीन व कापूस या पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक असून साधारण १५ जुलैपर्यंत या दोन्ही पिकांची लागवड करणे शक्य होते. याच काळात राज्यभर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन व कापूस पिकांच्या पेरण्या झाल्या. याच काळात पश्चिम कोकण व पूर्व विदर्भात सर्वत्र व राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ठरावीक तालुक्यातच जोरदार पाऊस झाला. अन्यत्र पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. काही तालुक्यांमध्ये मात्र या पेरण्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने पिके जळून गेली. अशा ठिकाणी विशेषत: सोयाबीन पिकाची दुबार पेरणी झाली. मात्र, हे क्षेत्र अतिशय कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हटले आहे.

दुसरीकडे, राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सुमारे ११ लाख ९६ हजार ९६६ हेक्टरवर अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात ४ लाख ४६ हजार ७८० हेक्टरवर झाले. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ९९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तर पावसामुळे राज्यात सात जिल्ह्यांतील ४३ हजार ३३६ हेक्टरवरील जमीन खरवडून गेली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या या क्षेत्रावरील पेरण्यासाठी आता योग्य काळ नसल्याने आता शेतकरी रबी हंगामासाठीच तयारी करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, राज्यातील पाच जिल्ह्यांतील ८ तालुक्यांत पावसाचे प्रमाण २५ ते ५० टक्क्यांपर्यंतच असल्याने येथे खरिपातील पेरण्या आता होणार नाहीत. या पुढील काळात या भागात पाऊस झाल्यास हे शेतकरी रबीची लागवड करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. या तालुक्यांमध्ये नाशिकमधील चांदवड, नगरमधील श्रीरामपूर व राहुरी, पुणे जिल्ह्यातील बारामती- पुरंदर व हवेली, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व कोल्हापूरमधील राधानगरी या तालुक्यांचा समावेश आहे.

राज्यातील पेरणी

सरासरी क्षेत्र : १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र : १ कोटी ३० लाख ६५ हजार २५७ हेक्टर

टक्के : ९२ (सरासरीच्या तुलनेत)

विभागनिहाय पेरणी (टक्क्यांत)

कोकण : ८०, नाशिक : ९१, पुणे : ९०, कोल्हापूर : ७६, औरंगाबाद ९४, लातूर ९७ अमरावती ९६, नागपूर ८६.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र