शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला भरले, विसर्ग सुरू, चारही धरणांत ९७ टक्के साठा

By नितीन चौधरी | Updated: September 30, 2023 18:32 IST

गेल्या आठवड्यापर्यंत स्थिरावलेल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या पाण्यासाठ्यात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.

पुणे : गेल्या आठवड्यापर्यंत स्थिरावलेल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या पाण्यासाठ्यात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या खडकवासला ९७ टक्के अर्थात २८ एमसी पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून सायंकाळी ५ वाजता २ हजार १४० क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. या प्रकल्पातील टेमघर वगळता सर्व धरणे भरली आहेत.

ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने खडकवासला प्रकल्पातील धरणे भरणार की नाहीत याची चिंता जलसंपदा विभागाला होती. पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासह जिल्ह्यातील शेतीचे सिंचन याच चार धरणांवर अवलंबून असल्याने पाणीसाठा शंभर टक्के होणे गरजेचे होते. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या काही पावसामुळे हा साठा ९४ टक्क्यांपर्यंत झाला. पावसाने पुन्हा ओढ दिल्याने त्यात फारशी वाढ होत नव्हती. गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे घरणांच्या पाणीसाठ्यात सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पातील पाणीसाठा २८.३८ टीएमसी अर्थात ९७.३६ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा २९.१० टीएमसी अर्थात ९९.८३ टक्के इतका होता. तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी मध्यरात्री विसर्ग सुरू करण्यात आला. सुरुवातीला हा विसर्ग ८५६ क्युसेक करण्यात येत होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग १ हजार ७१२ क्युसेक करण्यात आला. त्यानंतर शनिवारी पहाटे ३ वाजता पाऊस पुन्हा वाढल्याने विसर्ग २ हजार ५६८ क्युसेक करण्यात आला. तर पाऊस कमी झाल्याने सायंकाळी ५ वाजता हा विसर्ग २ हजार १४० क्युसेक करण्यात आला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन-चार दिवसांत पुणे शहर व घाट परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाणलोट परिसरातही पाऊस झाल्यास धरणे पूर्ण भरतील अशी आशा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची येत्या १५ ऑक्टोबरला बैठक होणार आहे. धरणे भरल्यास शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या आवर्तनाबाबत तसेच पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात यात निर्णय होणार आहे. सध्या तरी पाणलोटात होणाऱ्या पावसामुळे धरणे भरण्याची आशा असल्याने पुण्याच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात कपात केली जाणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पाणीसाठाधरण टीएमसी टक्के

  • खडकवासला १.९७--१००
  • पानशेत १०.६५--१००
  • वरसगाव १२.८२--१००
  • टेमघर २.९४--७९.२१
  • एकूण २८.३८--९७.३६
  • मागील वर्षाचा साठा
  • २९.१० टीएमसी --९९.३८ टक्के

  

टॅग्स :Puneपुणे