शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खडकवासला भरले, विसर्ग सुरू, चारही धरणांत ९७ टक्के साठा

By नितीन चौधरी | Updated: September 30, 2023 18:32 IST

गेल्या आठवड्यापर्यंत स्थिरावलेल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या पाण्यासाठ्यात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.

पुणे : गेल्या आठवड्यापर्यंत स्थिरावलेल्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या पाण्यासाठ्यात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या खडकवासला ९७ टक्के अर्थात २८ एमसी पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून सायंकाळी ५ वाजता २ हजार १४० क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. या प्रकल्पातील टेमघर वगळता सर्व धरणे भरली आहेत.

ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने खडकवासला प्रकल्पातील धरणे भरणार की नाहीत याची चिंता जलसंपदा विभागाला होती. पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासह जिल्ह्यातील शेतीचे सिंचन याच चार धरणांवर अवलंबून असल्याने पाणीसाठा शंभर टक्के होणे गरजेचे होते. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या काही पावसामुळे हा साठा ९४ टक्क्यांपर्यंत झाला. पावसाने पुन्हा ओढ दिल्याने त्यात फारशी वाढ होत नव्हती. गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे घरणांच्या पाणीसाठ्यात सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पातील पाणीसाठा २८.३८ टीएमसी अर्थात ९७.३६ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा २९.१० टीएमसी अर्थात ९९.८३ टक्के इतका होता. तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी मध्यरात्री विसर्ग सुरू करण्यात आला. सुरुवातीला हा विसर्ग ८५६ क्युसेक करण्यात येत होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग १ हजार ७१२ क्युसेक करण्यात आला. त्यानंतर शनिवारी पहाटे ३ वाजता पाऊस पुन्हा वाढल्याने विसर्ग २ हजार ५६८ क्युसेक करण्यात आला. तर पाऊस कमी झाल्याने सायंकाळी ५ वाजता हा विसर्ग २ हजार १४० क्युसेक करण्यात आला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन-चार दिवसांत पुणे शहर व घाट परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाणलोट परिसरातही पाऊस झाल्यास धरणे पूर्ण भरतील अशी आशा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची येत्या १५ ऑक्टोबरला बैठक होणार आहे. धरणे भरल्यास शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या आवर्तनाबाबत तसेच पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात यात निर्णय होणार आहे. सध्या तरी पाणलोटात होणाऱ्या पावसामुळे धरणे भरण्याची आशा असल्याने पुण्याच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात कपात केली जाणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पाणीसाठाधरण टीएमसी टक्के

  • खडकवासला १.९७--१००
  • पानशेत १०.६५--१००
  • वरसगाव १२.८२--१००
  • टेमघर २.९४--७९.२१
  • एकूण २८.३८--९७.३६
  • मागील वर्षाचा साठा
  • २९.१० टीएमसी --९९.३८ टक्के

  

टॅग्स :Puneपुणे