शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

स्कूल बसमालकांची उदासिनता, प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशाला केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:29 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बसेसची तपासणी करण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशाला अनेक बसमालकांनी केराची टोपली दाखविली आहे.

पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बसेसची तपासणी करण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशाला अनेक बसमालकांनी केराची टोपली दाखविली आहे. आरटीओकडून सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप ११७० बसेसची तपासणी करण्यात आलेली नाही. यावरून विद्यार्थी सुरक्षिततेबाबत हे बसमालक किती गंभीर आहेत, हे दिसून येते.मागील आठवड्यात टिळक रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाºया एका व्हॅनला अचानक आग लागल्याचा प्रकार घडला. चालकाने प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढून पुढील अनर्थ टाळला. हा आगीचा प्रकार मोठा नसला तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. यापूर्वीही शहरासह देशभरात विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांच्या सुस्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिवहन विभागाकडून या वाहनांच्या तपासणीचे आदेश वारंवार दिले जातात. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना असल्याशिवाय या वाहनांना परवानगी दिली जात नाही. यंदाही शाळा सुरू होण्यापूर्वी आरटीओने सर्व स्कूल बसेसची तपासणी करण्याचे आदेश बसमालकांना दिले होते.पुणे आरटीओच्या अंतर्गत एकूण ३६८० अधिकृत स्कूल बसेस आहेत. त्यामध्ये विद्यार्थी वाहतूक करणाºया व्हॅनचाही समावेश होतो. या बसेसची तपासणी करण्यासाठी जूनअखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण या मुदतीत २५१० बस व व्हॅनचीच तपासणी करण्यात आली आहे. अद्याप १११७० वाहनांची तपासणी झालेली नाही. या वाहनमालकांना आरटीओकडून नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांना वाहनांची तपासणी करून घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. अन्यथा आरटीओकडून कारवाई केली जाणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी सांगितले.अनेक स्कूल बसमध्ये योग्य दक्षता घेतली नसल्याचे आरटीओच्या तपासणीत आढळून आले आहे. आरटीओने राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये ६६ बसेसमध्ये पुरेशा उपाययोजना आढळून आल्या नाहीत. त्यापैकी ३८ बस जप्त करण्यात आल्या आहेत. आरटीओने राबविलेल्या तपासणी मोहिमेत सुमारे ५ लाख ३१ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसणे, विमा नसणे, अग्निरोधक उपकरणे, आपत्कालीन दरवाजा, सहायक नसणे अशा विविध कमतरता आढळून आल्या आहेत.>शालेय परिवहन समितीअध्यक्ष - मुख्याध्यापक/प्राचार्यसदस्य - पालक संघाचा प्रतिनिधीपोलीस विभागाचा प्रतिनिधीप्रादेशिक परिवहन विभागाचा मोटार वाहन निरीक्षकशिक्षण निरीक्षकबस कंत्राटदाराचा प्रतिनिधीस्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी>विद्यार्थी वाहतूक नियमावलीपरिवहन समितीकडून वाहनांची कागदपत्रे, प्रथमोपचार, अग्निशमन यंत्रणा याची पडताळणी करणेसमितीची तीन महिन्यांतून किमान एकदा आणि प्रत्येक सत्र सुरू होण्यापूर्वी बैठक घेणेप्रत्येक शालेय प्रशासनाने त्यांच्या शाळेतील मुला-मुलींची योग्य रकमेची सर्वसमावेशक विमा पॉलिसी काढावी. त्याची रक्कम शालेय शुल्कातून वसूल करावी.बसमध्ये प्रशिक्षित चालक, एक पुरुष व एक महिला परिचर असेल.प्रथमोपचार पेटी आणि आवश्यक औषधे व साधने वाहनामध्ये ठेवावीत.बसमध्ये किमान दोन अग्निशमक यंत्रे ठेवलेली असावीत.बसमध्ये संगीत, गाणे लावू नये.परिवहन समित्या कागदावरच : प्रत्येक शाळेमध्ये शालेय परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. बहुतेक शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना करण्यात आली असली तरी या समित्यांच्या बैठकाच होत नाहीत, तर काही शाळांमध्ये समित्यांच्या स्थापनाच करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी या समित्यांनी संबंधित घटकांशी चर्चा करून उपाययोजना करणे अपेक्षित आहे. शाळेच्या मुख्याध्यापक या समितीचे अध्यक्ष असून त्यांच्यावरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. पण अनेक शाळांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Schoolशाळा