शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आपला रिमोट ठेवा आपल्याच हाती

By admin | Updated: October 5, 2016 01:47 IST

आपल्याला मिळालेले आयुष्य इतके स्वस्त नाही... त्याचा कोणत्याही कारणासाठी घात करू नका... मोठे होत असताना आपला रिमोट आपल्या हाती असू

पुणे : आपल्याला मिळालेले आयुष्य इतके स्वस्त नाही... त्याचा कोणत्याही कारणासाठी घात करू नका... मोठे होत असताना आपला रिमोट आपल्या हाती असू द्या, असा सल्ला समुपदेशक शीतल बापट यांनी दिला. निमित्त होते बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे नारायण पेठेतील श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ‘उमलणाऱ्या कळ्या, लेकींना वाचविण्याकरिता जागर’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे. या वेळी बापट यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णलता काळे, आरती पटवर्धन, भाग्यश्री बडवे, मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा, गंधाली शहा आदी उपस्थित होते. लोकमतमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या उमलण्याआधीच खुडल्या कोवळ्या कळ्या या बातमीमधून प्रेरणा घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पीयूष शहा यांनी सांगितले. पुण्यामध्ये प्रेमसंबंध किंवा नैराश्यामुळे किशोरवयीन मुली आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यांना या मागार्पासून परावृत्त करीत मदतीचा हात देण्याकरिता समुपदेशनाचा जागर करण्यात येत आहे. सोमवार पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशाला आणि प्रेमलीला कन्याशाळा येथे अशाच उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये समुपदेशिका उमा माने आणि अनुराधा सहस्रबुद्धे मार्गदर्शन करणार आहेत. प्रेम, आकर्षण आणि शिक्षणातील चढ-उतारामुळे आत्महत्येस प्रवृत्त होणाऱ्या या लेकींना वाचविण्यासाठी नवरात्रामध्ये समुपदेशनाचा जागर करण्यात येणार असल्याचेही शहा म्हणाले.शीतल बापट म्हणाल्या, प्रेम आणि आकर्षण यामधील फरक समजून घ्यायला हवा. जीवनात कोणत्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. जर सोप्या पद्धतीने म्हणजेच शॉर्टकटने एखादे काम झाले, तर ती धोक्याची घंटा आहे. योग्य वेळी आणि वयात जोडीदार निवडायला हवा. आधी शाळा आणि महाविद्यालयात करिअरमधून स्वत:ला ओळखा. जीवनात मित्र-मैत्रिणी आवश्यक आहेत. परंतु योग्य संगत आणि चांगली मैत्री करण्याकरिता तशी दृष्टी विकसित करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कला अकादमीच्या कार्यकर्त्यांनी रांगोळी साकारली. पीयूष शहा यांनी सूत्रसंचालन केले.