शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

वृक्षलागवडीमध्ये सातत्य ठेवा

By admin | Updated: July 2, 2017 01:53 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही चांगली बाब आहे. मात्र अशा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही चांगली बाब आहे. मात्र अशा प्रकारचे कार्यक्रम दर तीन महिन्यांतून राबवून यामध्ये सातत्य ठेवा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केली.जिल्हा परिषद, कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक विभागाच्या वतीने स्व़ वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवकाते बोलत होते़ या वेळी जिल्ह्यातील उत्कृष्ठ शेतकरी आणि शेतकरी गटांचा स्मृतीचिन्ह, व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला़ तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माहिती पुस्तीकेचे प्रकाशनही करण्यात आले़याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, कृषी अधिक्षक सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते़देवकाते म्हणाले की, जिल्ह्यात जिल्हा परिषद व विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातून पाणी अडवा व पाणी जिरवा ही संकल्पना साध्य होणार आहे त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने सिमेंटचे बंधारे बांधावेत़यंदा अर्थसंकल्पामध्ये सेंद्रीस शेतीसाठी अनुदान दीडपट करण्यात आले आहे. दरम्यान कृषी विभागास कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याचेही देवकाते यांनी नमूद केले़ या वेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुजाता पवार आदींची भाषणे झाली़ सुभाष काटकर यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी आभार केले़..तर तुमचे कार्यक्रम तुम्हीच कराकृषी दिनानिमित्त कृषी सभापती सुजाता पवार यांच्या शिरुर तालुक्यात कार्यक्रम आयोजित करावा, असे त्यांना वाटत होते तसेच बारामती तालुक्यातीलही काही ग्रामस्थांना कार्यक्रम तिकडे आयोजित करावा असे वाटत होते. मात्र कृषी विभागातील अधिकारी हा कार्यक्रम पुण्यातच घ्यावा, यावर ठाम होते़ मात्र जिल्हा परिषदेला कुठे कार्यक्रम घ्यायचा हे ठरविण्याचाही अधिकार नसेल तर तुमचे कार्यक्रम तुम्हीच करा अशा शब्दात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी नाराजी व्यक्त केली़ तसेच तुम्ही टाळाटाळ कराल तर पालकमंत्री आणि कृषीमंत्र्यांशी पत्रव्यवहार करु असेही देवकाते यांनी सुनावले़