शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीमध्ये सातत्य ठेवा

By admin | Updated: July 2, 2017 01:53 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही चांगली बाब आहे. मात्र अशा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही चांगली बाब आहे. मात्र अशा प्रकारचे कार्यक्रम दर तीन महिन्यांतून राबवून यामध्ये सातत्य ठेवा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केली.जिल्हा परिषद, कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक विभागाच्या वतीने स्व़ वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवकाते बोलत होते़ या वेळी जिल्ह्यातील उत्कृष्ठ शेतकरी आणि शेतकरी गटांचा स्मृतीचिन्ह, व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला़ तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माहिती पुस्तीकेचे प्रकाशनही करण्यात आले़याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, कृषी अधिक्षक सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते़देवकाते म्हणाले की, जिल्ह्यात जिल्हा परिषद व विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातून पाणी अडवा व पाणी जिरवा ही संकल्पना साध्य होणार आहे त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने सिमेंटचे बंधारे बांधावेत़यंदा अर्थसंकल्पामध्ये सेंद्रीस शेतीसाठी अनुदान दीडपट करण्यात आले आहे. दरम्यान कृषी विभागास कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याचेही देवकाते यांनी नमूद केले़ या वेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुजाता पवार आदींची भाषणे झाली़ सुभाष काटकर यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांनी आभार केले़..तर तुमचे कार्यक्रम तुम्हीच कराकृषी दिनानिमित्त कृषी सभापती सुजाता पवार यांच्या शिरुर तालुक्यात कार्यक्रम आयोजित करावा, असे त्यांना वाटत होते तसेच बारामती तालुक्यातीलही काही ग्रामस्थांना कार्यक्रम तिकडे आयोजित करावा असे वाटत होते. मात्र कृषी विभागातील अधिकारी हा कार्यक्रम पुण्यातच घ्यावा, यावर ठाम होते़ मात्र जिल्हा परिषदेला कुठे कार्यक्रम घ्यायचा हे ठरविण्याचाही अधिकार नसेल तर तुमचे कार्यक्रम तुम्हीच करा अशा शब्दात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी नाराजी व्यक्त केली़ तसेच तुम्ही टाळाटाळ कराल तर पालकमंत्री आणि कृषीमंत्र्यांशी पत्रव्यवहार करु असेही देवकाते यांनी सुनावले़