शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

करंजविहीरेला आले ‘शासन आपल्या दारी’

By admin | Updated: March 28, 2017 23:51 IST

शासनाच्या विविध विभागांना एका छताखाली आणून त्यांच्यात समन्वय निर्माण करणे अतिशय अवघड बाब असते, तरीदेखील

आंबेठाण : शासनाच्या विविध विभागांना एका छताखाली आणून त्यांच्यात समन्वय निर्माण करणे अतिशय अवघड बाब असते, तरीदेखील नागरिकांना विनात्रास विविध दाखले किंवा अन्य कागदपत्रे जागेवर मिळावीत, यासाठी खेड तहसीलने ६ शिबिरांत जवळपास ३२ हजार नागरिकांना लाभ दिला आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार रजा राखीवच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी करंजविहीरे (ता. खेड) काढले.शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत महसूल विभागाच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या विस्तारित समाधान योजनेच्या शिबिराच्या कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.याप्रसंगी रजा राखीवच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, खेडचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, मंदा शिंदे, धोंडाबाई खंडागळे, रोहिदास गडदे, महसूल नायब तहसीलदार बी. बी. बोडके, नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, सहायक निबंधक हर्षित तावरे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक सूरज कावळे, रामदास भोईर, संजय रौंधळ, नवनाथ दरेकर, करंजविहीरे गावचे सरपंच गणपत कोळेकर, उपसरपंच कैलास बोऱ्हाडे, नीलेश घोडके, पाईटचे मंडलाधिकारी एच. ए. सोनावणे, बी. आर. जाधव, एस. एस. आमोलिक, के. एस. मगर, एम. एच. राऊत, बी. एस. राठोड यांच्यासह तालुक्याच्या पश्चिम भागातील मान्यवर उपस्थित होते.या वेळी महसूल विभागाच्या वतीने एकूण १४ प्रकारचे लाभ देण्यात आले. यात डोंगरी विभागाचे ५७२ दाखले, डोमिसाईलचे ४६५ दाखले, शेतकरी असल्याचे ३१६ दाखले, जातीचे ८६ दाखले, जुन्या काळातील परंतु सध्या अस्तित्वात नाहीत, अशा सोसायटीचा बोजा कमी करून इतर अधिकारामधील बोजा करण्याचा फायदा ३५३ शेतकऱ्यांना, कुळकायदा कलम ४३ कमी करण्याचा फायदा ३२ शेतकऱ्यांना, संजय गांधी योजनेचे धनादेश वाटप ९ लाभार्थ्यांना, संजय गांधी लाभ मंजूर आदेश ३ लाभार्थ्यांना, रेशनकार्डवाटप १३०८ नागरिकांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी सुनील गाढे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, रोहिदास गडदे, पांडुरंग मरगज यांनी विचार व्यक्त केले.तहसीलदार सुनील जोशी यांनी प्रास्ताविक केले. संजय कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सोसायटी संचालक रघुनाथ शिवेकर यांनी आभार मानले.सहकार विभागाच्या वतीने ९७४ शेतकऱ्यांना भागदाखला वाटप, २२० शेतकऱ्यांना रूपे कार्ड वाटप, तर आसखेड खुर्द येथील ३१९ शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारामधील चुकलेली नावे दुरुस्त करून देण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या वतीने ५० पिशव्या बियाणेवाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने ८० लोकांची तपासणी करण्यात आली. महिला बचत गटाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर १०० कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.