शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कनेरसरच्या पुलाला भगदाड; वाहतुकीस धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:45 IST

कनेरसर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा भराव खचला असून, पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले आहेत, त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे.

दावडी : कनेरसर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा भराव खचला असून, पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले आहेत, त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे.पुलाला मोठमोठे भगदाड पडले असून, या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी कनेरसरचे माजी सरपंच जवाहर दौंडकर, काळुराम दौंडकर यांनी केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर व शिरूर तालुक्यातील केंदूर व परिसरातील गावांना जोडणारा कनेरसर-केंदूर हा जवळचा रस्ता आहे. तसेच हा रस्ता कनेरसर गावात जातो. गावात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, आरोग्य उपकेंद्र व मोठी लोकवस्ती असल्याने या पुलाचा उपयोग होत असून, या ठिकाणी नेहमीच वाहनांची व नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची या पुलावरून ये-जा सुरु असते. कनेरसर येथे सेझ प्रकल्प असल्याने हा रस्ता नेहमीच वर्दळीचा बनला आहे. ओढ्यावर जुना दगडी पूल आहे. या पुलावरून या परिसरात कंपन्यांच्या कच्च्या मालाची वाहतूक याच रस्त्याने सुरु असते. पुणे, वाघोली, कोरेगाव भीमा येथे जाण्या-येण्यासाठी केंदूर-कनेरसर हा जवळचा रास्ता आहे,काही महिन्यांपूर्वी पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले होते, त्यामुळे हा पूल वाहतुकीला धोकादायक झाला होता. याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकPuneपुणे