शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

कनेरसरच्या पुलाला भगदाड; वाहतुकीस धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:45 IST

कनेरसर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा भराव खचला असून, पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले आहेत, त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे.

दावडी : कनेरसर गावात जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा भराव खचला असून, पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले आहेत, त्यामुळे पूल धोकादायक झाला आहे.पुलाला मोठमोठे भगदाड पडले असून, या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी कनेरसरचे माजी सरपंच जवाहर दौंडकर, काळुराम दौंडकर यांनी केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर व शिरूर तालुक्यातील केंदूर व परिसरातील गावांना जोडणारा कनेरसर-केंदूर हा जवळचा रस्ता आहे. तसेच हा रस्ता कनेरसर गावात जातो. गावात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, आरोग्य उपकेंद्र व मोठी लोकवस्ती असल्याने या पुलाचा उपयोग होत असून, या ठिकाणी नेहमीच वाहनांची व नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची या पुलावरून ये-जा सुरु असते. कनेरसर येथे सेझ प्रकल्प असल्याने हा रस्ता नेहमीच वर्दळीचा बनला आहे. ओढ्यावर जुना दगडी पूल आहे. या पुलावरून या परिसरात कंपन्यांच्या कच्च्या मालाची वाहतूक याच रस्त्याने सुरु असते. पुणे, वाघोली, कोरेगाव भीमा येथे जाण्या-येण्यासाठी केंदूर-कनेरसर हा जवळचा रास्ता आहे,काही महिन्यांपूर्वी पुलाच्या बांधकामाचे दगड निखळले होते, त्यामुळे हा पूल वाहतुकीला धोकादायक झाला होता. याबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलाच्या दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकPuneपुणे