शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

दौंडसाठी जनाई-शिरसाई, पुरंदर उपसा ठरताहेत कुचकामी

By admin | Updated: May 22, 2017 06:38 IST

कायमस्वरूपी दुष्काळी भागांना सिंचनक्षेत्राला वरदान ठरणारी पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यासाठी

रामदास डोंबे । लोकमत न्यूज नेटवर्कखोर : कायमस्वरूपी दुष्काळी भागांना सिंचनक्षेत्राला वरदान ठरणारी पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आघाडी सरकारच्या काळात कार्यान्वित झाली. या योजनेमुळे सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटेल, अशी आशा होती. परंतु, ही योजना कित्येक वर्षांपासून सुरू होऊनसुद्धा दौंडच्या दक्षिणेकडील भागातील गावे अद्यापही या पाण्यापासून वंचित आहे. सरकारचा उदासीनपणा व अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही योजनाच कुचकामी ठरली असल्याबाबात नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेचे पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकरीवर्गाने व्यक्त केले आहे. जनाई-शिरसाई सिंचन योजना ही वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून बंद पाइपद्वारे उचल पाण्याची योजना आहे. या योजनेचा दौंड तालुक्यातील पडवी, कुसेगाव, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, खोर यासह आदी गावांना या योजनेचा लाभ होतो. परंतु, या वर्षी जनाई - शिरसाई सिंचन योजनेतून उन्हाळा कडेला आला असून शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत, तरी या सरकारची व अधिकारी वर्गाची या दोन्ही योजनेतून संबंधित लाभार्थी गावांना पाणी सोडले नाही. पुरंदर उपसा सिंचन योजनेतून (शिंदवणे, ता. हवेली) येथून दौंडच्या दक्षिणेकडील जिरायती भागासाठीच्या खुपटेवाडी फाट्यासाठी जलसंपदा विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून १९ किमी लांबीची बंदिस्त जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीद्वारे डाळिंब, बोरीऐंदी, ताम्हाणवाडी, दरेकरवाडी, भरतगाव, कासुर्डी, यवत, भांडगाव, वाखारी या गावांचे पाझर तलाव, नाले उन्हाळ्यामध्ये पाण्याने भरण्याची योजना आहे. परंतु, या योजनेचे कामे पूर्ण होऊन पाच वर्षे झाली, तरी या गावच्या शेतकऱ्यांना या खुपटेवाडी फाट्याच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही. अनेकवेळा संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी अधिकारी व नेत्यांकडे करूनही याची दाखल घेतली गेली नाही.