शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

दौंडसाठी जनाई-शिरसाई, पुरंदर उपसा ठरताहेत कुचकामी

By admin | Updated: May 22, 2017 06:38 IST

कायमस्वरूपी दुष्काळी भागांना सिंचनक्षेत्राला वरदान ठरणारी पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यासाठी

रामदास डोंबे । लोकमत न्यूज नेटवर्कखोर : कायमस्वरूपी दुष्काळी भागांना सिंचनक्षेत्राला वरदान ठरणारी पुरंदर उपसा सिंचन व जनाई-शिरसाई सिंचन योजना दौंड, पुरंदर आणि बारामती तालुक्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून आघाडी सरकारच्या काळात कार्यान्वित झाली. या योजनेमुळे सिंचनाच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटेल, अशी आशा होती. परंतु, ही योजना कित्येक वर्षांपासून सुरू होऊनसुद्धा दौंडच्या दक्षिणेकडील भागातील गावे अद्यापही या पाण्यापासून वंचित आहे. सरकारचा उदासीनपणा व अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही योजनाच कुचकामी ठरली असल्याबाबात नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेचे पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकरीवर्गाने व्यक्त केले आहे. जनाई-शिरसाई सिंचन योजना ही वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून बंद पाइपद्वारे उचल पाण्याची योजना आहे. या योजनेचा दौंड तालुक्यातील पडवी, कुसेगाव, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, खोर यासह आदी गावांना या योजनेचा लाभ होतो. परंतु, या वर्षी जनाई - शिरसाई सिंचन योजनेतून उन्हाळा कडेला आला असून शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत, तरी या सरकारची व अधिकारी वर्गाची या दोन्ही योजनेतून संबंधित लाभार्थी गावांना पाणी सोडले नाही. पुरंदर उपसा सिंचन योजनेतून (शिंदवणे, ता. हवेली) येथून दौंडच्या दक्षिणेकडील जिरायती भागासाठीच्या खुपटेवाडी फाट्यासाठी जलसंपदा विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून १९ किमी लांबीची बंदिस्त जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीद्वारे डाळिंब, बोरीऐंदी, ताम्हाणवाडी, दरेकरवाडी, भरतगाव, कासुर्डी, यवत, भांडगाव, वाखारी या गावांचे पाझर तलाव, नाले उन्हाळ्यामध्ये पाण्याने भरण्याची योजना आहे. परंतु, या योजनेचे कामे पूर्ण होऊन पाच वर्षे झाली, तरी या गावच्या शेतकऱ्यांना या खुपटेवाडी फाट्याच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही. अनेकवेळा संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी अधिकारी व नेत्यांकडे करूनही याची दाखल घेतली गेली नाही.