शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

उलगडला ‘माझा धनगरवाडा’चा प्रवास; धनंजय धुरगुडे यांचा पुणेकर रसिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:44 IST

धनगर जमातीला समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे, अशा शब्दांत घोंगडी ते लेखणीचा प्रवास धनंजय धुरगुडे यांनी उलगडून दाखविला आणि सुहृदयांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

ठळक मुद्देरोहन प्रकाशनाच्या ३५व्या वर्षानिमित्त सुहृदांचा स्नेहमेळावाअनुभव पुस्तक रूपात हाती आल्यानंतर हे पुस्तक म्हणजे मला माझे प्रतिबिंबच वाटले : धुरगुडे

पुणे : आमच्या वडिलांच्या आग्रहामुळे हातात पाटी पुस्तक घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले. स्वत: च्या पोटाला चिमटे काढून मुलांच्या शिक्षणाला आमच्या वडिलांनी महत्त्व दिले नसते तर आमच्या पुढच्या अनेक पिढ्यांच्या पायाची भिंगरी थांबलीच नसती, शेळ्या मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या धनगर जमातीला समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे, अशा शब्दांत मुलभूत सोयी-सुविधांपासून कोसो दूर राहणाऱ्या आणि रोजच्या संघर्षाला नेटाने तोंड देणाऱ्या धनगरवाड्यातील परिस्थितीतही शिक्षणाचा वसा घेऊन पुढे जाणाऱ्या घोंगडी ते लेखणीचा प्रवास धनंजय धुरगुडे यांनी उलगडून दाखविला आणि सुहृदयांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.निमित्त होते, रोहन प्रकाशनाच्या ३५व्या वर्षानिमित्त आयोजित सुहृदांच्या स्नेहमेळाव्याचे. रोहन प्रकाशनाच्या ‘माझा धनगरवाडा’ या पुस्तकाचे लेखक धनंजय धुरगुडे यांनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, विद्या बाळ, लेखक अच्युत गोडबोले, जयप्रकाश प्रधान, सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, चित्रकार रवी परांजपे, लेखिका मंगला गोडबोले, डॉ. आशुतोष जावडेकर, संजय भास्कर जोशी, किशोर चे संपादक किरण केंद्रे तसेच रोहन प्रकाशनाचे प्रमुख प्रदीप चंपानेरकर आणि रोहन चंपानेरकर उपस्थित होते. दलित आणि मागास समाजाची काही आत्मकथने वाचल्यापासून माझ्याही मनात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे आपणही आपला आणि आपल्या समाजाचा संघर्ष पुस्तक रूपाने मांडावा या भावनेतून मी हे पुस्तक लिहिले. सुमारे अडीच वर्ष मी पुस्तकाचे लेखन करीत होतो आणि माझे हे अनुभव प्रत्यक्ष पुस्तक रूपात हाती आल्यानंतर हे पुस्तक म्हणजे मला माझे प्रतिबिंबच वाटले, अशी भावना धुरगुडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Vidya Balविद्या बाळPuneपुणे