शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आर्थिक लुटीचा प्रवास सुरू आहे बिनधास्त

By admin | Updated: April 18, 2017 02:56 IST

शाळांना सुटी लागल्यामुळे नागरिकांना गावाकडे जायची ओढ निर्माण झाली आहे. घराजवळच ट्रॅव्हल्स उपलब्ध होत आहेत.

पिंपरी : शाळांना सुटी लागल्यामुळे नागरिकांना गावाकडे जायची ओढ निर्माण झाली आहे. घराजवळच ट्रॅव्हल्स उपलब्ध होत आहेत. पण ट्रॅव्हल्सच्या मालकाने मनमानी पद्धतीने भाडेवाढ केली आहे. त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. एसटीच्या अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. आर्थिक लुटीच्या प्रवासाबाबत ‘लोकमत’ टीमने केलेली पाहणी...रहाटणी : ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांनी मनमानी भाडेवसुली सुरु केली असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. मनमानी भाडेवाढ म्हणजे प्रवाशांची लूटच असल्याचे बोलले जात आहे. अशा मनमानी भाडेवाढीवर प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची माफक अपेक्षा प्रवासी करीत आहेत. शाळांना सुटी लागल्याने उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रेल्वेगाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळाले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी प्रवासी भाड्यात मनमानी पद्धतीने भरमसाट वाढ केली असल्यामुळे प्रवाशांना प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे.उन्हाळ्यात मुलांना सुटी लागली, की बहुतांश पालक बाहेरगावी जाण्याचे ‘प्लॅनिंग’ करतात. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे आरक्षण तीन महिन्यांपूर्वीच फुल्ल होऊन जाते. यामुळे प्रवासी सध्या खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून राज्यातील व राज्याबाहेरील विविध शहरांत जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी तिकिटाचे दर अचानक वाढविले आहेत. कुटुंबासह प्रवास सुखाचा होण्यासाठी बहुतांश प्रवासी जादा रक्कम मोजून खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहेत. उन्हाळ्यात दर वर्षी १0 ते १५ टक्के आणि दिवाळीच्या सिझनमध्ये ५0 टक्क्यांवर खासगी ट्रॅव्हल्सचे प्रवासभाडे वाढविण्यात येत असल्याचे ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी सांगितले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातून सर्वाधिक खासगी बस लातूर, उदगीर, निलंगा, नांदेड, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, जळगाव, भुसावळ, कोल्हापूर यासह परराज्यांतही रोज शेकडो खासगी प्रवासी साध्या, वातानुकुलित, स्लीपर कोच सुविधा असणाऱ्या बसमधून प्रवास करीत आहेत. उन्हाळी सुटी लागली म्हणून लगेच भाडेवाढ केली जाते असे नाही, तर ज्या आठवड्यात लग्नाच्या तारखा आहेत, हे पाहून भाडेवाढ केली जाते. तसेच या दिवसांत शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी हमखास भाडेवाढ केली जाते. (वार्ताहर)दाद कोणाकडे मागायची?निगडी :दर वर्षी उन्हाळी सुटीत नागरिक मोठ्या प्रमाणात गावाकडे ये-जा करतात. त्यामुळे या सिझनमध्ये प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रवासी रेल्वेचे आगाऊ तिकीट बुक करून ठेवतात. काही प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. मात्र सर्वसामान्य नागरिकांना, कामगार वर्गाला हे जमतेच असे नाही. त्यामुळे बहुतांश प्रवासी ऐन वेळी खासगी बसकडे वळतात याचाच फायदा घेत खासगी बसमालक अचानक भाडेवाढ करतात. अशा भाडेवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. अशी अचानक भाडेवाढ कशासाठी अशी विचारणा केली, तर याचे काही उत्तर नसते. मग ही मनमानी भाडे वाढ का, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. या भाडेवाढीवर नियंत्रण कोणाचे हा खरा प्रश्न आहे. ट्रॅव्हल्सच्या भाड्याची प्रतीक्षापिंपळे गुरव : मुलांच्या शालेय परीक्षा संपल्याने व उन्हाळी सुटीत गावी जाण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र ट्रव्हल्सवाले प्रवाशांकडून या ना त्या कारणाने जास्तीची रक्कम वसूल केली जात आहे.नवी सांगवीच्या साई चौकांमध्ये टॅ्रव्हलची बुकिंग सुरू असते. सांगवी, दापोडी व पिंपळे गुरव परिसरात बाहेरच्या जिल्ह्यांतील हजारो नागरिक नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करीत आहेत. त्यामध्ये सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, उमरगा, आंबेजोगाई आदी ठिकाणचे नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सोयीस्कर वाहन म्हणून ट्रॅव्हलकडे पाहतात. मात्र ट्रॅव्हलवाल्यांकडून प्रवाशांची फसवणूक होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.अडचणीचा घेतला जातो फायदा!दिघी : परिसरातील बहुतांश रहिवासी मराठवाडा, विदर्भ, खानदेशमधून आले आहेत. नोकरीच्या निमित्ताने कायम रहिवासी झाले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सशिवाय दुसरा पर्याय नाही. ही प्रवाशांची अडचण समजून ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवासभाडे मनमानी आकारत नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याची सत्य परिस्थिती आहे. रेल्वे आरक्षण मिळण्याची शाश्वती नाही. एसटीचा प्रवास समाधानकारक नाही. त्यामुळे नागरिकांचा ओढा खासगी ट्रॅव्हल्सकडे वळाल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांचे फावले आहे. उन्हाळ्याच्या सुट्या, दिवाळी, लग्नसराई, नाताळ, ईद अशा सणासुदीच्या दिवसाला तिकिटाचे दर गगनाला भिडलेले असतात. इतर वेळी पाचशे रुपये असणारे प्रवासी भाडे सणाच्या दिवशी हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत, तर दिवाळीच्या सुटीत दोन-तीन हजारांवर जाऊन पोहोचते. आता मुलांच्या परीक्षा संपून सुट्या लागल्या आहेत.