शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गाय तुमच्याकडे ठेवा, आमचे मूलभूत प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 07:33 IST

गाय वाचविणे हा देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न समजून त्यासाठी माणसे मारणाºयांनी आणि त्यांना पाठीशी घालणाºया सरकारांनी आपल्या या मातेला जरूर आपल्याजवळ ठेवावे

पुणे : गाय वाचविणे हा देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न समजून त्यासाठी माणसे मारणाºयांनी आणि त्यांना पाठीशी घालणाºया सरकारांनी आपल्या या मातेला जरूर आपल्याजवळ ठेवावे. परंतु तत्पूर्वी दलित, अल्पसंख्य, महिला, गरिबांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत, असे आवाहन आझादी कूच आंदोलनाचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी मंगळवारी केले.हिंदी है, हिंदोस्तां हमारा परिषदेच्या वतीने रविवारी पुण्यात हिंसाचारविरोधी अमन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये अनोख्या पद्धतीने परिषदेचे उद्घाटन झाले. ‘सर्व त्या संविधानिक मार्गाने हिंसाचार रोखा,’ असे देशाच्या राष्ट्रपतींना आवाहन करणारे पत्र मेवाणी यांनी पोस्टपेटीच्या प्रतिकृतीत टाकले आणि परिषदेचे उद्घाटन झाले. या वेळी महिला नेत्या डॉ. मनीषा गुप्ते, हिंदोस्तां हमारा परिषदेचे नेते हुमायून मुरसल, निवृत्त कर्नल सुरेश पाटील, संयोजक नितीन पवार मंचावर उपस्थित होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी हाजी नदाफ होते.गेल्या वर्षी जुलैमध्येच उना, गुजरात येथे मेलेली जनावरे ओढण्याचे काम करणाºया चार दलित तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली. गाय मारल्याच्या संशयावरून या तरुणांना अर्धनग्न करून वाहनाला बांधून लोखंडी रॉड, पट्टे, काठ्यांनी कथित गोरक्षकांनी मारले. त्याविरुद्ध मेवाणी यांनी उभे केलेले प्रचंड आंदोलन देशभर गाजले. त्याचा संदर्भ देऊन मेवाणी म्हणाले, ‘‘उना आंदोलन हे स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून उभे राहिले. तरी गेले वर्षभर त्याच्या मूलभूत कारणांचा आम्ही शोध घेत होतो. त्या वेळी दलितांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या ताब्यात नसल्याचे पुढे आले. म्हणून उना घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आम्ही जमिनीची मागणी करत आझादी कूच आंदोलन केले. परिणामी दलितांची हिसकावलेली हजारो एकर जमीन त्यांना परत मिळाली. आता जनावरे ओढण्याची आवश्यकता राहणार नाही. ते काम गोमातेच्या लेकरांनी करावे. पाणी, शिक्षण, रोजगार, वीज अशा मूलभूत प्रश्नांवर दलित, मुस्लिमांनी लढे उभे करावेत. कथित धर्मरक्षकांच्या हिंसेला हेच उत्तर आहे. त्यासाठी दलित मुस्लिमांनी एकजूट केली पाहिजे. जातीअंत हेच अंतिम उद्दिष्ट ठेवायला हवे.’’ मनीषा गुप्ते, हाजी मरसूल यांनी विचार व्यक्त केले. नितीन पवार यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सादिक लुकडे यांनी आभार मानले.