शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

गाय तुमच्याकडे ठेवा, आमचे मूलभूत प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 07:33 IST

गाय वाचविणे हा देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न समजून त्यासाठी माणसे मारणाºयांनी आणि त्यांना पाठीशी घालणाºया सरकारांनी आपल्या या मातेला जरूर आपल्याजवळ ठेवावे

पुणे : गाय वाचविणे हा देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न समजून त्यासाठी माणसे मारणाºयांनी आणि त्यांना पाठीशी घालणाºया सरकारांनी आपल्या या मातेला जरूर आपल्याजवळ ठेवावे. परंतु तत्पूर्वी दलित, अल्पसंख्य, महिला, गरिबांचे मूलभूत प्रश्न सोडवावेत, असे आवाहन आझादी कूच आंदोलनाचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी मंगळवारी केले.हिंदी है, हिंदोस्तां हमारा परिषदेच्या वतीने रविवारी पुण्यात हिंसाचारविरोधी अमन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये अनोख्या पद्धतीने परिषदेचे उद्घाटन झाले. ‘सर्व त्या संविधानिक मार्गाने हिंसाचार रोखा,’ असे देशाच्या राष्ट्रपतींना आवाहन करणारे पत्र मेवाणी यांनी पोस्टपेटीच्या प्रतिकृतीत टाकले आणि परिषदेचे उद्घाटन झाले. या वेळी महिला नेत्या डॉ. मनीषा गुप्ते, हिंदोस्तां हमारा परिषदेचे नेते हुमायून मुरसल, निवृत्त कर्नल सुरेश पाटील, संयोजक नितीन पवार मंचावर उपस्थित होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी हाजी नदाफ होते.गेल्या वर्षी जुलैमध्येच उना, गुजरात येथे मेलेली जनावरे ओढण्याचे काम करणाºया चार दलित तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आली. गाय मारल्याच्या संशयावरून या तरुणांना अर्धनग्न करून वाहनाला बांधून लोखंडी रॉड, पट्टे, काठ्यांनी कथित गोरक्षकांनी मारले. त्याविरुद्ध मेवाणी यांनी उभे केलेले प्रचंड आंदोलन देशभर गाजले. त्याचा संदर्भ देऊन मेवाणी म्हणाले, ‘‘उना आंदोलन हे स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून उभे राहिले. तरी गेले वर्षभर त्याच्या मूलभूत कारणांचा आम्ही शोध घेत होतो. त्या वेळी दलितांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या ताब्यात नसल्याचे पुढे आले. म्हणून उना घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आम्ही जमिनीची मागणी करत आझादी कूच आंदोलन केले. परिणामी दलितांची हिसकावलेली हजारो एकर जमीन त्यांना परत मिळाली. आता जनावरे ओढण्याची आवश्यकता राहणार नाही. ते काम गोमातेच्या लेकरांनी करावे. पाणी, शिक्षण, रोजगार, वीज अशा मूलभूत प्रश्नांवर दलित, मुस्लिमांनी लढे उभे करावेत. कथित धर्मरक्षकांच्या हिंसेला हेच उत्तर आहे. त्यासाठी दलित मुस्लिमांनी एकजूट केली पाहिजे. जातीअंत हेच अंतिम उद्दिष्ट ठेवायला हवे.’’ मनीषा गुप्ते, हाजी मरसूल यांनी विचार व्यक्त केले. नितीन पवार यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सादिक लुकडे यांनी आभार मानले.