शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

समुद्रमार्गे भारतात हल्ला करण्याची जैशची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 04:49 IST

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सिंग : आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नौदल सज्ज

पुणे : जैश-ए-मोहम्मद समुद्रमार्गे हल्ल्याची तयारी करत असून त्या प्रकारचे प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिले जात आहे. या बाबतची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. मात्र, सर्व हल्ले रोखण्यास भारतीय नौदल सज्ज आहे, अशी माहिती नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी दिली.पुणे विद्यापीठाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्रविभाग व लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या धनवंतरी सभागृहात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.सिंग म्हणाले, सहा दहशतवादी समुद्रामार्गे देशात घुसल्याची आणि समुद्रामार्गे हल्ला होण्याची माहिती गुप्तचर विभागामार्फत मिळाली आहे. यामुळे आम्ही समुद्रात टेहळणी वाढवली आहे. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याची प्रमुख जबाबदारी नौदलाची आहे. समुद्रसीमांच्या रक्षणासाठी सागरी सुरक्षा दल, कोस्टगार्ड, राज्यशासन यांच्यात समन्वय साधून एकत्र काम केले जात आहे. जागतिक महासत्ता होण्याची चीनची महत्वाकांक्षा आहे. यामुळे हिंद महासागरात त्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी सांगितले.नौदलाच्या निधीत वाढ होणे गरजेचेनौदलाला २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात १८ टक्के वाटा मिळत होता. मात्र, हा निधी आता १३ टक्यांवर आला आहे. सध्याची सागरी सुरक्षेची आव्हाने बघता त्यात वाढ होणे गरजेचे आहे,’’ असे विचार अ‍ॅडमिरल सिंग यांनी व्यक्त केले. सध्याची भारतीय नौदलाची परिस्थिती पाहता तीन विमानवाहू युद्ध नौका असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने युद्धपोत बनविण्याचा वेग वाढवावा लागणार आहे.