शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

समुद्रमार्गे भारतात हल्ला करण्याची जैशची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 04:49 IST

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सिंग : आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नौदल सज्ज

पुणे : जैश-ए-मोहम्मद समुद्रमार्गे हल्ल्याची तयारी करत असून त्या प्रकारचे प्रशिक्षण दहशतवाद्यांना दिले जात आहे. या बाबतची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. मात्र, सर्व हल्ले रोखण्यास भारतीय नौदल सज्ज आहे, अशी माहिती नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी दिली.पुणे विद्यापीठाचे संरक्षण आणि सामरिक शास्त्रविभाग व लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या वतीने आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या धनवंतरी सभागृहात जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.सिंग म्हणाले, सहा दहशतवादी समुद्रामार्गे देशात घुसल्याची आणि समुद्रामार्गे हल्ला होण्याची माहिती गुप्तचर विभागामार्फत मिळाली आहे. यामुळे आम्ही समुद्रात टेहळणी वाढवली आहे. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याची प्रमुख जबाबदारी नौदलाची आहे. समुद्रसीमांच्या रक्षणासाठी सागरी सुरक्षा दल, कोस्टगार्ड, राज्यशासन यांच्यात समन्वय साधून एकत्र काम केले जात आहे. जागतिक महासत्ता होण्याची चीनची महत्वाकांक्षा आहे. यामुळे हिंद महासागरात त्यांचा वावर वाढला आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी सांगितले.नौदलाच्या निधीत वाढ होणे गरजेचेनौदलाला २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात १८ टक्के वाटा मिळत होता. मात्र, हा निधी आता १३ टक्यांवर आला आहे. सध्याची सागरी सुरक्षेची आव्हाने बघता त्यात वाढ होणे गरजेचे आहे,’’ असे विचार अ‍ॅडमिरल सिंग यांनी व्यक्त केले. सध्याची भारतीय नौदलाची परिस्थिती पाहता तीन विमानवाहू युद्ध नौका असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने युद्धपोत बनविण्याचा वेग वाढवावा लागणार आहे.