शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

अश्विनीच्या मृत्यूने ‘जे’ ब्लॉक स्तब्ध

By admin | Updated: January 21, 2015 00:31 IST

एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉक परिसर अक्षरश: स्तब्ध झाला. अश्विनीबाबत हळहळ व्यक्त होत असताना पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

पिंपरी : छेडछाड व पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे मृत्यूला कवटाळलेल्या अश्विनीने जगाचा निरोप घेतल्याची बातमी समजताच वारकड कुटुंबीय राहत असलेले इंद्रायणीनगर, तसेच त्यांचे कँटीन असलेल्या एमआयडीसीतील ‘जे’ ब्लॉक परिसर अक्षरश: स्तब्ध झाला. अश्विनीबाबत हळहळ व्यक्त होत असताना पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. इंद्रायणीनगर येथील राजवाडा परिसरात वारकड कुटुंब वास्तव्यास आहे. पती, पत्नी दोन मुलांसह राहत असलेल्या या कुटुंबाचा उदरनिर्वाह एमआयडीसीतील छोट्याशा कँटीनवर सुरू आहे. त्यामुळे दोन्ही मुले शाळेत गेली, की पतीसह पत्नीदेखील कँटीनवर जात असे. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील वारकड कुटुंबीय सुरुवातीला भोसरीतील लांडगेनगर येथे राहत होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी इंद्रायणीनगर येथे राजवाडा परिसरात भाड्याने सदनिका घेतली. नवख्या ठिकाणी आल्यानंतर कुटुंबावर अशी वेळ येईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. ३१ डिसेंबरला वारकड कुटुंबीय राहत असलेल्या राजवाडा सोसायटीत अश्विनीची छेडछाड करणाऱ्यांनी गोंधळ घातला होता. पालकांना धक्काबुक्की करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या घटनेची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. दरम्यान, २ जानेवारीला अश्विनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री अश्विनीचा मृत्यू झाल्याने इंद्रायणीनगरातील रहिवाशांना धक्काच बसला. अंत्यसंस्कारांसाठी वारकड कुटुंबीय मूळ गावी गेले असले, तरी नागरिक त्यांच्या घरासमोर गर्दी करीत आहेत. परिसरातील महिला घोळक्याने बसून या घटनेबाबत चर्चा करीत असतानाच स्वत:च्या मुलींच्या सुरक्षिततेबाबतही काळजी व्यक्त करीत आहेत. दररोज एमआयडीसीतील वारकड यांच्या कँटीनमध्ये चहा अथवा नाश्त्यासाठी जाणारे कामगार या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत. २ जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर अश्विनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई-वडील दोघेही तिच्या जवळच असायचे. त्यामुळे २ जानेवारीपासून कँटीन बंदच आहे. (प्रतिनिधी)