शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आधीच बेहाल, त्यात सुविधांचाही दुष्काळ

By admin | Updated: April 10, 2016 04:10 IST

पावसाचे कमी प्रमाण, सोयीसुविधांचा अभाव यांमुळे जिल्ह्यातील ५० पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या १४४ गावांना शासनाने दुष्काळी जाहीर केले आहे. शासकीय धोरणानुसार या गावांना

पुणे : पावसाचे कमी प्रमाण, सोयीसुविधांचा अभाव यांमुळे जिल्ह्यातील ५० पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या १४४ गावांना शासनाने दुष्काळी जाहीर केले आहे. शासकीय धोरणानुसार या गावांना सवलती व मदत मिळणे आवश्यक असतानाही ती दुष्काळी सुविधांपासून वंचित आहेत. या गावांना मदत देणे बंधनकारक असतानाही प्रशासकीय पातळीवरच कुठल्याच उपाययोजना झालेल्या नसल्याची माहिती ‘लोकमत’च्या पाहणीत पुढे आली आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण, वाढता उन्हाळा यामुळे ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे दुष्काळी गावे म्हणून जाहीर केली जातात. यावर्षी जिल्ह्यातील जवळपास १४४ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. अशा गावांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधा जाहीर केल्या जातात. या गावांना अग्रक्रमाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा व विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क माफी व वीजबिल माफी आदी सवलती लागू केल्या जातात; तसेच इतर सुविधा देणे शासनाने देणे बंधनकारक असते. जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी गावे बारामती तालुक्यात आहे. जवळपास ६६ गावांनी पाण्यासाठी टँकर, चारा सारख्या सुविधांसाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्या खालोखाल इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे आहेत; मात्र या गावांना अद्यापही प्रशासकीय मदत मिळालेली नाही.शासनाने टंचाई असलेल्या गावांमध्ये कर्जवसुली स्थगिती, परीक्षा फी माफ आणि शेतीपंपावर वीजबिलांत ३३ टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे; मात्र या सवलती देणाऱ्या विभागांनी त्या जाहीर केलेल्या नाहीत. त्यांना सवलती देण्याचे निर्देश मिळाले नाहीत. याबाबत त्या-त्या विभागांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.पाऊस आणि आवर्तन दुष्काळाला तारेलदौंड तालुक्यात २० टँकर मंजूर झाले असून, त्याद्वारे दुष्काळग्रस्त गावांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा केला जात आहे. कारण, पाण्याची पातळी जमिनीपासून ३ फूट खोलवर गेलेली आहे. त्यामुळे दौंड, वरवंड, माटोबा या तलावांतील पाणी टँकरद्वारे भरले जाते. या तिन्ही तलावांत एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. परिणामी, भविष्यात पडणारा पाऊस आणि पाण्याचे आवर्तन या दोन गोष्टीच दुष्काळात तारू शकतील. - संतोष हराळे,गटविकास अधिकारी, दौंड...तर अनुदान देता येईल५० टक्केच्या आतील आणेवारी असलेल्या गावांना शासनाकडून मदत देण्याचे ठरल्यानंतर, त्यांना अनुदान देता येईल; मात्र अद्याप तसे काही ठरलेले नाही; तसेच काही टंचाईग्रस्त गावांसाठी पाण्याचे टँकर सुरू आहेत. परिणामी जी काही मदत शासन पातळीवरून करता येईल, ती सुरू आहे. - उत्तम दिघे, तहसीलदार, दौंड