शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आधीच बेहाल, त्यात सुविधांचाही दुष्काळ

By admin | Updated: April 10, 2016 04:10 IST

पावसाचे कमी प्रमाण, सोयीसुविधांचा अभाव यांमुळे जिल्ह्यातील ५० पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या १४४ गावांना शासनाने दुष्काळी जाहीर केले आहे. शासकीय धोरणानुसार या गावांना

पुणे : पावसाचे कमी प्रमाण, सोयीसुविधांचा अभाव यांमुळे जिल्ह्यातील ५० पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या १४४ गावांना शासनाने दुष्काळी जाहीर केले आहे. शासकीय धोरणानुसार या गावांना सवलती व मदत मिळणे आवश्यक असतानाही ती दुष्काळी सुविधांपासून वंचित आहेत. या गावांना मदत देणे बंधनकारक असतानाही प्रशासकीय पातळीवरच कुठल्याच उपाययोजना झालेल्या नसल्याची माहिती ‘लोकमत’च्या पाहणीत पुढे आली आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण, वाढता उन्हाळा यामुळे ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे दुष्काळी गावे म्हणून जाहीर केली जातात. यावर्षी जिल्ह्यातील जवळपास १४४ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. अशा गावांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधा जाहीर केल्या जातात. या गावांना अग्रक्रमाने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा व विद्यार्थ्यांना शिक्षणशुल्क माफी व वीजबिल माफी आदी सवलती लागू केल्या जातात; तसेच इतर सुविधा देणे शासनाने देणे बंधनकारक असते. जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी गावे बारामती तालुक्यात आहे. जवळपास ६६ गावांनी पाण्यासाठी टँकर, चारा सारख्या सुविधांसाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्या खालोखाल इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे आहेत; मात्र या गावांना अद्यापही प्रशासकीय मदत मिळालेली नाही.शासनाने टंचाई असलेल्या गावांमध्ये कर्जवसुली स्थगिती, परीक्षा फी माफ आणि शेतीपंपावर वीजबिलांत ३३ टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे; मात्र या सवलती देणाऱ्या विभागांनी त्या जाहीर केलेल्या नाहीत. त्यांना सवलती देण्याचे निर्देश मिळाले नाहीत. याबाबत त्या-त्या विभागांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.पाऊस आणि आवर्तन दुष्काळाला तारेलदौंड तालुक्यात २० टँकर मंजूर झाले असून, त्याद्वारे दुष्काळग्रस्त गावांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा केला जात आहे. कारण, पाण्याची पातळी जमिनीपासून ३ फूट खोलवर गेलेली आहे. त्यामुळे दौंड, वरवंड, माटोबा या तलावांतील पाणी टँकरद्वारे भरले जाते. या तिन्ही तलावांत एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. परिणामी, भविष्यात पडणारा पाऊस आणि पाण्याचे आवर्तन या दोन गोष्टीच दुष्काळात तारू शकतील. - संतोष हराळे,गटविकास अधिकारी, दौंड...तर अनुदान देता येईल५० टक्केच्या आतील आणेवारी असलेल्या गावांना शासनाकडून मदत देण्याचे ठरल्यानंतर, त्यांना अनुदान देता येईल; मात्र अद्याप तसे काही ठरलेले नाही; तसेच काही टंचाईग्रस्त गावांसाठी पाण्याचे टँकर सुरू आहेत. परिणामी जी काही मदत शासन पातळीवरून करता येईल, ती सुरू आहे. - उत्तम दिघे, तहसीलदार, दौंड