शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

मोडून पडला संसार तरी...

By admin | Updated: March 29, 2017 00:26 IST

येथे पाच झोपड्यांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख जळून खाक झाले. या आगीत नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले

दावडी : येथे पाच झोपड्यांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख जळून खाक झाले. या आगीत नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले असून क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे.दावडी येथील गव्हाणेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नानुबाई पांडुरंग जाधव, दीपक पांडुरंग जाधव, सोमनाथ पांडुरंग जाधव व चिमा बबन भालेराव गेल्या १८ वर्षांपासून येथे झोपड्या बांधून राहत होते. शेती करणे, ज्वारी-बाजरी राखण्याची कामे घेणे असे हे कुंटुबकाम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी (दि. २७) सर्व जण जेवण करून रात्री १० वाजता झोपले असता अचानक झोपडीला आग लागली. झोपडीत नवीन घरकामांसाठी वडिलांनी दिलेले सात लाख रुपये नानुबाई जाधव झोपडीतील ठेवलेल्या साडीत गुंडाळून ठेवले होते. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे साडीत गुंडाळून ठेवलेले पैसे बाहेर काढता आले नाहीत. तसेच बाजरीच्या धान्याची पोती, घरात ठेवलेला एक तोळ्याचा सोन्याचा दागिना, कपडे, भांडी, लहान मुलांची शाळेची दप्तरे तसेच संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्या असून एकूण ९ लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाले आहे. अनिता जाधव या महिलेच्या पाठीला झोपडीत झोपलेल्या मुलांना बाहेर काढताना भाजले आहे.या आगीत नुकसान झालेल्या वस्तूंचा पंचनामा तलाठी डी. एम. खोमणे, कोतवाल देवेंद्र ओव्हाळ यांची केला आहे. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, खेडचे आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी महिलेची विचारपूस करून तातडीची मदत म्हणून ११ हजार रुपये रोख या कुटुंबाला दिले. या कुटुंबाला पुनर्वसनासाठी मदत केली जाईल, असे आमदार गोरे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई पानसरे, तसेच खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन या कुटुंबाला धीर दिला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, निमगावचे सरपंच अमर शिंदे-पाटील, विजयसिंह शिंदे आदींनी भेट दिली. अर्ध्या तासात सारे नष्टझोपडी गवत व ताटांची असल्यामुळे तसेच रात्री वारा सुटल्यामुळे आग क्षणात सगळीकडे पसरली. झोपड्या एकमेकांना लागून असल्यामुळे अर्धा तासात जळून खाक झाल्या. झोपडीतील महिला-पुरुष मंडळींनी आरडाओरडा केला. जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आग विझवण्यासाठी जवळपास पाणी नसल्यामुळे आग विझवता आली नाही.