शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

मोडून पडला संसार तरी...

By admin | Updated: March 29, 2017 00:26 IST

येथे पाच झोपड्यांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख जळून खाक झाले. या आगीत नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले

दावडी : येथे पाच झोपड्यांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख जळून खाक झाले. या आगीत नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले असून क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे.दावडी येथील गव्हाणेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नानुबाई पांडुरंग जाधव, दीपक पांडुरंग जाधव, सोमनाथ पांडुरंग जाधव व चिमा बबन भालेराव गेल्या १८ वर्षांपासून येथे झोपड्या बांधून राहत होते. शेती करणे, ज्वारी-बाजरी राखण्याची कामे घेणे असे हे कुंटुबकाम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी (दि. २७) सर्व जण जेवण करून रात्री १० वाजता झोपले असता अचानक झोपडीला आग लागली. झोपडीत नवीन घरकामांसाठी वडिलांनी दिलेले सात लाख रुपये नानुबाई जाधव झोपडीतील ठेवलेल्या साडीत गुंडाळून ठेवले होते. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे साडीत गुंडाळून ठेवलेले पैसे बाहेर काढता आले नाहीत. तसेच बाजरीच्या धान्याची पोती, घरात ठेवलेला एक तोळ्याचा सोन्याचा दागिना, कपडे, भांडी, लहान मुलांची शाळेची दप्तरे तसेच संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्या असून एकूण ९ लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाले आहे. अनिता जाधव या महिलेच्या पाठीला झोपडीत झोपलेल्या मुलांना बाहेर काढताना भाजले आहे.या आगीत नुकसान झालेल्या वस्तूंचा पंचनामा तलाठी डी. एम. खोमणे, कोतवाल देवेंद्र ओव्हाळ यांची केला आहे. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, खेडचे आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी महिलेची विचारपूस करून तातडीची मदत म्हणून ११ हजार रुपये रोख या कुटुंबाला दिले. या कुटुंबाला पुनर्वसनासाठी मदत केली जाईल, असे आमदार गोरे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई पानसरे, तसेच खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन या कुटुंबाला धीर दिला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, निमगावचे सरपंच अमर शिंदे-पाटील, विजयसिंह शिंदे आदींनी भेट दिली. अर्ध्या तासात सारे नष्टझोपडी गवत व ताटांची असल्यामुळे तसेच रात्री वारा सुटल्यामुळे आग क्षणात सगळीकडे पसरली. झोपड्या एकमेकांना लागून असल्यामुळे अर्धा तासात जळून खाक झाल्या. झोपडीतील महिला-पुरुष मंडळींनी आरडाओरडा केला. जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आग विझवण्यासाठी जवळपास पाणी नसल्यामुळे आग विझवता आली नाही.