शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डिजीटायझेशनद्वारे दलालांना व्यवस्थेमधून दूर फेकणे शक्य : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 18:14 IST

अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) पुणे विभागातर्फे एकदिवसीय सारथ्य समाजाचे विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्यास दलाल हद्दपार : फडणवीसमेळाव्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट यांचे लावले होते स्टॉल

पुणे : शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली दलाल आपले खिसे भरत असून खऱ्या लाभार्थ्यांना लाभच मिळत नाही. शासकीय योजनांना सर्वाधिक भिती दलालांची असून डिजीटायझेशनद्वारे दलालांना व्यवस्थेमधून दूर फेकण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्यास दलाल हद्दपार होतील असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) पुणे विभागातर्फे एकदिवसीय सारथ्य समाजाचे विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, सारंग निर्मळ, कृष्णकुमार गोयल, अतुल वझे, सारंगधर निर्मल, हर्षल मोर्डे, मयूर राजे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, समाजातील नकारात्मकता प्रकर्षाने पुढे येते. वास्तविक समाजात सकारात्मकतेचे प्रमाण अधिक आहे. सज्जन शक्ती अधिक असूनही दुर्जनांचा प्रभाव वाढलेला दिसतो. त्यामुळेच निराशेचा सूर सतत उमटत असतो. सकारात्मकता आणण्यासाठी समाजच पुढे आला पाहिजे. सरकार आपले करीत असते. परंतु, सरकारवर अवलंबून परिवर्तन होत नाही. सरकार जर सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे माध्यम ठरले असते तर गेल्या ७० वर्षात एकही गरीब, वंचित राहिला नसता. आजवर सरकार आणि अधिकाऱ्यांमध्ये आपण मालक असल्याची भावना बळावली. जनता आमच्यावर अवलंबून असल्याची मानसिकता तयार झाल्यास सरकारमध्ये अंतर पडते. योजना केवळ सरकारच्या राहतात त्या नागरिकांच्या होत नाहीत. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सेवेचा भाव असणे आवश्यक असून लोकसहभाग वाढायला हवा असे फडणवीस म्हणाले. जेव्हा शासकीय अधिकारी सामान्य लोकांना जवळचे वाटू लागतील त्यावेळी समाजाच्या विकासाला आणि परिवर्तनाला सुरूवात होईल. शासकीय योजनांचा आत्मा हा लोकसहभाग हाच आहे. वेगवेगळ्या चौदा शासकीय योजना व विविध विभागांना एकत्र करून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. लोकसहभागासह सामाजिक संस्था व व्यक्तींच्या सकारात्मक सहभागामुळे आज महाराष्ट्र दुष्काळमुक्तीकडे दमदार वाटचाल करत आहे. शास्त्रीय दृष्टीकोन समोर ठेवून शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविले. त्यासाठी जलमित्र ही संकल्पना राबविण्यात आली. या जलमित्रांनी राज्यात जलक्रांती करून दाखवली आहे. सकारात्मकतेचे हे आपल्या समोरील सर्वात मोठे उदाहरहण असल्याचे फडणवीस म्हणाले. मेळाव्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्था, संघटना, युवक मंडळे, महिला बचत गट यांचे स्टॉल लावण्यात आले होते. अनिल माहिते यांनी प्रास्ताविक केले. अतुल वझे, महापौर मुक्ता टिळक यांनी मनोगत व्यक्त केले. तर रविंद्र दहाड यांनी आभार मानले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे