शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

‘छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 06:52 IST

Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते, तर एकही हिंदू उरला नसता, असेही ते म्हणाले.

पुणे : छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीरच होते. त्यांना धर्मवीर न म्हणणे हे त्यांच्या विचारांशी द्रोह आहे, असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नाव न घेता लगावला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रात नसते, तर एकही हिंदू उरला नसता, असेही ते म्हणाले.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होेते. ते म्हणाले, “संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचाही विरोध नाही, ते स्वराज्य रक्षक आहेतच. मात्र, ते धर्मवीर नाहीत, असे म्हणणे हा त्यांच्या विचारांशी द्रोह आहे. हा त्यांच्यावर अन्यायच आहे. संभाजी महाराजांना अनन्वित अत्याचार का सहन करावे लागले? औरंगजेबाने काय मागणी केली होती? खऱ्या अर्थाने देव, देश आणि धर्मासाठी संभाजी महाराज लढले.” 

शरद पवार यांना आम्ही जाणता राजाच म्हणू, असे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “कोणाला काय म्हणायचे असेल ते म्हणावे. माझे म्हणणे एवढेच आहे की, या देशात एकच जाणते राजे होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कुणाला आपल्या नेत्यांना काय म्हणायचे असेल ते म्हणावे जनता मात्र, म्हणणार नाही.”

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस