शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘नापास’ होणं ही काय वाईट गोष्ट नव्हे! नोबेल पुरस्कार विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांचा संवाद

By श्रीकिशन काळे | Updated: February 20, 2024 19:36 IST

त्यामुळे पालकांनी आपली मुले नापास झाली तर त्यावर रागवू नये, असा सल्ला नोबेल पुरस्कार विजेते व जैवविज्ञान शास्त्रज्ञ सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांनी दिला....

पुणे : आयुष्यात नापास होणे ही खूप वाईट गोष्ट नाही. नापास झाल्यानंतर आपण काही तरी इतर करू शकतो. आजपर्यंत जे काही नवीन शोध लागले ते असेच कोणत्या तरी गोष्टीत ‘फेल’ झाल्याने लागले आहेत. त्यामुळे पालकांनी आपली मुले नापास झाली तर त्यावर रागवू नये, असा सल्ला नोबेल पुरस्कार विजेते व जैवविज्ञान शास्त्रज्ञ सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांनी दिला.

शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या वतीने स. प. महाविद्यालयात ‘नोबेल पुरस्काराचा मार्ग’ या विषयावर मंगळवारी (दि.२०) त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन आदी उपस्थित होते. याप्रसंगी रॉबर्ट्स यांनी आपल्या लहानपणापासून ते नोबेलपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.

रॉबर्ट्स म्हणाले, आजपर्यंत अनेकांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. कोणीही पारितोषिकासाठी काम केले नाही. ते जे करत होते, त्यात ‘फेल’ झाले आणि नवीन काही तरी त्यांच्यासमोर आले. त्यातूनच नवनवे संशोधन जगासमोर उलगडले. त्यामुळे ‘फेल’ झालात तरी देखील तुम्ही काही तरी मिळवलेले असते.’’

‘‘सध्या जगभरात संशोधनावर अनेक कंपन्या, लॅब कार्यरत आहेत. त्यामध्ये व्यवसायिक आल्याने संशोधनाला अडथळा निर्माण होतो. कारण केवळ पैसा कमविणे हे ध्येय ठेवले तर मग संशोधनावर गुंतवणूक होत नाही. अधिकाधिक चांगले संशोधन करण्यासाठी पैशांची गरज असते. नफा हवा असेल तर मग संशोधनाकडे दुर्लक्ष केले जाते. आज बऱ्याच कंपन्या याकडेच अधिक लक्ष देत आहेत. हे अत्यंत अयोग्य असल्याचे राॅबर्ट्स यांनी सांगितले.

सध्या जीएमओ हे एक तंत्रज्ञान पिक पध्दतीसाठी वापरले जात आहे. जीएमपासून वनस्पती तयार केली जात आहे. लोकसंख्या प्रचंड वाढल्याने आणि हवामान बदल झाल्याने आतापासून आपल्याला समस्या निर्माण होत आहेत. परंतु, पारंपरिक पध्दतीने वाण किंवा वनस्पती वाढवणे आवश्यक आहेच, तसेच जीएमपासून देखील चांगले काही होत असेल तर ते पहायला हवे, अशी अपेक्षा राॅबर्ट्स यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNobel Prizeनोबेल पुरस्कार