शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

साथीच्या आजारांचे थैमान, डेंगीचे रुग्ण कळविणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 06:36 IST

ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस आणि तापमानात होणारा चढ-उतार यामुळे वातावरणातील इंदापूर आणि बारामती तालुक्यांत विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप, डोके व घसादुखीच्या रुग्णांमध्ये सात-आठ दिवसांपासून वाढ झाली आहे.

बारामती : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस आणि तापमानात होणारा चढ-उतार यामुळे वातावरणातील इंदापूर आणि बारामती तालुक्यांत विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप, डोके व घसादुखीच्या रुग्णांमध्ये सात-आठ दिवसांपासून वाढ झाली आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, तसेच विषाणुजन्य रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाला. वातावरणात झालेला बदल, ओलसर व चिखलमय रस्ते यामुळे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. याचा लोकमतने घेतलेला आढावा.डेंगीचे रुग्ण कळविणे बंधनकारकबारामती : शहरातील खासगी रुग्णालयांमध्येदेखील थंडी तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच, खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी डेंगीचे रुग्ण सरकारी हॉस्पिटलला कळविणे बंधनकारक असल्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील माहिती एकत्रित केली जात आहे. शहरातील देसाई इस्टेट, जवाहरनगर, सुभाष चौक, कसबा परिसरात डासांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजाराने त्रस्त रुग्णांची संख्यादेखील अधिक आहे.तपासणीसाठी अवाजवीशुल्क आकारणी...रुग्णांची संख्या वाढत असताना पॅथॉलॉजी लॅबमध्येदेखील रक्त तपासणीसाठी गर्दी असल्याचे दिसते. राज्य शासनाने ६०० रुपये दर निश्चित केला आहे. मात्र, या खासगी लॅबमध्ये १२०० ते १५०० रुपये डेंगीचे निदान करण्यासाठी आकारले जात आहेत. डेंगी, चिकुनगुनिया, गोचिड ताप, हिवताप आदींमुळे बारामती शहर, तालुक्यात खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच दिसते.वेदनाशामकगोळ्या टाळा...थंडी ताप आल्यानंतर काही रुग्ण वेदनाशामक गोळ्या घेतात. डेंगीचे निदान होण्यास उशीर लागतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशमक गोळ्या घेऊ नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकाºयांनी केले आहे.प्लेटलेट्सचा तुटवडा...डेंगीसह अन्य आजारांमध्ये रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्याचबरोबर पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्लेटलेट्स भरणे आवश्यक असते. मात्र, सध्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुण्याहून प्लेटलेट्स मागवावे लागतात. तोपर्यंत विलंब होतो. त्यात रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.