शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

साथीच्या आजारांचे थैमान, डेंगीचे रुग्ण कळविणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 06:36 IST

ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस आणि तापमानात होणारा चढ-उतार यामुळे वातावरणातील इंदापूर आणि बारामती तालुक्यांत विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप, डोके व घसादुखीच्या रुग्णांमध्ये सात-आठ दिवसांपासून वाढ झाली आहे.

बारामती : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस आणि तापमानात होणारा चढ-उतार यामुळे वातावरणातील इंदापूर आणि बारामती तालुक्यांत विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप, डोके व घसादुखीच्या रुग्णांमध्ये सात-आठ दिवसांपासून वाढ झाली आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, तसेच विषाणुजन्य रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाला. वातावरणात झालेला बदल, ओलसर व चिखलमय रस्ते यामुळे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. याचा लोकमतने घेतलेला आढावा.डेंगीचे रुग्ण कळविणे बंधनकारकबारामती : शहरातील खासगी रुग्णालयांमध्येदेखील थंडी तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच, खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी डेंगीचे रुग्ण सरकारी हॉस्पिटलला कळविणे बंधनकारक असल्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील माहिती एकत्रित केली जात आहे. शहरातील देसाई इस्टेट, जवाहरनगर, सुभाष चौक, कसबा परिसरात डासांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजाराने त्रस्त रुग्णांची संख्यादेखील अधिक आहे.तपासणीसाठी अवाजवीशुल्क आकारणी...रुग्णांची संख्या वाढत असताना पॅथॉलॉजी लॅबमध्येदेखील रक्त तपासणीसाठी गर्दी असल्याचे दिसते. राज्य शासनाने ६०० रुपये दर निश्चित केला आहे. मात्र, या खासगी लॅबमध्ये १२०० ते १५०० रुपये डेंगीचे निदान करण्यासाठी आकारले जात आहेत. डेंगी, चिकुनगुनिया, गोचिड ताप, हिवताप आदींमुळे बारामती शहर, तालुक्यात खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच दिसते.वेदनाशामकगोळ्या टाळा...थंडी ताप आल्यानंतर काही रुग्ण वेदनाशामक गोळ्या घेतात. डेंगीचे निदान होण्यास उशीर लागतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशमक गोळ्या घेऊ नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकाºयांनी केले आहे.प्लेटलेट्सचा तुटवडा...डेंगीसह अन्य आजारांमध्ये रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्याचबरोबर पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्लेटलेट्स भरणे आवश्यक असते. मात्र, सध्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुण्याहून प्लेटलेट्स मागवावे लागतात. तोपर्यंत विलंब होतो. त्यात रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.