शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुख्याध्यापकाच्या दिमतीला जुंपले विद्यार्थी, चारचाकी धुऊन घेत असल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:51 IST

कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाची चारचाकी गाडीची सफाई करण्यासाठी शाळेतीलच विद्यार्थ्यांना पाणी मारून धुऊन आणि त्यानंतर कापडी फडक्याने पुसून चकाचक करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चाकण : कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाची चारचाकी गाडीची सफाई करण्यासाठी शाळेतीलच विद्यार्थ्यांना पाणी मारून धुऊन आणि त्यानंतर कापडी फडक्याने पुसून चकाचक करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार व गटशिक्षण अधिकारी सोपानराव वेताळ यांनी या प्रकाराविषयी सर्व माहिती घेऊन तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. कोरेगाव खुर्द गावच्या परिसरात ठाकरवाडीत पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आदिवासी ठाकर समाजाचे आणि गरीब शेतकरी कुटुंबातील असून, शाळेतील विद्यार्थी पटसंख्यादेखील चांगली आहे. अभ्यास करायचे सोडून एक विद्यार्थी चारचाकी गाडीवर पाणी मारून धूत होता, तर दुसरा विद्यार्थी कापडी फडक्याने गाडी पुसून चकाचक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वेळी गाडी धुणाºया विद्यार्थ्यांना विचारले असता, आम्हाला सरांनी गाडी धुवायला लावली असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित गाडी शाळेच्या मुख्याध्यापकांची असल्याचे समजले.या शाळेत आदिवासी ठाकर समाजाच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त आहे. येथील शिक्षक विद्यार्थ्यांकडून नेहमीच काही ना कामे करून घेत असल्याचेही येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी जांभळे आणण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले होते. तसेच या शाळेत येणारा पोषण आहार येथील स्वस्त धान्य दुकानात येतो, त्यानंतर तो पोषण आहाराचा माल विद्यार्थ्यांकडून डोक्यावर वाहून आणला जात असल्याचेही अनेक नागरिकांनी सांगितले. आज सकाळी मुलांना शाळेच्या आवारातील झाडांना पाणी सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना सांगितले होते. पाणी सोडताना पाणी गाडीवर उडाले, ते पाणी विद्यार्थ्यांनी पुसले, मी कधीही गाडीची सफाई करण्यासाठी सांगत नाही. उलट विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे माझे विशेष लक्ष असते, असे स्पष्टीकरण मुख्याध्यापक तुकाराम कदम यांनी दिले.आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता शासन लाखो रुपये खर्च करत आहे. यातून चांगले व हुशार विद्यार्थी घडला जाऊन, आदिवासी लोकांमध्ये आधुनिकता यावी, हा एकमेव उद्देश आहे. परंतु शाळेतील शिक्षकांकडून ज्ञानदानाचे काम न करता स्वत:ची कामे करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करत आहेत.या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांना विचारले असता लवकरच सर्व वस्तुस्थिती पाहून दोषी असणाºयांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत गटशिक्षण अधिकारी सोपानराव वेताळ यांना विचारले असता, असे काम विद्यार्थ्यांना करायला लावायला नाही पाहिजे, असा प्रकार चुकीचा आहे, असे त्यांनी सांगितले.