शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:54 IST

जानेवारीनंतर उन्हाळ्यात दूध खरेदीचे दर वाढत असत. मात्र यावर्षी दुधाचे दर घसरण्याची शक्यता आहे;

लाखेवाडी : जानेवारीनंतर उन्हाळ्यात दूध खरेदीचे दर वाढत असत. मात्र यावर्षी दुधाचे दर घसरण्याची शक्यता आहे; कारण शासनाने दिलेले अनुदान दोन महिन्यांपासून बंद झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.आॅक्टोबरनंतर दूध संकलनात वाढ होते. जानेवारी अखेरपर्यंत दूध वाढीचा कालावधी असतो. फेब्रुवारीपासून दूध संकलन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. मार्चनंतर दूध संकलनात मोठी घट होते. त्यामुळे मार्चनंतर दूध खरेदी दरात वाढ होण्यास सुरुवात होते. पंरतु गेल्या दोन महिन्यांपासून अनुदान बंद असल्यामुळे दूध दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच दुष्काळाची तीव्रता भयानक निर्माण झाली आहे. पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जनावराच्या पशुखाद्याच्या वाढलेल्या किंमती पाहता दुधाला प्रतिलिटर ३० रुपयांहून अधिक दर मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे. शासनाने अनुदान बंद केले आहे. परंतु भविष्यात अनुदान मिळेल, या आशेवर लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील दूध उत्पादक शेतकºयाला कुलरचालक २५ रुपये दूध दर देत आहेत. अनुदान मिळाले नाहीतर येत्या काही दिवसात १८ ते २० रुपयाने दूध खरेदी केले जाईल. दूध व्यवसाय संकटात सापडेल, अशी भीती शेतकºयांना वाटत आहे. त्यामुळे सरकारने वेळेतच लक्ष देऊन अनुदान सुरु करावे. लाखेवाडी गाव हे इंदापूर तालुक्यात दूध व्यवसायात अग्रेसर आहे. जवळपास गावामध्ये ५० हजार लिटर दररोजचे दूध संकलन आहे. हा दूध व्यवसाय खाजगी डेअरी मार्फत चालवला जात आहे. दरवर्षी जानेवारीनंतर दुधाचे दर वाढत असतात. याप्रमाणे याही वर्षी दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी दर वाढीकडे डोळे लावून जनावरांचे संगोपन करीत आहेत. येत्या काही दिवसात शासनाने लक्ष दिले नाही तर दूध दर घसरतील आणि शेतकºयावर संकट कोसळले जाईल, असे सांगितले जात आहे.> दुष्काळात तेरावा..वास्तविक यंदा पाऊस झाला नसल्याने या परिसरात पाण्याची भीषण टंचाई जानेवारीतच जाणवू लागली आहे. दुष्काळामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना जनावरांना चारासुध्दा दुरापास्त झाला आहे. किमान दूध व्यवसाय सुरळीत रहावा म्हणून जनवारांना जादा दराने चारा विकत आणावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळ््यात शेतीला पाणी मिळणे दूर, पिण्यासाठी सुध्दा नागरिकांना पायपीठ करावी लागणार आहे.