शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:54 IST

जानेवारीनंतर उन्हाळ्यात दूध खरेदीचे दर वाढत असत. मात्र यावर्षी दुधाचे दर घसरण्याची शक्यता आहे;

लाखेवाडी : जानेवारीनंतर उन्हाळ्यात दूध खरेदीचे दर वाढत असत. मात्र यावर्षी दुधाचे दर घसरण्याची शक्यता आहे; कारण शासनाने दिलेले अनुदान दोन महिन्यांपासून बंद झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.आॅक्टोबरनंतर दूध संकलनात वाढ होते. जानेवारी अखेरपर्यंत दूध वाढीचा कालावधी असतो. फेब्रुवारीपासून दूध संकलन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. मार्चनंतर दूध संकलनात मोठी घट होते. त्यामुळे मार्चनंतर दूध खरेदी दरात वाढ होण्यास सुरुवात होते. पंरतु गेल्या दोन महिन्यांपासून अनुदान बंद असल्यामुळे दूध दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच दुष्काळाची तीव्रता भयानक निर्माण झाली आहे. पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जनावराच्या पशुखाद्याच्या वाढलेल्या किंमती पाहता दुधाला प्रतिलिटर ३० रुपयांहून अधिक दर मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे. शासनाने अनुदान बंद केले आहे. परंतु भविष्यात अनुदान मिळेल, या आशेवर लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील दूध उत्पादक शेतकºयाला कुलरचालक २५ रुपये दूध दर देत आहेत. अनुदान मिळाले नाहीतर येत्या काही दिवसात १८ ते २० रुपयाने दूध खरेदी केले जाईल. दूध व्यवसाय संकटात सापडेल, अशी भीती शेतकºयांना वाटत आहे. त्यामुळे सरकारने वेळेतच लक्ष देऊन अनुदान सुरु करावे. लाखेवाडी गाव हे इंदापूर तालुक्यात दूध व्यवसायात अग्रेसर आहे. जवळपास गावामध्ये ५० हजार लिटर दररोजचे दूध संकलन आहे. हा दूध व्यवसाय खाजगी डेअरी मार्फत चालवला जात आहे. दरवर्षी जानेवारीनंतर दुधाचे दर वाढत असतात. याप्रमाणे याही वर्षी दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी दर वाढीकडे डोळे लावून जनावरांचे संगोपन करीत आहेत. येत्या काही दिवसात शासनाने लक्ष दिले नाही तर दूध दर घसरतील आणि शेतकºयावर संकट कोसळले जाईल, असे सांगितले जात आहे.> दुष्काळात तेरावा..वास्तविक यंदा पाऊस झाला नसल्याने या परिसरात पाण्याची भीषण टंचाई जानेवारीतच जाणवू लागली आहे. दुष्काळामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना जनावरांना चारासुध्दा दुरापास्त झाला आहे. किमान दूध व्यवसाय सुरळीत रहावा म्हणून जनवारांना जादा दराने चारा विकत आणावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळ््यात शेतीला पाणी मिळणे दूर, पिण्यासाठी सुध्दा नागरिकांना पायपीठ करावी लागणार आहे.