शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 01:54 IST

जानेवारीनंतर उन्हाळ्यात दूध खरेदीचे दर वाढत असत. मात्र यावर्षी दुधाचे दर घसरण्याची शक्यता आहे;

लाखेवाडी : जानेवारीनंतर उन्हाळ्यात दूध खरेदीचे दर वाढत असत. मात्र यावर्षी दुधाचे दर घसरण्याची शक्यता आहे; कारण शासनाने दिलेले अनुदान दोन महिन्यांपासून बंद झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.आॅक्टोबरनंतर दूध संकलनात वाढ होते. जानेवारी अखेरपर्यंत दूध वाढीचा कालावधी असतो. फेब्रुवारीपासून दूध संकलन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. मार्चनंतर दूध संकलनात मोठी घट होते. त्यामुळे मार्चनंतर दूध खरेदी दरात वाढ होण्यास सुरुवात होते. पंरतु गेल्या दोन महिन्यांपासून अनुदान बंद असल्यामुळे दूध दर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच दुष्काळाची तीव्रता भयानक निर्माण झाली आहे. पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जनावराच्या पशुखाद्याच्या वाढलेल्या किंमती पाहता दुधाला प्रतिलिटर ३० रुपयांहून अधिक दर मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकºयांमधून जोर धरत आहे. शासनाने अनुदान बंद केले आहे. परंतु भविष्यात अनुदान मिळेल, या आशेवर लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील दूध उत्पादक शेतकºयाला कुलरचालक २५ रुपये दूध दर देत आहेत. अनुदान मिळाले नाहीतर येत्या काही दिवसात १८ ते २० रुपयाने दूध खरेदी केले जाईल. दूध व्यवसाय संकटात सापडेल, अशी भीती शेतकºयांना वाटत आहे. त्यामुळे सरकारने वेळेतच लक्ष देऊन अनुदान सुरु करावे. लाखेवाडी गाव हे इंदापूर तालुक्यात दूध व्यवसायात अग्रेसर आहे. जवळपास गावामध्ये ५० हजार लिटर दररोजचे दूध संकलन आहे. हा दूध व्यवसाय खाजगी डेअरी मार्फत चालवला जात आहे. दरवर्षी जानेवारीनंतर दुधाचे दर वाढत असतात. याप्रमाणे याही वर्षी दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी दर वाढीकडे डोळे लावून जनावरांचे संगोपन करीत आहेत. येत्या काही दिवसात शासनाने लक्ष दिले नाही तर दूध दर घसरतील आणि शेतकºयावर संकट कोसळले जाईल, असे सांगितले जात आहे.> दुष्काळात तेरावा..वास्तविक यंदा पाऊस झाला नसल्याने या परिसरात पाण्याची भीषण टंचाई जानेवारीतच जाणवू लागली आहे. दुष्काळामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला असताना जनावरांना चारासुध्दा दुरापास्त झाला आहे. किमान दूध व्यवसाय सुरळीत रहावा म्हणून जनवारांना जादा दराने चारा विकत आणावे लागत आहे. त्यामुळे उन्हाळ््यात शेतीला पाणी मिळणे दूर, पिण्यासाठी सुध्दा नागरिकांना पायपीठ करावी लागणार आहे.