शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Operation Ajay| युद्धाचा धोका, इस्रायलमधून १२०० जण परतले मायदेशी

By नितीन चौधरी | Updated: October 17, 2023 18:04 IST

तेथील २० हजार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने त्यांच्या नोंदणीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे...

पुणे : इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे तेथे अडकलेल्या सुमारे बाराशे भारतीयांना आतापर्यंत चार ते पाच विमानाद्वारे सुरक्षितपणे देशात आणण्यात आले आहे. तेथील २० हजार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने त्यांच्या नोंदणीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली.

इस्त्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीयांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबत केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्याकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘इस्त्रायलमध्ये सध्या राहत असलेल्या भारतीयांची संख्या अधिक आहे. तेथील युद्धजन्य परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना कऱण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चार ते पाच विमानाद्वारे सुमारे एक हजार ते बाराशे भारतीय नागरिकांना विमानाद्वारे  भारतात सुखरूप आणण्यात आले आहे.’

इस्त्रायलमधून ज्या नागरिकांना भारतात येण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नोंदणी करण्याची व्यवस्था केली आहे. त्याकरिता दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केले असून त्याची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या इच्छेनुसार भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही मुरलीधरन यांनी सांगितले.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धPuneपुणे