शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Operation Ajay| युद्धाचा धोका, इस्रायलमधून १२०० जण परतले मायदेशी

By नितीन चौधरी | Updated: October 17, 2023 18:04 IST

तेथील २० हजार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने त्यांच्या नोंदणीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे...

पुणे : इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे तेथे अडकलेल्या सुमारे बाराशे भारतीयांना आतापर्यंत चार ते पाच विमानाद्वारे सुरक्षितपणे देशात आणण्यात आले आहे. तेथील २० हजार भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने त्यांच्या नोंदणीसाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला आहे, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली.

इस्त्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीयांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबत केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्याकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘इस्त्रायलमध्ये सध्या राहत असलेल्या भारतीयांची संख्या अधिक आहे. तेथील युद्धजन्य परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना कऱण्यात आल्या आहेत. आतापर्यंत चार ते पाच विमानाद्वारे सुमारे एक हजार ते बाराशे भारतीय नागरिकांना विमानाद्वारे  भारतात सुखरूप आणण्यात आले आहे.’

इस्त्रायलमधून ज्या नागरिकांना भारतात येण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी नोंदणी करण्याची व्यवस्था केली आहे. त्याकरिता दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केले असून त्याची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या इच्छेनुसार भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही मुरलीधरन यांनी सांगितले.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धPuneपुणे