शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

नियोजनाबाबत पाटबंधारे गाफील

By admin | Updated: February 14, 2015 03:04 IST

मागील काही वर्षांमध्ये पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवत असताना पाणीउपशाबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेले नियोजन काही प्रमाणात कामी येत आहे.

अंकुश जगताप, पिंपरीमागील काही वर्षांमध्ये पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवत असताना पाणीउपशाबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेले नियोजन काही प्रमाणात कामी येत आहे. मात्र दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची स्थिती असताना पाटबंधारे विभागाकडून पवना धरणातील जलसाठ्याचे कोणतेच पूर्वनियोजन नसल्याचे उघड झाले आहे. जुनमध्ये पाणी नियोजन करणे म्हणजे तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार सुरू असून, टंचाईकाळातही मुबलक पाण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. पिंपरी - चिंचवडला पाण्यासाठी १९६५ साली मावळ तालुक्यात पवना धरण बांधले. धरणातील पाणी साठवणूक क्षमता ९.६० टीएमसी आहे. यापैकी ८.५१ टीएमसी पाणी वापरायोग्य असून, मृतसाठ्याचे प्रमाण १.०९ टीएमसी आहे. यातून शहरासाठी पवना नदीमार्गे पाणी सोडले जाते. रावेतच्या बंधाऱ्यातून हे पाणी पंपांद्वारे उचलून शुद्धीकरणानंतर शहरभर पुरविले जाते. याच पाण्यावर नदीकाठावरील गावांतील शेती व पाणीयोजनाही अवलंबून आहेत.पावसाळ्याच्या अखेरपासून धरणातूून प्रमाणापेक्षा जादा पाणी सोडल्यास ते नदीप्रवाहावाटे वाया जाण्याचा प्रकार पवना धरणाच्या बाबतीत होत आहे. त्यातच पाऊस लांबल्याने २०१३ मध्ये याचा प्रत्यत येत पाणीकपातीचा शहरवासीयांना आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०१२ साली ३ हजार ५०२ मिलीमीटर, २०१३ साली ४ हजार ५०७ मिलीमीटर, तर २०१४ मध्ये सर्वात कमी २ हजार ३८५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यातून धरण पूर्ण भरले. १२ फेब्रुवारीपर्यंत ५.३० टीएमसी (६२.२७ टक्के) पाणी शिल्लक आहे. इतर भागातून खास शेतीसाठी आवर्तन सोडावे लागत नसल्याने पाणी टिकविणे सोपे असण्याची जमेची बाजू आहे. मात्र कमी पर्जन्यमानामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भागात पाण्याची कमतरता व त्यामुळे वाढत्या मागणीने उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण वाढणार आहे.पावसाळ्याच्या अखेरच्या टप्यात जोरदार पाऊस पडण्याच्या अपेक्षेने सप्टेबर ते आॅक्टोबरमध्ये धरणातील ०.७५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र यानंतर जोरदार पाऊस न झाल्याने पुन्हा अपेक्षीत पाणीसाठा वाढला नाही. सध्या महापालिकेला दररोज ४४० एमएलडी पाण्याची गरज आहे. एमआयडीसीला १२० एमएलडी, पुणे महानगरपालिकेसाठी ३० एमएलडी, तळेगाव नगरपरिषदेसाठी १० एमएलडी पाणी लागते. यासह माण, मारुंजी,हिंजवडी परिसरातील आयटी पार्क, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, शेतीसाठी पाणीवापर संस्था, नदीलगतच्या गावांच्या पेय्यजल योजनाही या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी जलविद्युत प्रकल्पावाटे बाराशे क्युसेक (१२ कोटी लिटर प्रतितास) इतक्या वेगाने ६ ते साडेसहा तास पाणी सोडले जात आहे. त्यातच पावसाळ्यापासून लहरी हवामानाचा प्रत्यय येत आहे. परिणामी या वर्षीचा पाऊस वेळेवर होईल की नाही याबाबत साशंकता आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज व मागणी आणखी वाढणार आहे. या वेळी नदीत पाणीपातळी कायम ठेवणे व त्यासाठी विसर्गात सातत्य गरजेचे आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्याचे रहिवाशांच्या सहभागासह कृती कार्यक्रमासह आतापासूनच नियोजन करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.