शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

नियोजनाबाबत पाटबंधारे गाफील

By admin | Updated: February 14, 2015 03:04 IST

मागील काही वर्षांमध्ये पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवत असताना पाणीउपशाबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेले नियोजन काही प्रमाणात कामी येत आहे.

अंकुश जगताप, पिंपरीमागील काही वर्षांमध्ये पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवत असताना पाणीउपशाबाबत महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेले नियोजन काही प्रमाणात कामी येत आहे. मात्र दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची स्थिती असताना पाटबंधारे विभागाकडून पवना धरणातील जलसाठ्याचे कोणतेच पूर्वनियोजन नसल्याचे उघड झाले आहे. जुनमध्ये पाणी नियोजन करणे म्हणजे तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार सुरू असून, टंचाईकाळातही मुबलक पाण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. पिंपरी - चिंचवडला पाण्यासाठी १९६५ साली मावळ तालुक्यात पवना धरण बांधले. धरणातील पाणी साठवणूक क्षमता ९.६० टीएमसी आहे. यापैकी ८.५१ टीएमसी पाणी वापरायोग्य असून, मृतसाठ्याचे प्रमाण १.०९ टीएमसी आहे. यातून शहरासाठी पवना नदीमार्गे पाणी सोडले जाते. रावेतच्या बंधाऱ्यातून हे पाणी पंपांद्वारे उचलून शुद्धीकरणानंतर शहरभर पुरविले जाते. याच पाण्यावर नदीकाठावरील गावांतील शेती व पाणीयोजनाही अवलंबून आहेत.पावसाळ्याच्या अखेरपासून धरणातूून प्रमाणापेक्षा जादा पाणी सोडल्यास ते नदीप्रवाहावाटे वाया जाण्याचा प्रकार पवना धरणाच्या बाबतीत होत आहे. त्यातच पाऊस लांबल्याने २०१३ मध्ये याचा प्रत्यत येत पाणीकपातीचा शहरवासीयांना आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०१२ साली ३ हजार ५०२ मिलीमीटर, २०१३ साली ४ हजार ५०७ मिलीमीटर, तर २०१४ मध्ये सर्वात कमी २ हजार ३८५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यातून धरण पूर्ण भरले. १२ फेब्रुवारीपर्यंत ५.३० टीएमसी (६२.२७ टक्के) पाणी शिल्लक आहे. इतर भागातून खास शेतीसाठी आवर्तन सोडावे लागत नसल्याने पाणी टिकविणे सोपे असण्याची जमेची बाजू आहे. मात्र कमी पर्जन्यमानामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भागात पाण्याची कमतरता व त्यामुळे वाढत्या मागणीने उपलब्ध पाणीसाठ्यावर ताण वाढणार आहे.पावसाळ्याच्या अखेरच्या टप्यात जोरदार पाऊस पडण्याच्या अपेक्षेने सप्टेबर ते आॅक्टोबरमध्ये धरणातील ०.७५ टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र यानंतर जोरदार पाऊस न झाल्याने पुन्हा अपेक्षीत पाणीसाठा वाढला नाही. सध्या महापालिकेला दररोज ४४० एमएलडी पाण्याची गरज आहे. एमआयडीसीला १२० एमएलडी, पुणे महानगरपालिकेसाठी ३० एमएलडी, तळेगाव नगरपरिषदेसाठी १० एमएलडी पाणी लागते. यासह माण, मारुंजी,हिंजवडी परिसरातील आयटी पार्क, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, शेतीसाठी पाणीवापर संस्था, नदीलगतच्या गावांच्या पेय्यजल योजनाही या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी जलविद्युत प्रकल्पावाटे बाराशे क्युसेक (१२ कोटी लिटर प्रतितास) इतक्या वेगाने ६ ते साडेसहा तास पाणी सोडले जात आहे. त्यातच पावसाळ्यापासून लहरी हवामानाचा प्रत्यय येत आहे. परिणामी या वर्षीचा पाऊस वेळेवर होईल की नाही याबाबत साशंकता आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज व मागणी आणखी वाढणार आहे. या वेळी नदीत पाणीपातळी कायम ठेवणे व त्यासाठी विसर्गात सातत्य गरजेचे आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्याचे रहिवाशांच्या सहभागासह कृती कार्यक्रमासह आतापासूनच नियोजन करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.