शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

खासगी क्लासमध्ये प्रवेशाचीही धाकधूक

By admin | Updated: May 10, 2017 04:26 IST

इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याआधी विद्यार्थी व पालकांना खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याआधी विद्यार्थी व पालकांना खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. क्लासमध्ये प्रवेशासाठीही ‘मेरिट’ गरजेचे असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत हमखास यश मिळवून देण्याचे आमिष या क्लासकडून दाखविले जात असल्याने पालकही त्याला भुलू लागले आहेत. परिणामी, विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशापेक्षा क्लासमधील प्रवेशाची अधिक काळजी असल्याचे दिसते.काही वर्षांपासून खासगी क्लासचे पेव फुटले आहे. इयत्ता पहिलीपासून पीएच.डी.ची तयारी करण्यापर्यंत विविध पद्धतीने खासगी क्लास आणि मार्गदर्शन वर्ग सुरू झाले आहेत. त्यातही पूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासची संख्या मोठी होती. त्यानंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राज्य शासनाने समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सुरू केली. मग क्लासमध्ये ‘सीईटी’ तयारीच्याही जाहिराती सुरू झाल्या.अकरावी व बारावीतील विज्ञान विषयांबरोबरच ‘सीईटी’ची तयारी करून घेण्याचे आमिष दाखविण्यात आले. सीईटी झाल्यानंतर क्लासमधील यशस्वी विद्यार्थ्यांची जाहिरातबाजी सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थी व पालकही मोठ्या प्रमाणात या क्लासकडे वळू लागले. आता तर अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी राज्य सीईटी तसेच केंद्रीय पातळीवर जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ या प्रवेश परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यानुसार क्लासचीही भर पडली असून, सध्या शहरभर ठिकठिकाणी असे क्लास सुरू झाले आहेत.महाविद्यालयांमध्ये केवळ अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तर, जेईई किंवा नीट परीक्षेसाठी थोडा कठीण अभ्यासक्रम असल्याचा गवगवा करीत अनेक खासगी क्लास विद्यार्थी व पालकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी सर्रास या क्लासमध्ये जाण्यासाठी उत्सुक दिसतात. विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढू लागल्याने क्लासनी प्रवेशासाठी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, काही क्लासकडून दहावीतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे अकरावी प्रवेशापूर्वीच विद्यार्थी-पालकांना क्लासमध्ये प्रवेशाची चिंता लागली आहे. अकरावीचे प्रत्यक्ष प्रवेश दहावीच्या निकालानंतर काही दिवसांनी सुरू होतात; पण क्लासमध्ये प्रवेशासाठी मात्र आत्तापासूनच गर्दी वाढू लागली आहे. यामध्ये काही महाविद्यालयांनी क्लासशी करार करून वर्गातील उपस्थितीत सवलत देण्याचा चुकीचा पायंडा पाडण्यास सुरुवात केल्याने क्लासचे अधिकच फावले आहे.