शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

खासगी क्लासमध्ये प्रवेशाचीही धाकधूक

By admin | Updated: May 10, 2017 04:26 IST

इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याआधी विद्यार्थी व पालकांना खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्याआधी विद्यार्थी व पालकांना खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. क्लासमध्ये प्रवेशासाठीही ‘मेरिट’ गरजेचे असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत हमखास यश मिळवून देण्याचे आमिष या क्लासकडून दाखविले जात असल्याने पालकही त्याला भुलू लागले आहेत. परिणामी, विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशापेक्षा क्लासमधील प्रवेशाची अधिक काळजी असल्याचे दिसते.काही वर्षांपासून खासगी क्लासचे पेव फुटले आहे. इयत्ता पहिलीपासून पीएच.डी.ची तयारी करण्यापर्यंत विविध पद्धतीने खासगी क्लास आणि मार्गदर्शन वर्ग सुरू झाले आहेत. त्यातही पूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासची संख्या मोठी होती. त्यानंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राज्य शासनाने समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सुरू केली. मग क्लासमध्ये ‘सीईटी’ तयारीच्याही जाहिराती सुरू झाल्या.अकरावी व बारावीतील विज्ञान विषयांबरोबरच ‘सीईटी’ची तयारी करून घेण्याचे आमिष दाखविण्यात आले. सीईटी झाल्यानंतर क्लासमधील यशस्वी विद्यार्थ्यांची जाहिरातबाजी सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थी व पालकही मोठ्या प्रमाणात या क्लासकडे वळू लागले. आता तर अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी राज्य सीईटी तसेच केंद्रीय पातळीवर जेईई आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ या प्रवेश परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यानुसार क्लासचीही भर पडली असून, सध्या शहरभर ठिकठिकाणी असे क्लास सुरू झाले आहेत.महाविद्यालयांमध्ये केवळ अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तर, जेईई किंवा नीट परीक्षेसाठी थोडा कठीण अभ्यासक्रम असल्याचा गवगवा करीत अनेक खासगी क्लास विद्यार्थी व पालकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी सर्रास या क्लासमध्ये जाण्यासाठी उत्सुक दिसतात. विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढू लागल्याने क्लासनी प्रवेशासाठी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, काही क्लासकडून दहावीतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे अकरावी प्रवेशापूर्वीच विद्यार्थी-पालकांना क्लासमध्ये प्रवेशाची चिंता लागली आहे. अकरावीचे प्रत्यक्ष प्रवेश दहावीच्या निकालानंतर काही दिवसांनी सुरू होतात; पण क्लासमध्ये प्रवेशासाठी मात्र आत्तापासूनच गर्दी वाढू लागली आहे. यामध्ये काही महाविद्यालयांनी क्लासशी करार करून वर्गातील उपस्थितीत सवलत देण्याचा चुकीचा पायंडा पाडण्यास सुरुवात केल्याने क्लासचे अधिकच फावले आहे.