शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: November 18, 2016 05:13 IST

जिल्हा बँकांना जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्यास शासनाने मनाई केल्यामुळे खातेदार बँकिंग सुविधेपासून वंचित राहत असल्यामुळे नागरिकांत

चिखली : जिल्हा बँकांना जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्यास शासनाने मनाई केल्यामुळे खातेदार बँकिंग सुविधेपासून वंचित राहत असल्यामुळे नागरिकांत अस्वस्थता पसरली आहे.चिखली येथील जिल्हा बँकेत सकाळच्या सुमारास मोठ्या आशेने खातेदार पाचशे आणि हजारांच्या नोटा भरण्यासाठी, तसेच चालू नोटा काढण्यासाठी आले. परंतु, बँकेतील कर्मचाऱ्यांनी नोटा घेऊ शकत नसल्याचे कारण सांगितले. तसेच काही जण पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी पैसे काढण्यासाठी स्लीप भरली आणि काउंटरवर रोखपालाकडे दिली. परंतु, सदर रोखपालाने बँकेत रक्कम शिल्लक नसल्यामुळे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शासकीय आदेशानुसार बँकेत पाचशे व हजारांच्या नोटा घेण्याचे बंद केले आहे, तर बँकेकडे कॅश नसल्यामुळे खातेदारांना रक्कम देणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.शहरात बऱ्याचशा महिला बचत गट चालवत आहेत. सदर बचत गटांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खाते आहे. बचत गट साधारणपणे महिन्याच्या १५ तारखेनंतर बचत करून बँकेत भरणा करतात. तसेच लगेचच ज्या महिलांना कर्ज हवे आहे, त्या महिलांना चेकद्वारे कर्ज दिले जातात. त्यामुळे जमा झालेली बचत गटाच्या खात्यात स्वीकारली जात नाही, बचत गटाच्या खात्यात पुरेशी रक्कम नाही आणि बँकेतही रोकड नसल्यामुळे बँकेत आलेल्या महिलांना आता काय करावे, असा प्रश्न पडला आहे.एटीएमसमोरील रांगा हटेना-पिंपरी : नोटाबंदीच्या निर्णयाला आठवडा उलटून गेला, तरी बँक आणि एटीएमसमोरील रांगा मात्र ‘जैसे थे’ असल्याचेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ही ‘ आर्थिक आणिबाणी’ आणखी किती दिवस सहन करावी लागणार आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. पाचशे व हजारांच्या नोटा मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्या. दोन दिवसांनंतर सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे पंतप्रधानांनी सांगितले खरे, पण नागरिकांच्या वाट्याला आतापर्यंत केवळ मनस्तापच आला आहे. आज या निर्णयाला आठवडा उलटून गेला, तरी बँक व एटीएमसमोरील रांगा कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. सहकारी बँकांना आवश्यक रकमेचा पुरवठा होत नसल्याने त्यांचे व्यवहारही सुरळीत होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पिंपरी, चिंचवड, निगडी परिसरातील निम्म्याहून अधिक एटीएम पुरेशी रोकड उपलब्ध नसल्याने बंदावस्थेत पाहायला दिसून येत होती. जी एटीएम सुरू आहेत, त्यांच्यासमोर भली मोठी रांग लागलेली असते. नोटांचा तुटवडा भासत असल्याने विमानातून रक्कम पाठविणार असल्याची घोषणा चार दिवसांपूर्वी सरकारकडून करण्यात आली. तसेच नाशिकच्या मुद्रणालयातून कोट्यवधी नोटा आरबीआयकडे पाठविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एवढेच नव्हे, तर वारंवार एकाच व्यक्तीने नोटा बदलू नये म्हणून ‘शाई’ची शक्कलही पुढे आली. या सर्व घोषणा केवळ नागरिकांचा रोष कमी करण्यासाठीच केल्या जातात की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आठ दिवसांपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासात फारसा फरक पडला नाही. (वार्ताहर)