शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: November 18, 2016 05:13 IST

जिल्हा बँकांना जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्यास शासनाने मनाई केल्यामुळे खातेदार बँकिंग सुविधेपासून वंचित राहत असल्यामुळे नागरिकांत

चिखली : जिल्हा बँकांना जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्यास शासनाने मनाई केल्यामुळे खातेदार बँकिंग सुविधेपासून वंचित राहत असल्यामुळे नागरिकांत अस्वस्थता पसरली आहे.चिखली येथील जिल्हा बँकेत सकाळच्या सुमारास मोठ्या आशेने खातेदार पाचशे आणि हजारांच्या नोटा भरण्यासाठी, तसेच चालू नोटा काढण्यासाठी आले. परंतु, बँकेतील कर्मचाऱ्यांनी नोटा घेऊ शकत नसल्याचे कारण सांगितले. तसेच काही जण पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी पैसे काढण्यासाठी स्लीप भरली आणि काउंटरवर रोखपालाकडे दिली. परंतु, सदर रोखपालाने बँकेत रक्कम शिल्लक नसल्यामुळे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शासकीय आदेशानुसार बँकेत पाचशे व हजारांच्या नोटा घेण्याचे बंद केले आहे, तर बँकेकडे कॅश नसल्यामुळे खातेदारांना रक्कम देणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.शहरात बऱ्याचशा महिला बचत गट चालवत आहेत. सदर बचत गटांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खाते आहे. बचत गट साधारणपणे महिन्याच्या १५ तारखेनंतर बचत करून बँकेत भरणा करतात. तसेच लगेचच ज्या महिलांना कर्ज हवे आहे, त्या महिलांना चेकद्वारे कर्ज दिले जातात. त्यामुळे जमा झालेली बचत गटाच्या खात्यात स्वीकारली जात नाही, बचत गटाच्या खात्यात पुरेशी रक्कम नाही आणि बँकेतही रोकड नसल्यामुळे बँकेत आलेल्या महिलांना आता काय करावे, असा प्रश्न पडला आहे.एटीएमसमोरील रांगा हटेना-पिंपरी : नोटाबंदीच्या निर्णयाला आठवडा उलटून गेला, तरी बँक आणि एटीएमसमोरील रांगा मात्र ‘जैसे थे’ असल्याचेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ही ‘ आर्थिक आणिबाणी’ आणखी किती दिवस सहन करावी लागणार आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. पाचशे व हजारांच्या नोटा मंगळवारी (ता. ८) मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्या. दोन दिवसांनंतर सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे पंतप्रधानांनी सांगितले खरे, पण नागरिकांच्या वाट्याला आतापर्यंत केवळ मनस्तापच आला आहे. आज या निर्णयाला आठवडा उलटून गेला, तरी बँक व एटीएमसमोरील रांगा कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. सहकारी बँकांना आवश्यक रकमेचा पुरवठा होत नसल्याने त्यांचे व्यवहारही सुरळीत होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पिंपरी, चिंचवड, निगडी परिसरातील निम्म्याहून अधिक एटीएम पुरेशी रोकड उपलब्ध नसल्याने बंदावस्थेत पाहायला दिसून येत होती. जी एटीएम सुरू आहेत, त्यांच्यासमोर भली मोठी रांग लागलेली असते. नोटांचा तुटवडा भासत असल्याने विमानातून रक्कम पाठविणार असल्याची घोषणा चार दिवसांपूर्वी सरकारकडून करण्यात आली. तसेच नाशिकच्या मुद्रणालयातून कोट्यवधी नोटा आरबीआयकडे पाठविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. एवढेच नव्हे, तर वारंवार एकाच व्यक्तीने नोटा बदलू नये म्हणून ‘शाई’ची शक्कलही पुढे आली. या सर्व घोषणा केवळ नागरिकांचा रोष कमी करण्यासाठीच केल्या जातात की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आठ दिवसांपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासात फारसा फरक पडला नाही. (वार्ताहर)