शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाच्या दाखल्यासाठी ‘इंटरनेट’ स्पीडचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 02:46 IST

दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासते. उत्पन्न, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यामध्ये महत्त्वाचे आहेत. पूर्वी ‘आॅफलाईन’ दाखल्यांची नोंदणी केली जाई.

बारामती - दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासते. उत्पन्न, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यामध्ये महत्त्वाचे आहेत. पूर्वी ‘आॅफलाईन’ दाखल्यांची नोंदणी केली जाई. आता ‘आॅनलाईन’ नोंदणी होत असल्यामुळे दाखल्यांसाठी जोडलेल्या सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करावे लागत आहे.विविध प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी दाखलेच सक्तीचे केले आहे. आता दाखल्यांसाठी गर्दी जास्त आहे. तर सरकारच्या इंटरनेटचे स्पीड कमी आहे, त्यामुळे महसूल अधिकारी, कर्मचारी, सेतू केंद्र चालकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कागदपत्र तत्काळ देण्यासाठी बोगस एजंटकडुन आर्थिक लुट केली जात असल्याचे चित्र आहे.दहावी, बारावीचे निकाल जून महिन्यात लागतात. त्यानंतर तात्काळ प्रवेश प्रक्रिया सुरू होते. प्रवेशासाठी जातीचे दाखले, उत्पन्नाच्या दाखल्यांबरोबरच रहिवाशी दाखल्यांचे देखील मागणी असते. त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना क्रिमीलेअर, नॉन क्रिमीलेअरच्या दाखल्यांची देखील आवश्यकता असते. निकाल लागल्यापासून बारामतीच्या सेतू केंद्रात दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. उत्पन्नाचे दाखले सात दिवसात, जातीचे आणि क्रिमीलेअर, नॉन क्रिमीलेअरचे दाखले १४ दिवसांत दिले जातील, असे सेतू केंद्राचे नासिर शेख यांनी सांगितले.नोंदणी झाल्यानंतर सह्यांसाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांकडे दाखले जातात. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन पार पाडावी लागते. शेवटी सह्या केल्या जातात. त्यामुळे दाखल्यांसाठी इंटरनेटचे स्पीड अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत दाखले न मिळाल्यास प्रवेश मिळणार नाही, अशी भीती असते. त्याचा फायदा काही बेकायदेशीररीत्या वावरत असलेल्या एजंट घेतात....जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी कागदपत्रे काढलीतहसिलदार हनुमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी ंबोलताना सांगितले की,यंदाच्या वर्षी शाळांमध्ये मेळावे घेण्यात आले होते.प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांची मिटींग घेतली.शाळांना पालकांची मीटिंग घेण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते.महा ई-सेवा केंद्रांना शाळेत जाऊन जातीनिहाय आवश्यक कागदपत्रांचे विवरण नोटीस बोर्डवर लावण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते.त्याचा फ ायदा घेउन जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी कागदपत्रे काढली.तसेच,इतर विद्यार्थ्यांपेक्षा निकाल जाहीर झाला आहे,प्रवेश घ्यायचा आहे,अशा विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी प्रयत्न करावेत.इतर विद्यार्थ्यांनी ऊशीरा कागदपत्रे काढावीत, असे तहसिलदार पाटील म्हणाले....त्यामुळे संथ गतीने काम चालते.दाखले वेळेत मिळत नाहीत, अशीच स्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांचीदेखील धावपळ होते. या संदर्भात बारामतीच्या सेतू केंद्राचे व्यवस्थापक नीलेश राजमाने यांनी सांगितले की, आॅनलाईनमुळे सरकारच्या पोर्टलवर जाऊन लॉगिन करावे लागते. राज्यभरातून सर्व सेतू केंद्र त्याचा वापर करीत असल्यामुळे जोडणीला अडथळा येतो. त्यासाठी रात्री ऊशीरापर्यंत बसुन दाखले दिले जात आहेत.तातडीने आवश्यक सह्या आणुन विद्यार्थ्यांंना दाखले दिले जात आहेत.सर्व्हरचा अडथळा आहे.त्यामुळे संथ गतीने काम चालते.मध्यरात्रीपर्यंत दाखल्यांच्या नोंदणीचे काम...बारावीचा निकाल लागल्यानंतर दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. दिवसभर इंटरनेटचे स्पीड कमी मिळत असल्याने अडचणी येतात. त्यामुळे मध्यरात्री पर्यंत दररोज काम केले जात आहे. बारामती, इंदापूर तालुक्यातील जवळपास १३० ते १४० दाखले सेतू केंद्रात जमा होतात. तितकेच प्रमाण दोन्ही तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्रातून सादर होणाºया दाखल्यांचे आहे. सायंकाळ नंतर नेटचे स्पीड वाढते. त्यामुळे काम करणे शक्य होत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, यासाठी आमची यंत्रणा कार्यान्वित आहे, असे व्यवस्थापक नीलेश राजमाने यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या