शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा विभागाची चौकशी करा

By admin | Updated: January 7, 2015 00:46 IST

महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कारभारात अनागोंदी असून त्यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही उपाययोजना झाली नाही.

पुणे : महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कारभारात अनागोंदी असून त्यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही उपाययोजना झाली नाही. या प्रकरणी घनकचरा विभागाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कचऱ्यापासून वीज व गॅस निर्मिती प्रकल्पांवर होणारा भांडवली खर्च किती? त्यांची क्षमता किती? तेथे किती कचरा जातो? या प्रकल्पांवर केला जाणारा आवर्ती खर्च किती? हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालतात का? ते अधिक क्षमतेने चालावेत, यासाठी पालिकेतर्फे काय खबरदारी घेतली जाते? यासारखे अनेक प्रश्न कचऱ्याच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्येमुळे निर्माण झाले आहेत. त्यावर पालिकेने आजवर कधीही सविस्तर खुलासा केलेला नाही. पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे गेल्या काही वर्षांत कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी खत, वीज व गॅस निर्मितीचे अनेक प्रकल्प उभे राहिले. तरी, प्रत्यक्षात ते पूर्ण क्षमतेने सुरू नसतानाही सर्वसामान्य करदात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शहरातील कचऱ्याचेही प्रमाणही पैसे उकळण्यासाठी जास्त दाखविले जात असल्याचा आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला आहे. पालकमंत्र्यांनीही त्याबाबत नुकताच आक्षेप नोंदविला असल्याने घनकचरा विभागाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कचऱ्याशी अनेक प्रश्न निगडित असल्याने महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची श्वेतपत्रिकाजाहीर करावी, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)४कचऱ्यापासून वीज व गॅस निर्मितीचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती; पण त्याची दखल घेण्यात गेली नाही. ४एकूणच कारभारात अनागोंदी आहे. याबाबत घनकचरा विभागाची लाचलुचपत विभागामार्फत सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे व नागरिक चेतना मंचचे मेजर जनरल एस. सी. एन. जठार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.