शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

घनकचरा विभागाची चौकशी करा

By admin | Updated: January 7, 2015 00:46 IST

महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कारभारात अनागोंदी असून त्यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही उपाययोजना झाली नाही.

पुणे : महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कारभारात अनागोंदी असून त्यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही उपाययोजना झाली नाही. या प्रकरणी घनकचरा विभागाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कचऱ्यापासून वीज व गॅस निर्मिती प्रकल्पांवर होणारा भांडवली खर्च किती? त्यांची क्षमता किती? तेथे किती कचरा जातो? या प्रकल्पांवर केला जाणारा आवर्ती खर्च किती? हे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालतात का? ते अधिक क्षमतेने चालावेत, यासाठी पालिकेतर्फे काय खबरदारी घेतली जाते? यासारखे अनेक प्रश्न कचऱ्याच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्येमुळे निर्माण झाले आहेत. त्यावर पालिकेने आजवर कधीही सविस्तर खुलासा केलेला नाही. पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे गेल्या काही वर्षांत कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी खत, वीज व गॅस निर्मितीचे अनेक प्रकल्प उभे राहिले. तरी, प्रत्यक्षात ते पूर्ण क्षमतेने सुरू नसतानाही सर्वसामान्य करदात्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शहरातील कचऱ्याचेही प्रमाणही पैसे उकळण्यासाठी जास्त दाखविले जात असल्याचा आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केला आहे. पालकमंत्र्यांनीही त्याबाबत नुकताच आक्षेप नोंदविला असल्याने घनकचरा विभागाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जावी, अशी मागणी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कचऱ्याशी अनेक प्रश्न निगडित असल्याने महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची श्वेतपत्रिकाजाहीर करावी, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)४कचऱ्यापासून वीज व गॅस निर्मितीचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याबाबत पालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती; पण त्याची दखल घेण्यात गेली नाही. ४एकूणच कारभारात अनागोंदी आहे. याबाबत घनकचरा विभागाची लाचलुचपत विभागामार्फत सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे व नागरिक चेतना मंचचे मेजर जनरल एस. सी. एन. जठार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.