शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रीय संगीतात नावीन्यपूर्ण प्रयोग व्हावेत

By admin | Updated: April 29, 2017 03:49 IST

ज्येष्ठ गायक पं. शरद साठे म्हणाले, ‘अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये घराणेशाहीला अनन्यसाधारण महत्व आहे. ग्वाल्हेर हे सर्व घराण्यांचे उगमस्थान आहे.

ज्येष्ठ गायक पं. शरद साठे म्हणाले, ‘अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये घराणेशाहीला अनन्यसाधारण महत्व आहे. ग्वाल्हेर हे सर्व घराण्यांचे उगमस्थान आहे. हे घराणे ख्याल गायकीसाठी प्रसिध्द आहे. नख्खन तीरबक्ष हे घराण्याचे मुख्य गायक. पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्रात ग्वाल्हेर गायकीचा प्रचार आणि प्रसार केला. मी दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यानंतर, पं. शरदचंद्र आरोळकर यांच्याकडूनही शिकलो. ग्वाल्हेर गायकीमध्ये तराणा, टप्पा, त्रिवट, हस्तपदी असे अनेक प्रकार गायले जातात. मात्र, ठुमरीचा फारसा प्रचार झाला नाही. सध्याच्या काळात शास्त्रीय संगीतातील स्पर्धा वाढली आहे. प्रत्येकाला झटपट नाव, प्रसिध्दी, पैसा हवा असतो. पूर्वीच्या गायकांनी घराण्याची परंपरा जपण्यासाठी खूप कष्ट घेतले. आताच्या पिढीकडे संगीताचा समृध्द वारसा हस्तांतरित केला. आताच्या पिढीने त्यांची उतराई होण्याची गरज आहे. गाण्यातील प्रत्येक परंपरा प्रयोगशील आहे. ही परंपरा वृध्दिंगत करताना आणि गुरुची शिकवण अवंलबताना स्वत:चा विचार गायकीत उतरायला हवा. नवोदित गायकांनी गुरुंची नक्कल न करता सर्जनशीलता जपल्यास गाणे जास्त खुलते. भाव, औचित्य, लावण्य, सौंदर्य गायनातून कल्पकतेने मांडल्यास ते गाणे दर्दी रसिकांपर्यंत पोचते. गायन करताना बंदिशीचा तालाबरोबर विस्तार करणे गरजेचे असते. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताला समृध्द परंपरा आहे. ही परंपरा नष्ट होऊ नये, यासाठी मुळचा गाभा न बिघडवता, नावीन्यपूर्ण प्रयोग नक्कीच झाले पाहिजेत. प्रयोगशीलतेतून संगीताला नवी झळाळी मिळते. संगीत शिकताना किंवा सादर करताना लोकप्रियतेसाठी संगीताशी तोडजोड करुन चालत नाही. आजकाल काही गायकांचा उथळ प्रसिध्दीकडे कल असतो. मात्र, तात्पुरत्या प्रसिध्दीचा विचार केल्यास संगीताची साधना करता येत नाही. आजकाल गुरु-शिष्य परंपरेपेक्षा शिक्षक-विद्यार्थी प्रबळ होत आहे. पूर्वी गुरुच्या संगतीत राहून शिष्यांना त्यांचे आचार-विचार, संगीतात उतरवण्याची पध्दत जाणून घेता येत असे. आजकाल काही तास संगीत शिकण्याची पध्दत रुढ होत आहे. गुरु संगीताचे धडे देताना शिष्याच्या उन्नतीसाठी काय करता येईल, याकडे लक्ष देत असतो. सर्व दृष्टीकोनातून शिष्याला स्वावलंबी करुन स्वत:च्या पायावर उभे रहायला शिकवतो. अशा वेळी गुरुची शिकवण गायनात उतरवताना स्वत:ची शैली विकसित करणेही आवश्यक असते. भारतीय संगीत हा सुखसंवाद आहे. रसिकांची वाहवा मिळाल्याने गायकाला स्फुरण चढते. आजकाल, शास्त्रीय संगीताप्रमाणे इतर गायनप्रकारही प्रचलित होत आहेत. प्रत्येक गाण्याचा श्रोतृवर्ग वेगळा असतो. गाणे दर्जा आणि परिस्थितीवर अवलंबून असते. गायन आणि वादन परस्परपूरक असतात. त्यामुळे वादकांनाही गायनाची जाण असणे आवश्यक असते. गायनाची जाण येण्यासाठी मेहनत, विचार आणि परंपरा जपणे आवश्यक असते. लहान मुलांवर गायनाचे संस्कार झाले पाहिजेत. प्रत्येक जण गायक होईलच असे नाही. मात्र, शास्त्रीय संगीताची किमान जाण असेल तर कलेप्रती संवेदनशीलता वाढते. गायक निपजताना बाहेरच्या आमिषांना बळी न पडता रियाझावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. त्यासाठी रियाझामधून आवाजावर संस्कार करावे लागतात. संगीताची अपरिमित साधना करणे गरजेचे असते.