शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

शास्त्रीय संगीतात नावीन्यपूर्ण प्रयोग व्हावेत

By admin | Updated: April 29, 2017 03:49 IST

ज्येष्ठ गायक पं. शरद साठे म्हणाले, ‘अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये घराणेशाहीला अनन्यसाधारण महत्व आहे. ग्वाल्हेर हे सर्व घराण्यांचे उगमस्थान आहे.

ज्येष्ठ गायक पं. शरद साठे म्हणाले, ‘अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये घराणेशाहीला अनन्यसाधारण महत्व आहे. ग्वाल्हेर हे सर्व घराण्यांचे उगमस्थान आहे. हे घराणे ख्याल गायकीसाठी प्रसिध्द आहे. नख्खन तीरबक्ष हे घराण्याचे मुख्य गायक. पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्रात ग्वाल्हेर गायकीचा प्रचार आणि प्रसार केला. मी दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यानंतर, पं. शरदचंद्र आरोळकर यांच्याकडूनही शिकलो. ग्वाल्हेर गायकीमध्ये तराणा, टप्पा, त्रिवट, हस्तपदी असे अनेक प्रकार गायले जातात. मात्र, ठुमरीचा फारसा प्रचार झाला नाही. सध्याच्या काळात शास्त्रीय संगीतातील स्पर्धा वाढली आहे. प्रत्येकाला झटपट नाव, प्रसिध्दी, पैसा हवा असतो. पूर्वीच्या गायकांनी घराण्याची परंपरा जपण्यासाठी खूप कष्ट घेतले. आताच्या पिढीकडे संगीताचा समृध्द वारसा हस्तांतरित केला. आताच्या पिढीने त्यांची उतराई होण्याची गरज आहे. गाण्यातील प्रत्येक परंपरा प्रयोगशील आहे. ही परंपरा वृध्दिंगत करताना आणि गुरुची शिकवण अवंलबताना स्वत:चा विचार गायकीत उतरायला हवा. नवोदित गायकांनी गुरुंची नक्कल न करता सर्जनशीलता जपल्यास गाणे जास्त खुलते. भाव, औचित्य, लावण्य, सौंदर्य गायनातून कल्पकतेने मांडल्यास ते गाणे दर्दी रसिकांपर्यंत पोचते. गायन करताना बंदिशीचा तालाबरोबर विस्तार करणे गरजेचे असते. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताला समृध्द परंपरा आहे. ही परंपरा नष्ट होऊ नये, यासाठी मुळचा गाभा न बिघडवता, नावीन्यपूर्ण प्रयोग नक्कीच झाले पाहिजेत. प्रयोगशीलतेतून संगीताला नवी झळाळी मिळते. संगीत शिकताना किंवा सादर करताना लोकप्रियतेसाठी संगीताशी तोडजोड करुन चालत नाही. आजकाल काही गायकांचा उथळ प्रसिध्दीकडे कल असतो. मात्र, तात्पुरत्या प्रसिध्दीचा विचार केल्यास संगीताची साधना करता येत नाही. आजकाल गुरु-शिष्य परंपरेपेक्षा शिक्षक-विद्यार्थी प्रबळ होत आहे. पूर्वी गुरुच्या संगतीत राहून शिष्यांना त्यांचे आचार-विचार, संगीतात उतरवण्याची पध्दत जाणून घेता येत असे. आजकाल काही तास संगीत शिकण्याची पध्दत रुढ होत आहे. गुरु संगीताचे धडे देताना शिष्याच्या उन्नतीसाठी काय करता येईल, याकडे लक्ष देत असतो. सर्व दृष्टीकोनातून शिष्याला स्वावलंबी करुन स्वत:च्या पायावर उभे रहायला शिकवतो. अशा वेळी गुरुची शिकवण गायनात उतरवताना स्वत:ची शैली विकसित करणेही आवश्यक असते. भारतीय संगीत हा सुखसंवाद आहे. रसिकांची वाहवा मिळाल्याने गायकाला स्फुरण चढते. आजकाल, शास्त्रीय संगीताप्रमाणे इतर गायनप्रकारही प्रचलित होत आहेत. प्रत्येक गाण्याचा श्रोतृवर्ग वेगळा असतो. गाणे दर्जा आणि परिस्थितीवर अवलंबून असते. गायन आणि वादन परस्परपूरक असतात. त्यामुळे वादकांनाही गायनाची जाण असणे आवश्यक असते. गायनाची जाण येण्यासाठी मेहनत, विचार आणि परंपरा जपणे आवश्यक असते. लहान मुलांवर गायनाचे संस्कार झाले पाहिजेत. प्रत्येक जण गायक होईलच असे नाही. मात्र, शास्त्रीय संगीताची किमान जाण असेल तर कलेप्रती संवेदनशीलता वाढते. गायक निपजताना बाहेरच्या आमिषांना बळी न पडता रियाझावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. त्यासाठी रियाझामधून आवाजावर संस्कार करावे लागतात. संगीताची अपरिमित साधना करणे गरजेचे असते.