शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

परीक्षा संचालकांना हटविण्याच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:27 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : आज व्यवस्थापन परिषदेची बैठक

पुणे : विधी विषयाच्या पेपरफुटीला केवळ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण हेच जबाबदार आहेत, असा ठपका ठेवून त्यांना पदावरून हटविण्याच्या हालचाली विद्यापीठाच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागाच्या प्रथम वर्षाचे काही पेपर परीक्षेपूर्वीच संकेतस्थळावर अपलोड झाले होते. याप्रकरणी परीक्षा विभागाच्या संचालकांना दोषी धरण्यात येत आहे. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीकडून संचालकांवर कारवाई करण्याची शिफारस केली.परीक्षा मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. त्यामध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्या कामकाजाबाबत सर्वांकडूनच नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृतरीत्या पत्रकारांना कळविण्यात आले. वस्तुत: विद्यापीठामध्ये अनेक समित्यांच्या बैठका होतात, मात्र त्या बैठकांमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती अधिकृतपणे देण्याचे टाळले जाते. त्याचा वृत्तांत अत्यंत मोघमपणे दिला जातो.

मात्र, परीक्षा संचालक दोषी असल्याचे अधिकृतपणे पत्रकारांना अनेकदा कळविण्यात येत आहे. या मागे विद्यापीठाच्या वरिष्ठ पातळीवर काही राजकारण शिरत असल्याची शंका विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यासाठी काही विद्यार्थी संघटनांनी याविरोधात आंदोलन करावे यासाठी त्यांना फूस लावण्यात आल्याचेही बोलले जात आहे.

वस्तुत: विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका अपलोड होण्याची ही घटना ही चुकीने घडली आहे. तरीही कारवाई करण्याचा हेका धरला जात आहे. विद्यापीठातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन प्रश्नपत्रिका फोडल्याचे उजेडात आले. त्यांच्यावर फौजदारी गुन्हेही दाखल झाले. मात्र त्यांना पुन्हा विद्यापीठाने नोकरीत घेतले. इथे केवळ चुकीने झालेल्या प्रकाराबद्दल थेट कारवाईचा बडगा उचलण्याच्या हालचाली सुरू आहेत.व्यवस्थापन परिषदेच्या भूमिकेकडे लक्षव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठराव मांडून परीक्षा विभागाच्या संचालकांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्या काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.पेपर कधी घेणार, याबाबत मौनविधी विभागाच्या परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या विषयांची पुन्हा परीक्षा घेणार, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र, किती विषयांची पुनर्परीक्षा होणार, ती कधी होणार, याबाबत विद्यापीठाकडून काहीच सांगितले जात नाही. त्यामुळे विधी विभागाच्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेची भावना आहे.