शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणांच्या मोजणीसाठी पुढाकार

By admin | Updated: November 27, 2015 01:41 IST

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्याचा जिल्हा परिषदेचा विचार असून, त्याचाच एक भाग म्हणून गावागावांतील प्रॉपर्टीचे वाद मिटविण्यासाठी जिल्ह्याती

पुणे : स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्याचा जिल्हा परिषदेचा विचार असून, त्याचाच एक भाग म्हणून गावागावांतील प्रॉपर्टीचे वाद मिटविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांतील गावठाणांची मोजणी करण्याचा प्रस्ताव गुरुवारी जिल्हा परिषदेने स्थायी समिती सभेत तत्त्वत: मंजूर करून घेतला. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत घेऊन शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले.शासनाच्या सिटी सर्व्हे या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार लोकसंख्येपेक्षा जास्त असलेल्या ४०० गावांत आतापर्यंत गावठाणांची मोजणी करण्यात आलेली आहे. जिल्हात १,४६३ गावठाणांची मोजणी झालेली नाही. त्यात शासन जिल्हा परिषदांना बांधकाम नोंदीचे अधिकार देण्याच्या तयारीत आहे. या गावांत गावठाणेच निश्चित झाली नाहीत, तर नोंदी कशा घ्यायच्या, हा प्रश्न आहे. तसेच, ही मोजणी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रॉपर्टीवरून मोठे वाद होत असतात. तसेच, अतिक्रमणही झाले. जिल्ह्यात ग्रुप ग्रामपंचायती होत्या. आता त्या वेगळ््या होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्या आहेत. त्यांना गावठाणच नाही. त्या ग्रामपंचायतींनी गावठाण जाहीर करावे, असे प्रस्ताव पाठविले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेने शासनाचीच गावठाण मोजणीची मोहीम पुढाकार घेऊन वेगळ्या पद्धतीने कशी राबविता येईल, याचा प्र्रस्ताव तयार केला आहे. आज झालेल्या स्थायी समिती सभेत या प्रस्तावाचे भूमीअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. मुख्याधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव तयार केला असून त्याला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. शासन २ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांतील गावठाणाची मोजणी करीत आहे. जिल्हा परिषदेने यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांचीही गावठाण मोजणी करण्याचे ठरविले आहे. एका गावासाठी साधारण १ हजार २०० रुपये खर्च येतो. याप्रमाणे सर्व गावांतील मोजणी करण्यासाठी सुमारे ७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मोजणीसाठीचा खर्च शासन देते; मात्र एकाच वेळी ऐवढा निधी शासन देणे शक्य नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपात ५ ते १० कोटी स्व निधीतून दिले, तर ही मोजणी मोठ्या प्रमाणात करता येईल. गावांच्या मोजणीतून फी स्वरूपात येणारे पैसे जमा करून जिल्हा परिषदेचा निधी ९० टक्के तरी परत मिळू शकतो. त्यातून पुन्हा पुढच्या टप्प्यातील गावे घेता येतील. ही फी गोळा करण्याची रितसर परवानगी शासनाकडे मागितली जाणार आहे. शासनाने यास मंजुरी दिली तर जिल्हातील गावागावांत प्रॉपर्टीवरून होणारे वाद यामुळे मिटतील. हा प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेत तो मंजुरसाठी ठेवण्यात येईल. तेथे मंजुरीनंतर तो शासनाकडे पाठविण्यात येणार असून, शासनाने मंजुरी दिली तर ही मोहीम हाती घेण्यात येईल.