शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सकस आहारासाठी ‘अक्षयपात्र’चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:53 IST

मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावामुळे नागपूर, ठाण्यानंतर पुणे शहरात काम

पुणे : महापालिकेच्या शाळांमधील मुलांनादेखील सकस आणि पोष्टिक पोषण आहार मिळावा यासाठी ‘सीएसआर’च्या माध्यमातून ‘अक्षयपात्र’ या संस्थेने पुढाकार घेताल आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावानंतर नागपूर, ठाण्यानंतर आता पुणे शहरामध्ये देखील संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यात येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर हडपसर, कोंढवा-येवलेवाडी आणि रामटेकडी-वानवडी या तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ३९ शाळांमधील २५ हजार विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’च्या वतीने पोषण आहार देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यासाठी महापालिकेने सर्व शाळांसाठी त्या-त्या भागातील बचत गटांना पोषण आहार पुरविण्याचे काम देण्यात आले. परंतु आता शासनाने सीएसआर निधी अतंर्गत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्य शासनाने मेक इन महाराष्ट्र योजनेंतर्गत मोठ्या कंपन्यांना सीएसआरअंतर्गत प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले होते. त्यात अक्षयपात्रनेही महापालिका शाळांमध्ये मध्यान्ह भोजन देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबत जानेवारी महिन्यात मुंबईत होणाऱ्या महापरिवर्तन मेळाव्यात महापालिका आणि अक्षयपात्र संस्थेत करार केला जाणार आहे.४00 बचत गटांची नोंदमहापालिकेकडे तब्बल ४०० हून अधिक बचत गटांनी नोंदी केल्या. त्यापैकी सध्या विविध २०० बचत गटांमार्फत शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो.यंत्राद्वारे अन्न तयारमहापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षयपात्र संस्थेकडून देण्यात येणाºया शालेय पोषण आहाराच्या माहितीसाठी संस्थेचे ठाणे महापालिकेत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. या शिवाय, संस्थेस महंमदवाडी येथे सेंट्रल किचनसाठी एक ते दीड एकर जागा मिळाली असल्याने या ठिकाणी तयार होणारे अन्न हे जवळपास ९० टक्के मानवस्पर्शरहित यंत्रणेद्वारे तयार होते. त्यामुळे मुलांना आरोग्यदायी व सकस पोषण आहार मिळणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणे