शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वर्गव्यवस्थेची विषमता दूर व्हायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

भोर : श्रीमंतांच्या मुलांना सर्व शैक्षणिक सुविधा मिळत असतात. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना त्या मिळत नाही. यामुळे वर्ण ...

भोर : श्रीमंतांच्या मुलांना सर्व शैक्षणिक सुविधा मिळत असतात. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना त्या मिळत नाही. यामुळे वर्ण नव्हे तर वर्ग व्यवस्था निर्माण झाली आहे. ही विषमता दूर होण्यासाठी राज्यघटनेने दिलेला शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, तरच देश सक्षम होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील आवणी संस्थेच्या संचालिका प्रा. अुनराधा भोसले यांनी केले.

भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयाचे सभागृहात सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त आयोजित सावित्रीबाई फुले विचार महोत्सवात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डाॅ. वृषाली रणधीर या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. मनोहर जाधव, महसूलचे सहआयुक्त संतोष हराळे, जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त

प्रसाद शिंदे, प्राचार्य डाॅ. प्रसन्नकुमार देशमुख,फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक डाॅ. प्रा. रोहिदास जाधव, डाॅ. प्रदिप पाटील, डाॅ. अरुण बुरांडे, डाॅ. सुरेश गोरेगावकर, रावसाहेब पवार, सुनंदा गायकवाड, विजया पाटील, सविता कोठावळे, हसीना शेख, सुजाता दळवी, प्राचार्य मोहन ताकवले, सुरेश साळुंके उपस्थित होते.

या वेळी प्रा. अनुराधा भोसले यांचा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले सामाजिक कार्यगौरव पुरस्काराने शाल श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन डाॅ. मनोहर जाधव यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

या वेळी संतोष हराळे, डाॅ. प्रसन्नकुमार देशमुख,डाॅ. मनोहर जाधव यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

अध्यक्षीय भाषणात डाॅ. वृषाली रणधीर यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.सुजाता भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कोठावळे व सुजाता भालेराव यांनी केले. आभार अशोक शिंदे यांनी मानले.

०४ भोर सत्कार

अनुराधा भोसले यांचा सत्कार करताना मनोहर जाधव व इतर.