शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक सुरक्षा फक्त कागदावरच! राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:24 IST

सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनाचे औचित्य साधून कुरकुंभ येथील प्रत्येक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेची माहिती देणारे विविध फलक झळकताना दिसत आहेत. या आठवड्यात प्रत्येक कामगाराला सुरक्षेविषयी प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाच्या वेळेस सुरक्षेची शपथ दिली जाते.

कुरकुंभ  - सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनाचे औचित्य साधून कुरकुंभ येथील प्रत्येक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेची माहिती देणारे विविध फलक झळकताना दिसत आहेत. या आठवड्यात प्रत्येक कामगाराला सुरक्षेविषयी प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाच्या वेळेस सुरक्षेची शपथ दिली जाते. सुरक्षेविषयी विविध घोषणा लिहिलेले बॅच लावून जणू सुरक्षेचा फार्स त्यांच्याभोवती आवळला जाताना दिसत आहे, मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी अगदी शून्य असून, सुरक्षेचे धडे फक्त कागदावरच असल्याचे वास्तव कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात दिसून येत आहे.४ ते ११ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यामध्ये औद्योगिक सुरक्षेविषयी विविध माहिती व ज्ञान प्रत्येक कामगाराला देऊन स्वत: सुरक्षित राहून सुरक्षित काम करण्याविषयी त्याची मानसिकता करण्याचा प्रयत्न हा विविध प्रशिक्षण व प्रायोगिक प्रात्यक्षिके सादर करून दाखवला जातो. औद्योगिक क्षेत्र सुरक्षित ठेवून आपला परिसर कसा सुरक्षित ठेवावा याबाबत व्यवस्थापन आपआपल्या परीने प्रयत्न करीत असतात. मात्र प्रत्यक्षात वर्षभर त्याची अंमलबजावणी खुद्द कंपनी व्यवस्थापन किती प्रमाणात करते हे पाहणे आवश्यक आहे. एकीकडे कामगारांना सुरक्षेचे धडे देण्याचे काम करायचे व दुसरीकडे कामगारांना सुरक्षेच्या यंत्रणा न देताच काम करवून घ्यायचे, असा दुतोंडी कारभार सध्या याभागात सर्रास होताना दिसून येत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात आजवर झालेले अपघात पाहता याला दुजोरा मिळतो.रासायनिक प्रकल्प असणाºया या औद्योगिक क्षेत्रात अगदी बोटावर मोजण्याइतक्याच कंपनी प्रशासनाकडे सुरक्षेची उपयोगी साधने असल्याचे आढळून येते. जवळपास शंभरपेक्षा जास्त छोटे-मोठे उद्योग या ठिकाणी आहेत; मात्र अगदी तुरळक ठिकाणीच रुग्णवाहिका आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ही औद्योगिक सुरक्षा फक्त दोन अग्निशामक वाहन असणाºया गाड्यांवर अवलंबून आहे, तर रासायनिक प्रकल्पातील आग विझविण्याचे काम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देखील या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे बहुतांश वेळेस अपघाताची तीव्रता अपुरी यंत्रणा व अपघाताच्या जागी फक्त उशीर झाल्यामुळे वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.एकंदरीतच कुरकुंभ येथील काही कंपनी व्यवस्थापन सोडले तर सुरक्षेचा बोजवारा उडालेला असताना फक्त प्रवेशद्वारावर फलक लावल्याने सुरक्षा वाढेल का? हे खुद्द कंपनी व्यवस्थापनाने तपासणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारचा औद्योगिक प्रकल्प उभा करताना सुरक्षा यंत्रणा व सुरक्षाविषयी उपकरणे उपलब्ध करून देणे, कामगारांना याबाबत चांगले प्रशिक्षण देणे व अपघातानंतर लागणारी यंत्रणा जवळपासउभारणे अशी कामे प्रत्यक्षात केली तरच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा होईल अन्यथा फक्त पंचतारांकित प्रशिक्षण देण्याचा फार्स करून एखाद्या मनोरंजनाचा कार्यक्रम केल्यासारखे काही क्षण नाटक करणे हे योग्य नाही.अपुरी औद्योगिक यंत्रणाअपुरी यंत्रणा व याबाबत असणारे अज्ञान यामुळे कामगारांना आपला नाहक जीव गमवावा लागतो व कंपनी व्यवस्थापन अपघातात मृत कामगाराला किती आर्थिक मदत केली याचे ढोल वाजवत बसतात. व याला जबाबदार सरकारी यंत्रणादेखील फक्त आर्थिक संबंध जपण्यापलीकडे काहीच करीत नसल्याचे आजवरचा इतिहास सांगतो.एक हजार किंवा त्याच्या जवळपास कामगार असणाºया कंपनीत फक्त एक सुरक्षा अधिकारी असतो, मात्र त्या अधिका-याचे याकडे जास्त लक्ष नसते, त्यामुळे जर कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षा यंत्रणा पुरवली नाही तर सुरक्षा अधिकाºयाला काम बंद करण्याचा अधिकार आहे का? आणि असेल तर तो काम का बंद करीत नाही?

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या