शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

औद्योगिक सुरक्षा फक्त कागदावरच! राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:24 IST

सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनाचे औचित्य साधून कुरकुंभ येथील प्रत्येक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेची माहिती देणारे विविध फलक झळकताना दिसत आहेत. या आठवड्यात प्रत्येक कामगाराला सुरक्षेविषयी प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाच्या वेळेस सुरक्षेची शपथ दिली जाते.

कुरकुंभ  - सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दिनाचे औचित्य साधून कुरकुंभ येथील प्रत्येक कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षेची माहिती देणारे विविध फलक झळकताना दिसत आहेत. या आठवड्यात प्रत्येक कामगाराला सुरक्षेविषयी प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक कामगाराला त्याच्या कामाच्या वेळेस सुरक्षेची शपथ दिली जाते. सुरक्षेविषयी विविध घोषणा लिहिलेले बॅच लावून जणू सुरक्षेचा फार्स त्यांच्याभोवती आवळला जाताना दिसत आहे, मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी अगदी शून्य असून, सुरक्षेचे धडे फक्त कागदावरच असल्याचे वास्तव कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रात दिसून येत आहे.४ ते ११ मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यामध्ये औद्योगिक सुरक्षेविषयी विविध माहिती व ज्ञान प्रत्येक कामगाराला देऊन स्वत: सुरक्षित राहून सुरक्षित काम करण्याविषयी त्याची मानसिकता करण्याचा प्रयत्न हा विविध प्रशिक्षण व प्रायोगिक प्रात्यक्षिके सादर करून दाखवला जातो. औद्योगिक क्षेत्र सुरक्षित ठेवून आपला परिसर कसा सुरक्षित ठेवावा याबाबत व्यवस्थापन आपआपल्या परीने प्रयत्न करीत असतात. मात्र प्रत्यक्षात वर्षभर त्याची अंमलबजावणी खुद्द कंपनी व्यवस्थापन किती प्रमाणात करते हे पाहणे आवश्यक आहे. एकीकडे कामगारांना सुरक्षेचे धडे देण्याचे काम करायचे व दुसरीकडे कामगारांना सुरक्षेच्या यंत्रणा न देताच काम करवून घ्यायचे, असा दुतोंडी कारभार सध्या याभागात सर्रास होताना दिसून येत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात आजवर झालेले अपघात पाहता याला दुजोरा मिळतो.रासायनिक प्रकल्प असणाºया या औद्योगिक क्षेत्रात अगदी बोटावर मोजण्याइतक्याच कंपनी प्रशासनाकडे सुरक्षेची उपयोगी साधने असल्याचे आढळून येते. जवळपास शंभरपेक्षा जास्त छोटे-मोठे उद्योग या ठिकाणी आहेत; मात्र अगदी तुरळक ठिकाणीच रुग्णवाहिका आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात ही औद्योगिक सुरक्षा फक्त दोन अग्निशामक वाहन असणाºया गाड्यांवर अवलंबून आहे, तर रासायनिक प्रकल्पातील आग विझविण्याचे काम करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ देखील या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे बहुतांश वेळेस अपघाताची तीव्रता अपुरी यंत्रणा व अपघाताच्या जागी फक्त उशीर झाल्यामुळे वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.एकंदरीतच कुरकुंभ येथील काही कंपनी व्यवस्थापन सोडले तर सुरक्षेचा बोजवारा उडालेला असताना फक्त प्रवेशद्वारावर फलक लावल्याने सुरक्षा वाढेल का? हे खुद्द कंपनी व्यवस्थापनाने तपासणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारचा औद्योगिक प्रकल्प उभा करताना सुरक्षा यंत्रणा व सुरक्षाविषयी उपकरणे उपलब्ध करून देणे, कामगारांना याबाबत चांगले प्रशिक्षण देणे व अपघातानंतर लागणारी यंत्रणा जवळपासउभारणे अशी कामे प्रत्यक्षात केली तरच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा होईल अन्यथा फक्त पंचतारांकित प्रशिक्षण देण्याचा फार्स करून एखाद्या मनोरंजनाचा कार्यक्रम केल्यासारखे काही क्षण नाटक करणे हे योग्य नाही.अपुरी औद्योगिक यंत्रणाअपुरी यंत्रणा व याबाबत असणारे अज्ञान यामुळे कामगारांना आपला नाहक जीव गमवावा लागतो व कंपनी व्यवस्थापन अपघातात मृत कामगाराला किती आर्थिक मदत केली याचे ढोल वाजवत बसतात. व याला जबाबदार सरकारी यंत्रणादेखील फक्त आर्थिक संबंध जपण्यापलीकडे काहीच करीत नसल्याचे आजवरचा इतिहास सांगतो.एक हजार किंवा त्याच्या जवळपास कामगार असणाºया कंपनीत फक्त एक सुरक्षा अधिकारी असतो, मात्र त्या अधिका-याचे याकडे जास्त लक्ष नसते, त्यामुळे जर कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षा यंत्रणा पुरवली नाही तर सुरक्षा अधिकाºयाला काम बंद करण्याचा अधिकार आहे का? आणि असेल तर तो काम का बंद करीत नाही?

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या