शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

इंद्रायणी नदीने काठ सोडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:19 IST

मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी नदीलगतच्या भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने श्रींचे दर्शन बंद करण्यात आले आहे.

आळंदी - मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी नदीलगतच्या भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने श्रींचे दर्शन बंद करण्यात आले आहे. नदीत पोहण्याचा हट्ट न करण्याचे आळंदी पालिकेच्या प्रशासनाने आवाहन केले आहे.पुराचे पाणी भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने पुंडलिक मंदिर भाविकांच्या दर्शनास बंद झाले असून भक्ती सोपान पुलावरून पाणी जात असल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. नदीलगतच्या पाण्याखाली गेलेल्या किनाऱ्याजवळून जातांना नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सुचना मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिल्या आहेत. पुराचे पाणी पाहण्यास परिसरात गर्दी होत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा रस्ते आणि भक्ती सोपान पूल वापरास तात्पुरता बंद झाला आहे. लगतच्या पूर्व किनाºयावरील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रहदारीस धोकादायक झाले आहे.इंद्रायणी नदीदर्शनास भाविक आणि नागरिक, शालेय मुले, प्रवासी गर्दी करून पावसाचा आनंद लुटत आहेत. इंद्रायणी नदीवरील पाचही पुलांवर थांबल्यानंतर इंद्रायणीला आलेला पूर पाहता येत असल्याने नदीचे दुतर्फा विहंगम दृष्य नेत्रात साठविण्यास भाविक जमत आहेत. माऊली मंदिर आणि इंद्रायणी नदीघाट वैभव, तसेच श्री ज्ञानेश्वरी मंदिर, विश्वरूपदर्शन मंच, गरुडस्तंभ, नव्याने विकसित झालेला पाचवा पूलदेखील परिसरातील नागरिकांचे प्रवाशांचे लक्ष वेधत आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी पुलावर वाहने थांबवून वाहनचालकदेखील दिसत होते. इंद्रायणी नदीवरील भक्त पुंडलिकाच्या मंदिरासह भागीरथी कुंडात पुराचे पाणी साचले आहे. यामुळे भागीरथी कुंडही पाण्यातगेले आहे.नदीकाठच्या गावांना इशारामावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाचे आळंदीतून वाहणाºया इंद्रायणी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी नदीपात्रात वाढत आहे. यामुळे नगर परिषद प्रशासनाने भाविकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालून नागरिक पाण्यात स्नानासाठी जात आहेत. या परिसरातील पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह न आवरता अनेक जण नदीपात्रात दूरवर स्नानास जाताना दिसत होते. आपत्ती निवारण यंत्रणेने नदी परिसरात दक्षता घेऊन पोहण्यास जाणाºया नागरिकांना, युवकांना, भाविकांना रोखण्याची मागणी नागरिकच करीत आहेत. आषाढी यात्रेच्या प्रस्थान काळात दोन जणांना पुरात वाहून जाताना वाचविण्यात आल्याची घटना ताजी असताना आळंदीतील नदीपात्रात पुराच्या पाण्यात पोहण्यास जाणाºयांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीPuneपुणे