शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

इंद्रायणी नदीने काठ सोडला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:19 IST

मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी नदीलगतच्या भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने श्रींचे दर्शन बंद करण्यात आले आहे.

आळंदी - मावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी नदीलगतच्या भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने श्रींचे दर्शन बंद करण्यात आले आहे. नदीत पोहण्याचा हट्ट न करण्याचे आळंदी पालिकेच्या प्रशासनाने आवाहन केले आहे.पुराचे पाणी भक्त पुंडलिक मंदिरात शिरल्याने पुंडलिक मंदिर भाविकांच्या दर्शनास बंद झाले असून भक्ती सोपान पुलावरून पाणी जात असल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. नदीलगतच्या पाण्याखाली गेलेल्या किनाऱ्याजवळून जातांना नागरिकांनी दक्षता घेण्याच्या सुचना मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिल्या आहेत. पुराचे पाणी पाहण्यास परिसरात गर्दी होत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा रस्ते आणि भक्ती सोपान पूल वापरास तात्पुरता बंद झाला आहे. लगतच्या पूर्व किनाºयावरील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रहदारीस धोकादायक झाले आहे.इंद्रायणी नदीदर्शनास भाविक आणि नागरिक, शालेय मुले, प्रवासी गर्दी करून पावसाचा आनंद लुटत आहेत. इंद्रायणी नदीवरील पाचही पुलांवर थांबल्यानंतर इंद्रायणीला आलेला पूर पाहता येत असल्याने नदीचे दुतर्फा विहंगम दृष्य नेत्रात साठविण्यास भाविक जमत आहेत. माऊली मंदिर आणि इंद्रायणी नदीघाट वैभव, तसेच श्री ज्ञानेश्वरी मंदिर, विश्वरूपदर्शन मंच, गरुडस्तंभ, नव्याने विकसित झालेला पाचवा पूलदेखील परिसरातील नागरिकांचे प्रवाशांचे लक्ष वेधत आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी पुलावर वाहने थांबवून वाहनचालकदेखील दिसत होते. इंद्रायणी नदीवरील भक्त पुंडलिकाच्या मंदिरासह भागीरथी कुंडात पुराचे पाणी साचले आहे. यामुळे भागीरथी कुंडही पाण्यातगेले आहे.नदीकाठच्या गावांना इशारामावळ पाणलोट आणि लाभक्षेत्रात होत असलेल्या पावसाचे आळंदीतून वाहणाºया इंद्रायणी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी नदीपात्रात वाढत आहे. यामुळे नगर परिषद प्रशासनाने भाविकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालून नागरिक पाण्यात स्नानासाठी जात आहेत. या परिसरातील पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह न आवरता अनेक जण नदीपात्रात दूरवर स्नानास जाताना दिसत होते. आपत्ती निवारण यंत्रणेने नदी परिसरात दक्षता घेऊन पोहण्यास जाणाºया नागरिकांना, युवकांना, भाविकांना रोखण्याची मागणी नागरिकच करीत आहेत. आषाढी यात्रेच्या प्रस्थान काळात दोन जणांना पुरात वाहून जाताना वाचविण्यात आल्याची घटना ताजी असताना आळंदीतील नदीपात्रात पुराच्या पाण्यात पोहण्यास जाणाºयांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीPuneपुणे