शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

डिटर्जंटच्या प्रदूषणामुळे इंद्रायणी फेसाळली, प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्राथमिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 12:55 IST

इंद्रायणी नदीच्या उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट सोडले जात आहे....

- विश्वास मोरे

पिंपरी : गेल्या दहा दिवसांपासून इंद्रायणी नदी फेसाळत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा दिवस पाण्याचे नमुने घेतले आहेत. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. नदी फेसाळण्याचे कारण डिटर्जंट असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. दूषित पाणी नद्यांमध्ये जाणार नाही, याची दक्षता महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसीने घ्यावी, अशा सूचनाही मंडळाने केल्या आहे.

इंद्रायणी नदीच्या उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट सोडले जात आहे. २ जानेवारीपासून नदी फेसाळत आहे. मात्र, आळंदी नगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी यांना प्रदूषणाचे ठोस कारण सापडले नव्हते. आता प्रदूषण नियंत्रण मंडळास ते सापडले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंतची निरीक्षणे

१) नदीवर चिंबळी आणि आळंदी येथे दोन बंधारे आहेत. चिंबळीच्या बंधाऱ्यातून काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हा बंधारा ओव्हरफ्लो झाला की, आळंदीचा बंधारा ओव्हरफ्लो होतो. ते पाणी १२ ते १५ फुटांवरून खाली पडते. तेथे फेस निर्माण होत आहे. हा फेस शंभर ते दीडशे मीटर अंतरापर्यंत कायम राहत आहे.

२) यापूर्वी घेतलेल्या नमुन्यांमधील पाण्यात साबण अर्थात डिटर्जंटयुक्त रसायन आढळून आले आहे. ज्यावेळी बंधाऱ्यातून पाणी पडते, त्यावेळी फेस येतो. त्यामुळे सध्या येणारा फेस डिटर्जंटचा असावा, असा प्राथमिक अंदाज.

येथील नमुने घेतले...

आळंदीतील केटीवेअरपासून गावापर्यंत नदी फेसाळली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने तळवडे, चिंबळी, मोशी, डुडुळगाव आणि आळंदी बंधारा परिसरांतील पाण्याचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा अहवाल येणार आहे.

काय आहेत उपाययोजना

१) आळंदीतील बंधाऱ्यातून यापूर्वी पिण्याचे पाणी उचलले जात असे. मात्र, हा बंधारा वापराविना पडून आहे. त्यामुळे त्यात गाळ साचला आहे. त्यातील पाणी सोडण्याची गरज आहे.

२) इंद्रायणी नदीच्या एका बाजूने आळंदी, मोई, चिंबळी, निघोजे, इंदोरी अशी गावी येतात. दुसऱ्या बाजूला तळेगाव दाभाडे, देहूगाव, तळवडे, मोशी, चिखल, डुडुळगाव येतात. महापालिका, पीएमआरडीए, नगरपालिका आणि एमआयडीसीचे क्षेत्र येते. महापालिकेच्या परिसरातील सांडपाण्यावर नियंत्रण आणले गेले असले तरी पीएमआरडीए व नगरपालिका हद्दीतून थेट नदीत सांडपाणी सोडले जात आहे. ते रोखणे गरजेचे आहे.

३) पीएमआरडीए हद्दीतील गावातील गावांनी मैला शुद्धीकरण केंद्र निर्माण करण्याची गरज आहे.

इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबत तक्रारी आल्यानंतर तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक संबंधित भागामध्ये गेले. आठवड्याभरापासून पाण्याचे नमुने घेत आहोत. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. सकृतदर्शनी फेस डिटर्जंटमुळे येत असावा, असे वाटते. अहवाल आल्यानंतर नदी कशामुळे फेसाळत आहे, हे समजून येईल.

- मंचक जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडindrayaniइंद्रायणी