शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

डिटर्जंटच्या प्रदूषणामुळे इंद्रायणी फेसाळली, प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्राथमिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 12:55 IST

इंद्रायणी नदीच्या उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट सोडले जात आहे....

- विश्वास मोरे

पिंपरी : गेल्या दहा दिवसांपासून इंद्रायणी नदी फेसाळत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा दिवस पाण्याचे नमुने घेतले आहेत. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. नदी फेसाळण्याचे कारण डिटर्जंट असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. दूषित पाणी नद्यांमध्ये जाणार नाही, याची दक्षता महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसीने घ्यावी, अशा सूचनाही मंडळाने केल्या आहे.

इंद्रायणी नदीच्या उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट सोडले जात आहे. २ जानेवारीपासून नदी फेसाळत आहे. मात्र, आळंदी नगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी यांना प्रदूषणाचे ठोस कारण सापडले नव्हते. आता प्रदूषण नियंत्रण मंडळास ते सापडले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंतची निरीक्षणे

१) नदीवर चिंबळी आणि आळंदी येथे दोन बंधारे आहेत. चिंबळीच्या बंधाऱ्यातून काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हा बंधारा ओव्हरफ्लो झाला की, आळंदीचा बंधारा ओव्हरफ्लो होतो. ते पाणी १२ ते १५ फुटांवरून खाली पडते. तेथे फेस निर्माण होत आहे. हा फेस शंभर ते दीडशे मीटर अंतरापर्यंत कायम राहत आहे.

२) यापूर्वी घेतलेल्या नमुन्यांमधील पाण्यात साबण अर्थात डिटर्जंटयुक्त रसायन आढळून आले आहे. ज्यावेळी बंधाऱ्यातून पाणी पडते, त्यावेळी फेस येतो. त्यामुळे सध्या येणारा फेस डिटर्जंटचा असावा, असा प्राथमिक अंदाज.

येथील नमुने घेतले...

आळंदीतील केटीवेअरपासून गावापर्यंत नदी फेसाळली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने तळवडे, चिंबळी, मोशी, डुडुळगाव आणि आळंदी बंधारा परिसरांतील पाण्याचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा अहवाल येणार आहे.

काय आहेत उपाययोजना

१) आळंदीतील बंधाऱ्यातून यापूर्वी पिण्याचे पाणी उचलले जात असे. मात्र, हा बंधारा वापराविना पडून आहे. त्यामुळे त्यात गाळ साचला आहे. त्यातील पाणी सोडण्याची गरज आहे.

२) इंद्रायणी नदीच्या एका बाजूने आळंदी, मोई, चिंबळी, निघोजे, इंदोरी अशी गावी येतात. दुसऱ्या बाजूला तळेगाव दाभाडे, देहूगाव, तळवडे, मोशी, चिखल, डुडुळगाव येतात. महापालिका, पीएमआरडीए, नगरपालिका आणि एमआयडीसीचे क्षेत्र येते. महापालिकेच्या परिसरातील सांडपाण्यावर नियंत्रण आणले गेले असले तरी पीएमआरडीए व नगरपालिका हद्दीतून थेट नदीत सांडपाणी सोडले जात आहे. ते रोखणे गरजेचे आहे.

३) पीएमआरडीए हद्दीतील गावातील गावांनी मैला शुद्धीकरण केंद्र निर्माण करण्याची गरज आहे.

इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबत तक्रारी आल्यानंतर तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक संबंधित भागामध्ये गेले. आठवड्याभरापासून पाण्याचे नमुने घेत आहोत. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. सकृतदर्शनी फेस डिटर्जंटमुळे येत असावा, असे वाटते. अहवाल आल्यानंतर नदी कशामुळे फेसाळत आहे, हे समजून येईल.

- मंचक जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडindrayaniइंद्रायणी