शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

डिटर्जंटच्या प्रदूषणामुळे इंद्रायणी फेसाळली, प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्राथमिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 12:55 IST

इंद्रायणी नदीच्या उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट सोडले जात आहे....

- विश्वास मोरे

पिंपरी : गेल्या दहा दिवसांपासून इंद्रायणी नदी फेसाळत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा दिवस पाण्याचे नमुने घेतले आहेत. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. नदी फेसाळण्याचे कारण डिटर्जंट असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. दूषित पाणी नद्यांमध्ये जाणार नाही, याची दक्षता महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसीने घ्यावी, अशा सूचनाही मंडळाने केल्या आहे.

इंद्रायणी नदीच्या उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट सोडले जात आहे. २ जानेवारीपासून नदी फेसाळत आहे. मात्र, आळंदी नगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी यांना प्रदूषणाचे ठोस कारण सापडले नव्हते. आता प्रदूषण नियंत्रण मंडळास ते सापडले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंतची निरीक्षणे

१) नदीवर चिंबळी आणि आळंदी येथे दोन बंधारे आहेत. चिंबळीच्या बंधाऱ्यातून काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हा बंधारा ओव्हरफ्लो झाला की, आळंदीचा बंधारा ओव्हरफ्लो होतो. ते पाणी १२ ते १५ फुटांवरून खाली पडते. तेथे फेस निर्माण होत आहे. हा फेस शंभर ते दीडशे मीटर अंतरापर्यंत कायम राहत आहे.

२) यापूर्वी घेतलेल्या नमुन्यांमधील पाण्यात साबण अर्थात डिटर्जंटयुक्त रसायन आढळून आले आहे. ज्यावेळी बंधाऱ्यातून पाणी पडते, त्यावेळी फेस येतो. त्यामुळे सध्या येणारा फेस डिटर्जंटचा असावा, असा प्राथमिक अंदाज.

येथील नमुने घेतले...

आळंदीतील केटीवेअरपासून गावापर्यंत नदी फेसाळली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने तळवडे, चिंबळी, मोशी, डुडुळगाव आणि आळंदी बंधारा परिसरांतील पाण्याचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा अहवाल येणार आहे.

काय आहेत उपाययोजना

१) आळंदीतील बंधाऱ्यातून यापूर्वी पिण्याचे पाणी उचलले जात असे. मात्र, हा बंधारा वापराविना पडून आहे. त्यामुळे त्यात गाळ साचला आहे. त्यातील पाणी सोडण्याची गरज आहे.

२) इंद्रायणी नदीच्या एका बाजूने आळंदी, मोई, चिंबळी, निघोजे, इंदोरी अशी गावी येतात. दुसऱ्या बाजूला तळेगाव दाभाडे, देहूगाव, तळवडे, मोशी, चिखल, डुडुळगाव येतात. महापालिका, पीएमआरडीए, नगरपालिका आणि एमआयडीसीचे क्षेत्र येते. महापालिकेच्या परिसरातील सांडपाण्यावर नियंत्रण आणले गेले असले तरी पीएमआरडीए व नगरपालिका हद्दीतून थेट नदीत सांडपाणी सोडले जात आहे. ते रोखणे गरजेचे आहे.

३) पीएमआरडीए हद्दीतील गावातील गावांनी मैला शुद्धीकरण केंद्र निर्माण करण्याची गरज आहे.

इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबत तक्रारी आल्यानंतर तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक संबंधित भागामध्ये गेले. आठवड्याभरापासून पाण्याचे नमुने घेत आहोत. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. सकृतदर्शनी फेस डिटर्जंटमुळे येत असावा, असे वाटते. अहवाल आल्यानंतर नदी कशामुळे फेसाळत आहे, हे समजून येईल.

- मंचक जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळ

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडindrayaniइंद्रायणी