शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

भारतीय संशोधन अविश्वासाच्या जोखडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आयसीएमआर पासून पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रापर्यंत सर्व पातळ्यांवर आमचे संशोधन पत्रव्यवहाराव्दारे सुपूर्त केले ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आयसीएमआर पासून पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रापर्यंत सर्व पातळ्यांवर आमचे संशोधन पत्रव्यवहाराव्दारे सुपूर्त केले होते. सर्व ठिकाणी निराशाच हाती आली. भारतात संशोधक कमी नसले तरी त्यांच्या संशोधनावर उद्योगांचा व संबंधित घटकांचा विश्वास बसत नाही, अशी खंत केंद्र शासनाच्या सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी पार्कचे मुख्य संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केली. तथाकथित वैज्ञानिक, अंधश्रद्धा आणि अविश्वास या जोखडात भारतीय संशोधन अडकून पडल्याचेही त्यांनी सांगितले.

दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज, पुणे (डिकाई), अवनि आणि रिसर्च अ‍ॅन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन (रांचो) यांच्या वतीने सर सी.व्ही. रमण पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पी.ई. सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, डिकाई आणि रांचोचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ येमूल गुरूजी, पी.ई. सोसायटी, पुणेच्या उपसचिव आणि नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, एसजीएम ग्रुपचे संचालक रमेश पाटील, बारामतीचे अतिरीक्त आयुक्त अधीक्षक मिलिंद मोहिते, राजेंद्र पाटील उपस्थित होते. ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर, ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक डॉ. विठ्ठल बांदल, दिव्यांगता सहायता केंद्राचे संशोधक व समन्वयक धनंजय भोळे, ज्येष्ठ राष्ट्रीय संशोधक व्ही.एम. कुलकर्णी आणि युवा संशोधक अंकिता नगरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. जगदाळे म्हणाले, तथाकथित वैज्ञानिक, नोकरशहा आणि काही राजकीय नेतृत्व हेच भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनावर विश्वास ठेवत नसल्याने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शास्त्रज्ञ जे संशोधन करीत असतात त्यापासून समाज वंचित राहतो. मूळ भारतीय विद्यार्थी सिलीकॉन व्हॅलीत गेल्यानंतरच त्यांचे कर्तृत्व का सिद्ध होते हा आत्मचिंतनाचा विषय आहे. भारतात शास्त्रज्ञांना संशोधनाला पूरक सुविधा आणि वातावरण मिळत नाही. आयसर, आयआयटी यासारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमधून आपण केवळ पाश्चात्य देशांसाठी संशोधक तयार करीत आहोत. पीएचडी नंतर संशोधनाच्या संधी किंवा मार्ग उपलब्ध करून दिले नाहीत, तर भारतात रांचो कसे तयार होतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.