शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भारतात लोकशाही आहे, तर सत्य काहून बोलू नये..?, सरकारी यंत्रणेवर परखड टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:47 IST

पुणे : महात्मा जोतिबा फुल्यांनी ‘सत्य सर्वांचे आदी घर...’ असे सांगून सत्याचा आग्रह धरला. इतकंच काय महात्मा गांधींजींनी देखील सत्याचे प्रयोग केले आणि सत्य हेच अंतिम असते, असे सांगितले.

धनाजी कांबळे पुणे : महात्मा जोतिबा फुल्यांनी ‘सत्य सर्वांचे आदी घर...’ असे सांगून सत्याचा आग्रह धरला. इतकंच काय महात्मा गांधींजींनी देखील सत्याचे प्रयोग केले आणि सत्य हेच अंतिम असते, असे सांगितले. मात्र, आज देशात, राज्यात परिस्थिती याच्या बरोबर विरोधातली आहे. कुणी काय बोलले, की लगेच त्याला नियंत्रित करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज होते. परंतु, स्वतंत्र भारतात जिथे लोकशाहीने कारभार चालतो. तिथे सत्य काहून बोलू नये, असा रोखठोक सवाल अकोला जिल्ह्यातील अकोट येथील राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी केला. पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता ‘लोकमत’ला त्यांनी विशेष मुलाखत दिली.सत्यपाल महाराज म्हणाले, ‘समाजातला सगळ््यात तळातल्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे. तरच देशाचा विकास होऊ शकतो. केवळ धनदांडग्यांचं हित बघून देश आगे नही बढेगा. संत गाडगेबाबा केवळ धोबी समाजाचे म्हणून त्यांचे नाव स्वच्छ भारत अभियानाला मिळू शकले नाही. तेच ते एखाद्या धनदांडग्याचे नाव असते, तर त्यांना डोक्यावर घेऊन सरकारं नाचली असती, एवढी प्रतिभा आणि कर्मयोगी वृत्ती गाडगेबाबांची होती. आज दिसणारं चित्र आणि प्रत्यक्षातलं चित्र यात जमीनआसमानचा फरक दिसतो. कारण लोक हल्ली प्रश्नच विचारत नाही. त्यांना प्रश्नच पडत नाहीत की काय, असं माझ्यासारख्या साध्या माणसाला वाटतं. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, कबीर, तुकोबा यांनी माणसांच्या डोक्यातील घाण बाहेर काढण्याचं काम केलं. माणसांचे मेंदू स्वच्छ करण्याचं काम केलं. आज आपण केवळ बाहेरचा कचरा साफ करीत आहोत. खरं तर माणसांची कलुशीत मनं साफ करावी, अशी आजची परिस्थिती दिसत आहे.’कुणी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. खरं बोलले. खरं लिहिले, तर त्याच्यावर नियंत्रण करण्याची आणि त्याच्या अभिव्यक्तीलाच मारण्याची एक यंत्रणा प्रभावीपणे काम करताना दिसत आहे. एवढंच नाही, तर काही पत्रकारांनाही नोटिसा दिल्या जात आहेत, हे अतिशय भयानक आहे. हे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतु:सूत्रीच्या आधारे देशाची राज्यघटना लिहिली. त्या संविधानाचाच हा एकप्रकारचा अपमान आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. झुंडशाहीच्या जोरावर लोकांची मनं जिंकता येत नाहीत. लोकशाहीत सामोपचारानेच निर्णय घेतले गेले पाहिजेत, असेही सत्यपाल महाराज म्हणाले.तुकडोजी बाबा म्हणायचे,एकतरी अंगी असू दे कलानाहीतर काय फुका जन्मला...प्रत्येक माणसाला कायतरी कला अवगत असलीच पाहिजे. कलेमुळे तो विचार करू शकतो. आम्हाला गाण्याची कला असल्यामुळे आम्ही मनोरंजनातून प्रबोधन करतो. आणि जसे बोलतो, तसेच वागतो. साने गुरूजींनी सांगितले आहे, खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे...जगाला प्रेम वाटत गेलं पाहिजे. पे्रमानेच माणसांचं मन जिंकता येतं, हे सगळ््यांनी ध्यानात घेतले, तर खून, मारामाºया होणार नाही. किती मोठा विचार साने गुरुजींनी दिला आहे. सगळ््याच महापुरुषांनी हाच विचार सांगितला आहे, पण समाजाची मानसिकता कशी असते, जे वाईट ते आधी स्वीकारायचे आणि चांगले ते नंतर...हे बदलले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कीर्तनातून प्रबोधन !१४,००० गावांमध्ये कीर्तनं केली. व्यसनमुक्ती, निर्मलग्राम, तंटामुक्ती, हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवी नातेसंबंधांबाबत आम्ही कीर्तनातून प्रबोधन करतो. मात्र, सत्य सांगितले की ते अजूनही कडू वाटते, अशी परिस्थिती असते. तरीही सत्याने वर्तावे ज्योती म्हणे...हे आम्हाला उमगले आहे. त्यामुळे जेवढे सत्य लोकांपुढे मांडता येईल, ते त्यांच्याच भाषेत सांगण्याचा प्रयत्न असतो, असे सत्यपाल महाराज म्हणाले.