शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

पुरंदरच्या शेतकऱ्यांचा स्वतंत्र ठसा

By admin | Updated: January 31, 2015 22:55 IST

कृषी क्षेत्रात फळबागांमध्ये पुरंदरच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करुन कमी पाण्यातही कष्टाच्या जोरावर क्रांती केली आहे़

खळद : कृषी क्षेत्रात फळबागांमध्ये पुरंदरच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करुन कमी पाण्यातही कष्टाच्या जोरावर क्रांती केली आहे़ नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन आपला स्वतंत्र ठसा उमटविला असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले़ सासवड येथे पालखी मैदानावर होणाऱ्या तीन दिवसाच्या जयमल्हार कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रिया सुळे यांच्या झाले़ या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामथे, अशोक टेकवडे, विजय कोलते, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, जि.प. च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, वैशाली नागवडे, माणिकराव झेंडे, दिलीप यादव, सासवडच्या नगराध्यक्षा आनंदी जगताप, सभापती गौरी कुंजीर, शिवाजी पोमण, बाळासाहेब कामथे, मनिषा काकडे, गंगाराम जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.सुळे म्हणाल्या, पुरंदरचा वाटाणा देशात प्रसिध्द् आहे़ येथील भाजीपाला संपूर्ण जगात जातो़ दुग्ध व्यवसाय वाढ झाली, युवकांनी शेतीत हरितगृहचा स्विकार करीत दर्जेदार उत्पन्न वाढविले़ तसेच अंजिर,डाळींब, सिताफळ यांचे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेऊन शेती क्षेत्रात मोठा बदल घडविला आहे. प्रदीप कंद म्हणाले, दर्जेदार शेतीचा प्रयत्न व्हावा, कमी पाण्याचा वापर करीत आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे,यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व त्याच्या वापराचे ज्ञान मिळावे यासाठी अशा कुषी प्रदर्शनांचे आयोजन जिल्हा परीषदेकडून होत आहे़ तालुक्यात प्रथमच एवढे भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करता आल्याचे समाधान वाटत असल्याचे निमंत्रक जि. प. च्या कृषी व पशुसवर्धन सभापती सारीका इंगळे यांनी सांगितले़ या वेळी दादा जाधवराव, आनंदी जगताप,गौरी कुंजीर यांचीही भाषणे झाली़ प्रास्ताविक अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, सुत्रसंचालन पी.एस.मेमाणे यांनी केले तर आभार सुदामराव इंगळे यांनी मानले. (वार्ताहर)