शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

पुरंदरच्या शेतकऱ्यांचा स्वतंत्र ठसा

By admin | Updated: January 31, 2015 22:55 IST

कृषी क्षेत्रात फळबागांमध्ये पुरंदरच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करुन कमी पाण्यातही कष्टाच्या जोरावर क्रांती केली आहे़

खळद : कृषी क्षेत्रात फळबागांमध्ये पुरंदरच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करुन कमी पाण्यातही कष्टाच्या जोरावर क्रांती केली आहे़ नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन आपला स्वतंत्र ठसा उमटविला असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले़ सासवड येथे पालखी मैदानावर होणाऱ्या तीन दिवसाच्या जयमल्हार कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे उदघाटन सुप्रिया सुळे यांच्या झाले़ या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधवराव, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामथे, अशोक टेकवडे, विजय कोलते, प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, जि.प. च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सारिका इंगळे, वैशाली नागवडे, माणिकराव झेंडे, दिलीप यादव, सासवडच्या नगराध्यक्षा आनंदी जगताप, सभापती गौरी कुंजीर, शिवाजी पोमण, बाळासाहेब कामथे, मनिषा काकडे, गंगाराम जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.सुळे म्हणाल्या, पुरंदरचा वाटाणा देशात प्रसिध्द् आहे़ येथील भाजीपाला संपूर्ण जगात जातो़ दुग्ध व्यवसाय वाढ झाली, युवकांनी शेतीत हरितगृहचा स्विकार करीत दर्जेदार उत्पन्न वाढविले़ तसेच अंजिर,डाळींब, सिताफळ यांचे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेऊन शेती क्षेत्रात मोठा बदल घडविला आहे. प्रदीप कंद म्हणाले, दर्जेदार शेतीचा प्रयत्न व्हावा, कमी पाण्याचा वापर करीत आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे,यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व त्याच्या वापराचे ज्ञान मिळावे यासाठी अशा कुषी प्रदर्शनांचे आयोजन जिल्हा परीषदेकडून होत आहे़ तालुक्यात प्रथमच एवढे भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करता आल्याचे समाधान वाटत असल्याचे निमंत्रक जि. प. च्या कृषी व पशुसवर्धन सभापती सारीका इंगळे यांनी सांगितले़ या वेळी दादा जाधवराव, आनंदी जगताप,गौरी कुंजीर यांचीही भाषणे झाली़ प्रास्ताविक अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, सुत्रसंचालन पी.एस.मेमाणे यांनी केले तर आभार सुदामराव इंगळे यांनी मानले. (वार्ताहर)