शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

इंदापूरला दिवसाआड पाणी

By admin | Updated: March 16, 2015 04:19 IST

उजनी पाणलोट क्षेत्रातील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात एक ते दीड महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तर

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात एक ते दीड महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तर, तरंगवाडी तलावाची पाण्याची पातळी खालावल्याने विद्युत पंपाने पाणी खेचून सरस्वतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा भार उजनी पाणलोट क्षेत्रामधील पाणीपुरवठा योजनेवर पडला आहे. परिणामी शहरात उद्यापासून दिवसआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल, असे चित्र आहे.यासंदर्भात उजनी पाणलोट क्षेत्राची ‘लोकमत’ने पाहणी केली. त्या वेळी माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेच्या परिसरातील पाणी नदीपात्रात किमान एक-दीड किलोमीटर पाणीपातळी गेल्याचे दिसून आले. माळवाडी येथील कार्यकर्ते गोकुळ व्यवहारे यांची पाणीपुरवठा योजनेजवळच जमीन आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले, की नेहमी पाणलोट क्षेत्रातील पाणी आमच्या जमिनीपर्यंत असते. यंदा ते एक ते दीड किलोमीटर आत सरकले आहे. ऐन उन्हाळ्यात ते आणखी आत सरकेल. त्या वेळी परिस्थिती अधिक बिकट होईल.पाणीपुरवठ्यासंदर्भात भ्रमणध्वनीद्वारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पाणीपुरवठ्याबाबत सत्तारूढ व विरोधी दोन्ही बाजूच्या बहुतांशी नगरसेवकांना काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. विरोधी गटातील नगरसेवक गजानन गवळीदेखील गप्प का आहेत, अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)