शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

इंदापूरला दिवसाआड पाणी

By admin | Updated: March 16, 2015 04:19 IST

उजनी पाणलोट क्षेत्रातील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात एक ते दीड महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तर

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या परिसरात एक ते दीड महिना पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. तर, तरंगवाडी तलावाची पाण्याची पातळी खालावल्याने विद्युत पंपाने पाणी खेचून सरस्वतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा भार उजनी पाणलोट क्षेत्रामधील पाणीपुरवठा योजनेवर पडला आहे. परिणामी शहरात उद्यापासून दिवसआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल, असे चित्र आहे.यासंदर्भात उजनी पाणलोट क्षेत्राची ‘लोकमत’ने पाहणी केली. त्या वेळी माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेच्या परिसरातील पाणी नदीपात्रात किमान एक-दीड किलोमीटर पाणीपातळी गेल्याचे दिसून आले. माळवाडी येथील कार्यकर्ते गोकुळ व्यवहारे यांची पाणीपुरवठा योजनेजवळच जमीन आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले, की नेहमी पाणलोट क्षेत्रातील पाणी आमच्या जमिनीपर्यंत असते. यंदा ते एक ते दीड किलोमीटर आत सरकले आहे. ऐन उन्हाळ्यात ते आणखी आत सरकेल. त्या वेळी परिस्थिती अधिक बिकट होईल.पाणीपुरवठ्यासंदर्भात भ्रमणध्वनीद्वारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पाणीपुरवठ्याबाबत सत्तारूढ व विरोधी दोन्ही बाजूच्या बहुतांशी नगरसेवकांना काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. विरोधी गटातील नगरसेवक गजानन गवळीदेखील गप्प का आहेत, अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)