शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

इंदापूरला अखेर धो-धो बरसला!

By admin | Updated: September 7, 2015 04:20 IST

अडीच महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. त्यामुळे ये रे... ये रे... पावसा अशी विनवणी बळीराजा

पळसदेव : अडीच महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. त्यामुळे ये रे... ये रे... पावसा अशी विनवणी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून करीत होता. अन् अचानक शनिवारी (दि. ५) रात्री निसर्गाच्या मनात आले अन् तो धो... धो... बरसला. दीड तास पडत असलेल्या या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी पाणी करून टाकले. अन् बघता बघता बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. इंदापूरच्या पश्चिम भागाला शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. ओढे वाहू लागले, बंधारे भरले. शेतीमध्ये पाणी साचले. पाऊस काही पडत नव्हता. पर्यायाने शेतातील पिके जळू लागली. जनावरे, वन्यप्राणी यांना चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली. तरीही पावसाचे आगमन होत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत होता. मात्र शनिवारी रात्री आठच्या सुमारास अचानक पावसास सुरुवात झाली. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा वाहात होता. अचानक गाराही पडत होत्या. बघता बघता पावसाने रौद्ररूप धारण केले. वारा शांत झाला अन् पावसाचा वेग वाढला. भादलवाडी, डाळज, अकोले, पोंधवडी, कुंभारगाव या भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ओढे वाहू लागले. बंधारे भरले. शेतातील सरींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या पावसाने मुख्य पीक असलेल्या उसाला अधिक फायदा झाला आहे. जळू लागलेल्या पिकांना या पावसाने मोठा आधार मिळाला आहे. विजाही कडकडत होत्या. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. बिल्ट कंपनीजवळ वीजवाहक तारांवर झाड पडले. तसेच, चारचाकी वाहनांवरही झाडे कोसळली.दडी मारल्यानंतर प्रथमच मोठा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ऊस, कडवळ, मका, बाजरीच्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. (वार्ताहर)