शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

कांदा लागवडीकडे वाढता कल

By admin | Updated: August 24, 2015 02:50 IST

सध्या बाजारात कांद्याला असणारा उच्चांकी भाव, पाऊस न झाल्याने भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी, उसाला लागणारे पाणी व त्याचा कालावधी, त्याचबरोबर

मांडवगण फराटा : सध्या बाजारात कांद्याला असणारा उच्चांकी भाव, पाऊस न झाल्याने भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी, उसाला लागणारे पाणी व त्याचा कालावधी, त्याचबरोबर उसाला हमी भाव नसल्याने शिरूर पूर्व भागातील ऊसपट्ट्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीत मग्न आहे. सध्या घोडनदी कोरडी पडली असून, तेथील पिके मोठ्या प्रमाणावर जळण्याच्या मार्गावरआहेत. परंतु भीमा नदी ही बारमाही वाहणारी नदी असून, या नदीवरील कोल्हापुरी बंधारे असल्याने मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, बाभुळसर बु., वडगाव रासाई, सादलगाव, नागरगाव, रांजणगाव सांडस ही गावे येत असून, या गावातील पूर्ण क्षेत्र ओलिताखाली असल्याने कायमस्वरूपी या भागात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु यावर्षी उसाच्या बाजार भावाबाबत शेतकऱ्यामध्ये चिंता वाढल्याने व बाजारात चढ्या भावाने कांदा विक्री होत असल्याने तसेच यावर्षी पावसाचे प्रमाण फारच कमी असल्याने कांद्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटणार असे डोळ्यांसमोर ठेवूनच येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीकडे वळला आहे. सध्या सर्वत्र जनावरांना चारा नाही. त्यासाठी सरसकरट चाऱ्यासाठी उसाचा उपयोग केला जात आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर खोडवा ऊस गुऱ्हाळाला घालून कांदा लागवड करण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या या भागात दिसत आहे. (वार्ताहर)