शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पुणेकरांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST

लॉकडाऊन कालावधीत लोकांचे घराबाहेर पडणे आणि उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे बंद झाले होते. त्यामुळे मागील वर्षी कोरोना काळात ब-याच विषाणूजन्य ...

लॉकडाऊन कालावधीत लोकांचे घराबाहेर पडणे आणि उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे बंद झाले होते. त्यामुळे मागील वर्षी कोरोना काळात ब-याच विषाणूजन्य आजारांचे प्रमाणही घटल्याचे दिसून आले होते. परंतु, आता अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला सुरूवात केल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफाॅईड, चिकुनगुनिया, काविळच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या होणे, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणे दिसून येतात.

जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर म्हणाले, ‘गेल्या दोन आठवड्यांत या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. दररोज बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण हे तापाचे असतात. या रुग्णांमध्येही गेल्या दोन आठवड्यांत ७ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या कोरोना रुग्ण कमी होत असल्याने या रुग्णसंख्येत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून नागरिकांनी निष्काळजीपणा न करता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.’

पॅथॉलॉजिस्ट डॉ. कीर्ती प्रकाश कोटला म्हणाले, ‘पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाॅइड आणि चिकुनगुनिया रुग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. जुलै २०२१ मध्ये १० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते तर १ चिकुनगुनियाचा रुग्ण आढळून आला होता. आता या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून दररोज डेंग्यू, टायफाॅइड आणि चिकुनगुनियाचे १० ते १५ रुग्ण चाचणीसाठी येतात. यातील ५० टक्के रुग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो आहे. वेळीच निदान झाल्यास पटकन उपचार होऊन रुग्ण बरा होऊ शकतो. म्हणून ताप आल्यास अंगावर न काढता वेळेवर चाचणी करून घेणे गरजेचे आहे.’

चिकुनगुनियाचे सर्वांत प्रमुख लक्षण ताप हे आहे. या आजाराची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. कारण त्यासोबत सांध्यांच्या तीव्र वेदना, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा ही देखीललक्षणे आहेत. डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांमागे दुखणे ही लक्षणे आहेत. याशिवाय डेंग्यूमुळे रक्तस्राव होत असल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सांगितले जात आहे.

----------------

काय काळजी घ्यावी?

सध्या मुलांमध्ये व्हायरल फिव्हरचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून पालकांनी दुर्लक्ष न करता मुलांनी विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यात पाणी साचल्याने त्यात डासांची उत्पत्ती होते, यामुळे डेंग्यू व चिकुनगुनिया हा आजार होतो. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करा, घराबाहेर पाणी साचू देऊ नका, परिसरात वेळोवेळी फवारणी करा आणि डास प्रतिबंधक जाळीचा वापर करा. कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. म्हणून ताप जास्त दिवस असल्याने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

------------

डेंग्यूचे रुग्ण :

महिनासंशयितपॉझिटिव्ह

जानेवारी २७५ २२

फेब्रुवारी ७९ ०६

मार्च १९१ ०२

एप्रिल १६९ ०१

मे १६२ ०

जून २०१ ०

जुलैै १०७ ८६

आॅगस्ट ८७ १८

---------------

शहरातील आकडेवारी : (जानेवारी ते आॅगस्ट २०२१)

स्वाईन फ्लू - ६५

चिकुनगुनिया - ८४

डेंग्यू - १३५

मलेरिया - २

-------------------