शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांमध्ये वाढतोय ‘ताप’, संसर्गजन्य आजारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:07 IST

पावसाळी वातावरणामुळे लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. सर्दी, ताप, खोकल्याने लहान मुले त्रस्त झाली आहेत.

पुणे - पावसाळी वातावरणामुळे लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. सर्दी, ताप, खोकल्याने लहान मुले त्रस्त झाली आहेत. त्यातच डेंग्यूचे प्रमाणही वाढू लागल्याने पालकांमधे भीतीचे वातावरण असून थोडा ताप आला तरी रुग्णालयांकडे धाव घेतली जात आहे.पावसाळा सुरू झाला की संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. मागील काही आठवड्यांपासून शहरात पावसाळी वातावरण आहे. या दिवसांमध्ये डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डेंग्यु, मलेरियासारखे आजार तसेच संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. सध्या लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांकडे गर्दी होत आहे. सतत ताप येणे, अंगावर पुरळ, लाल चट्टे, छातीत कफ भरणे, नाक चोंदणे ही लक्षणे मुलांमध्ये आढळून येत आहेत. दीड ते दोन वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये संसर्गजन्य ताप व सर्दी-खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. मुलांचा ताप कमी होत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.काही मुलांच्या हातापायांवर पुरळ येत असून लाल चट्टेही दिसत आहेत. अंगदुखीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. ही डेंग्यूची लक्षणे असल्याने पालक घाबरून रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. डेंग्यूचे प्रमाण मोठ्या मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे. तसेच पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबाचे प्रमाण वाढत चालले आहे.काय काळजी घ्यावीलहान मुलांना घेऊन बाहेर फिरू नयेपाणी उकळून प्यावेडासांपासून बचावासाठी मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावाताप, सर्दी, खोकल्या असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नयेलहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नयेपाणी, सरबत अधिक प्रमाणात द्यावेताप कमी होत नसल्यास लगेच डॉक्टरांकडे जावेसर्दी, खोकल्यासह ताप आलेल्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. दीड वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये छातीत कफ असल्याचे प्रमाण अधिक आहे. हात-पाय-तोंडावर चट्टेही दिसतात. त्यामुळे पालकांनी लहान मुलांकडे सध्या अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांना आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.- डॉ. रश्मी गपचुप, बालरोगतज्ज्ञपावसाळी वातावरणामुळे लहान मुलांना ताप येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. संसर्गजन्य तापामुळे पालकांनी लहान मुलांबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. ताप उतरत नसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.- डॉ. केयूर महाजन, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या