शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लहान मुलांमध्ये वाढतोय ‘ताप’, संसर्गजन्य आजारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:07 IST

पावसाळी वातावरणामुळे लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. सर्दी, ताप, खोकल्याने लहान मुले त्रस्त झाली आहेत.

पुणे - पावसाळी वातावरणामुळे लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. सर्दी, ताप, खोकल्याने लहान मुले त्रस्त झाली आहेत. त्यातच डेंग्यूचे प्रमाणही वाढू लागल्याने पालकांमधे भीतीचे वातावरण असून थोडा ताप आला तरी रुग्णालयांकडे धाव घेतली जात आहे.पावसाळा सुरू झाला की संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. मागील काही आठवड्यांपासून शहरात पावसाळी वातावरण आहे. या दिवसांमध्ये डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डेंग्यु, मलेरियासारखे आजार तसेच संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. सध्या लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे बालरोगतज्ज्ञांकडे गर्दी होत आहे. सतत ताप येणे, अंगावर पुरळ, लाल चट्टे, छातीत कफ भरणे, नाक चोंदणे ही लक्षणे मुलांमध्ये आढळून येत आहेत. दीड ते दोन वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये संसर्गजन्य ताप व सर्दी-खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. मुलांचा ताप कमी होत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.काही मुलांच्या हातापायांवर पुरळ येत असून लाल चट्टेही दिसत आहेत. अंगदुखीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. ही डेंग्यूची लक्षणे असल्याने पालक घाबरून रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. डेंग्यूचे प्रमाण मोठ्या मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे. तसेच पावसाळ््यात दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबाचे प्रमाण वाढत चालले आहे.काय काळजी घ्यावीलहान मुलांना घेऊन बाहेर फिरू नयेपाणी उकळून प्यावेडासांपासून बचावासाठी मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावाताप, सर्दी, खोकल्या असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नयेलहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नयेपाणी, सरबत अधिक प्रमाणात द्यावेताप कमी होत नसल्यास लगेच डॉक्टरांकडे जावेसर्दी, खोकल्यासह ताप आलेल्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. दीड वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये छातीत कफ असल्याचे प्रमाण अधिक आहे. हात-पाय-तोंडावर चट्टेही दिसतात. त्यामुळे पालकांनी लहान मुलांकडे सध्या अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांना आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.- डॉ. रश्मी गपचुप, बालरोगतज्ज्ञपावसाळी वातावरणामुळे लहान मुलांना ताप येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. संसर्गजन्य तापामुळे पालकांनी लहान मुलांबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. ताप उतरत नसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.- डॉ. केयूर महाजन, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या