शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

नियोजनाच्या अभावामुळे वाढतोय बकालपणा

By admin | Updated: January 14, 2017 03:48 IST

जनता वसाहत-दत्तवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीचा मोठा भाग आहे. जनता वसाहतीमध्ये अद्यापही सांडपाणी

पुणे : जनता वसाहत-दत्तवाडी या प्रभागामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टीचा मोठा भाग आहे. जनता वसाहतीमध्ये अद्यापही सांडपाणी, कचरा, असमान पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, अपुरी स्वच्छतागृहे अशा विविध समस्या आहेत. तर पूरग्रस्त वसाहत असलेल्या दत्तवाडीमध्ये मालकी हक्क, बांधकामास परवानगी नसणे, नियोजनाच्या अभावामुळे वाढत चाललेला बकालपणा हे प्रश्न उभे आहेत. या प्रभागातील काही भाग सोसायट्यांचा असून, तिथे काही प्रमाणात कचऱ्याची समस्या जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले.झोपडपट्टी, पूरग्रस्त वसाहत आणि सोसायट्या अशा तीन वेगवेगळ्या गटांतील नागरिक या प्रभागात आहेत. जनता वसाहत ही शहरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. हातावर पोट असलेले बहुतेक जण जनता वसाहतीत राहतात. घर बांधण्यापासून इतर सोयी-सुविधा देण्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे नियोजन या भागासाठी करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून असलेली कचरा, सांडपाणी, अंतर्गत रस्ते, अपुरी स्वच्छतागृहे अशा समस्या आजही कायम आहेत. मुख्य रस्त्यालगत कालवा असून, त्याला सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आलेली नाही. अनेक जण कालव्यातच कचरा टाकताना दिसतात. यामध्ये सुधारणा करण्याची येथील नागरिकांची मागणी आहे.दत्तवाडीचा बहुतेक भाग या प्रभागात आला आहे. पूरग्रस्त वसाहतीमुळे दत्तवाडीच्या विकासात मर्यादा आहेत. अद्याप अनेकांना घरांचा मालकी हक्क मिळालेला नाही. या भागात नवीन बांधकाम करायचे म्हटले तरी मान्यता मिळत नाही. कुटुंब वाढत चालल्याने नागरिकांनी नाईलाजास्तव घरांचे मजले वाढविले आहेत. कचऱ्याची समस्याही या भागात आहे. दांडेकर पुलालगत असलेल्या झोपडपट्टीतही सुविधांचा अभाव आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्रालगत असलेल्या भागात अद्याप सर्व सुविधा नाहीत. अनधिकृत जाहिरातबाजीचा वेढाही या भागाला पडला आहे. सिंहगड रस्त्यालगत असलेल्या जगदेवनगर, सातववाडी, बाबूराव भाऊराव फुले उद्यान या परिसराचा काही भाग वगळल्यास बहुतेक सोसायट्या आहेत. पण असमान पाणीपुरवठा व कचऱ्याची समस्था जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सिंहगड रस्त्यावरील सातत्याच्या वाहतूककोंडीवरही या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)