शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पाणीपट्टीत दरवर्षी ५ टक्केच वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 01:11 IST

महापालिकेने शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या नावाखाली शहराच्या पाणीपट्टीमध्ये सलग ५ वर्षे १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असताना राज्य

पुणे : महापालिकेने शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या नावाखाली शहराच्या पाणीपट्टीमध्ये सलग ५ वर्षे १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असताना राज्य शासनाने पाणी पुरवठा प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेने दरवर्षी पाणीपट्टीमध्ये ५ टक्के वाढ करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्याच्या नगरविकास विभागामार्फत पाणीपुरवठ्याचे विविध प्रकल्प राबविले जातात. नागरी संस्थांमार्फत या प्रकल्पांची कार्यवाही होत असताना त्यांची देखभाल व दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्याचे नगरविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नगरविकास विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठा प्रकल्पांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी पाणीपट्टीमध्ये पाच टक्के वाढ करावी असे स्पष्ट केले आहे. योजनांचा प्राधान्यक्रम, भूसंपादन, स्वहिस्सा, अंमलबजावणीचा टप्पा, निविदा प्रक्रिया, स्रोतांचा विकास, जलशुद्धीकरण केंद्र, साठवण टाक्या आणि वितरण व्यवस्था, प्रकल्पांची देखभाल आणि दुरुस्ती याबाबतही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत.पुणे महापालिकेने यापूर्वीच पाणीपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. शहराच्या पाणीपट्टीमध्ये पुढील वर्षासाठी १२ टक्के, तर त्यापुढील ४ वर्षे सलग १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे आणखी वाढ करायची आवश्यकता आहे का, याची चाचपणी प्रशासनाकडून केली जाणार आहे.