शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

उजनी धरणाच्या पातळीत वाढ

By admin | Updated: July 17, 2017 03:58 IST

जिल्ह्यातील भीमा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : जिल्ह्यातील भीमा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांत साठ्यात वाढ झाल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाकडून देण्यात आली. दोन दिवस असाच पाऊस राहिला तर धरणाची पातळी उणे पातळीतून अधिकवर जाईल, अशी शक्यता धरण व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली. पुणे, लोणावळा, भीमाशंकर, आंबेगाव, शिरूर या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने अद्याप दडी मारलेली आहे. बंडगार्डन येथून २० हजार पाण्याचा विसर्ग भीमा नदीत होत आहे. दौंड येथून २७ हजार क्युसेक्सवेगाने पाणी भीमा नदीपात्रात येत आहे. यामुळे उजनीतील पाणीसाठा वाढलो. दोन दिवसांपूर्वी उजनी धरणातील पाणीसाठा वजा १६ टक्केपर्यंत होता. मात्र आजच्या आकडेवारीनुसार वजा १२.८३ पर्यंत पाणीसाठा वाढला आहे. दोन दिवस पावसाचा असाच जोर राहिला तर उजनीची पातळी मृत साठ्यातून बाहेर येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ११७ टीएमसी आहे. उपयुक्त पातळी ५३ टीएमसी इतकी आहे. धरणातील आजची पाणीपातळी ४८९.९९० मीटर आहे.पुणे आणि दौंड भागातून होत असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपले विद्युत पंप सुरक्षित पाण्यापासून वाचविण्यासाठी लगबग सुरु केल्याचे पाहावयास मिळत आहे.यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गतवर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. धरणावर अवलंबून असणाऱ्या पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला होता.लोकमत न्यूज नेटवर्कचासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगरावर भीमाशंकर, भोरगिरी, कळमोडी धरण परिसरात तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे ओढे, नाले, बंधारे, वाहून सखल भागात पाणी साचले आहे. रात्रभर पडलेल्या या पावसाने भीमा नदीच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होऊन नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे चासकमान धरणाची पाणीपातळी वाढली असून, धरणात ६९.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून ४५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे भातलागवडीला वेग आला आहे.चासकमान धरणामध्ये मागील वर्षी याच तारखेला ५५.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पाणी पातळी ६४३.३० होती. एकूण साठा १४५.३१ दलघमी होता. उपयुक्त पाणीसाठा ११८.१२ दलघमी होता.